शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणूकीची औपचारीकताच बाकी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 14:03 IST

कॉँग्रेस आघाडीकडे कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानी, मनसे, वंचित बहुजन आघाडीला जागा वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाटता वाटता ते जागा लढविणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होतो?, असा टोला लगावत, लोकसभा निवडणुकीची नुसती औपचारीकताच बाकी असून जनता भाजप-शिवसेना युतीलाच पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनिवडणूकीची औपचारीकताच बाकी: चंद्रकांत पाटीलतपोवन मैदानाची पाहणी : रविवारी भाजप-शिवसेना युतीची जाहीर सभा 

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडीकडे कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानी, मनसे, वंचित बहुजन आघाडीला जागा वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वाटता वाटता ते जागा लढविणार आहेत की नाही असा प्रश्न निर्माण होतो?, असा टोला लगावत, लोकसभा निवडणुकीची नुसती औपचारीकताच बाकी असून जनता भाजप-शिवसेना युतीलाच पुन्हा एकदा निवडून देईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी (दि.२४) कोल्हापूरातील जाहीरसभेने सुरुवात होणार आहे. यासाठी कळंबा रोडवरील तपोवन मैदान निश्चित करण्यात आले असून त्याची गुरुवारी पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव,अशोक देसाई, आदी उपस्थित होतो.कॉँग्रेस आघाडीकडून कोणी उमेदवारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्यांना भाजपच्या सहयोगी असलेल्या नवनीत राणा यांना जागा द्यावी लागली आहे. तसेच हातकणंगलेतून ‘स्वाभिमानी’च्या खा.राजू शेट्टींना, वसंतदादांच्या सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ला देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

खा. अशोक चव्हाण हे आपण बाजूला होऊन आपल्या पत्नीला उभे करतील म्हणून कॉँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर करुन टाकली. ‘स्वाभिमानी’, वंचित बहुजन आघाडी, मनसेला जागा वाटत सुटल्याने ही आघाडी स्वत: जागा लढविणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण होते, असा टोला पालकमंत्र्यांनी यावेळी लगावला.

कॉँगेसच्या काळात विविध संस्थांवर मोठी झालेली राज्यातील मोठी कुटूंबे आपल्या संस्थांची प्रगती करण्यासाठी युतीसोबत येत आहेत. त्यामुळे पुढील आठवडा खूप गाजणार आहे. आघाडीची स्थिती पाहत व युतील मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणुकीची औपचारीकताच बाकी असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.विराट सभा होईलप्रत्येक निवडणुकीत युतीचा प्रचार प्रारंभ हा मोठा व शानदार असतो. त्यानुसार ही जाहीर सभाही विराट होईल. लोकसभा निवडणुक प्रचारातही अशी सभा होणार नाही. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असून तपोवन मैदानाची पाहणी करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रमुख चौकात सभेचे थेट प्रक्षेपणया सभेसाठी गांधी मैदान अपुरे पडणार असल्याने तपोवन मैदान निश्चित करण्यात आले. होणारी गर्दी पाहता आता हे मैदानही अपुरे पडेल त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्क्रिनवर सभेचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील