शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणूकीची औपचारीकताच बाकी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 14:03 IST

कॉँग्रेस आघाडीकडे कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानी, मनसे, वंचित बहुजन आघाडीला जागा वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाटता वाटता ते जागा लढविणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होतो?, असा टोला लगावत, लोकसभा निवडणुकीची नुसती औपचारीकताच बाकी असून जनता भाजप-शिवसेना युतीलाच पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनिवडणूकीची औपचारीकताच बाकी: चंद्रकांत पाटीलतपोवन मैदानाची पाहणी : रविवारी भाजप-शिवसेना युतीची जाहीर सभा 

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडीकडे कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानी, मनसे, वंचित बहुजन आघाडीला जागा वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाटता वाटता ते जागा लढविणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होतो?, असा टोला लगावत, लोकसभा निवडणुकीची नुसती औपचारीकताच बाकी असून जनता भाजप-शिवसेना युतीलाच पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी (दि.२४) कोल्हापूरातील जाहीरसभेने सुरुवात होणार आहे. यासाठी कळंबा रोडवरील तपोवन मैदान निश्चित करण्यात आले असून त्याची गुरुवारी पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव,अशोक देसाई, आदी उपस्थित होतो.कॉँग्रेस आघाडीकडून कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्यांना भाजपच्या सहयोगी असलेल्या नवनीत राणा यांना जागा द्यावी लागली आहे. तसेच हातकणंगलेतून ‘स्वाभिमानी’च्या खा.राजू शेट्टींना, वसंतदादांच्या सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ला देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

खा. अशोक चव्हाण हे आपण बाजूला होऊन आपल्या पत्नीला उभे करतील म्हणून कॉँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर करुन टाकली. ‘स्वाभिमानी’, वंचित बहुजन आघाडी, मनसेला जागा वाटत सुटल्याने ही आघाडी स्वत: जागा लढविणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण होते, असा टोला पालकमंत्र्यांनी यावेळी लगावला.

कॉँगेसच्या काळात विविध संस्थांवर मोठी झालेली राज्यातील मोठी कुटूंबे आपल्या संस्थांची प्रगती करण्यासाठी युतीसोबत येत आहेत. त्यामुळे पुढील आठवडा खूप गाजणार आहे. आघाडीची स्थिती पाहत व युतील मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणुकीची औपचारीकताच बाकी असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.विराट सभा होईलप्रत्येक निवडणुकीत युतीचा प्रचार प्रारंभ हा मोठा व शानदार असतो. त्यानुसार ही जाहीर सभाही विराट होईल. लोकसभा निवडणुक प्रचारातही अशी सभा होणार नाही. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असून तपोवन मैदानाची पाहणी करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रमुख चौकात सभेचे थेट प्रक्षेपणया सभेसाठी गांधी मैदान अपुरे पडणार असल्याने तपोवन मैदान निश्चित करण्यात आले. होणारी गर्दी पाहता आता हे मैदानही अपुरे पडेल त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्क्रिनवर सभेचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील