शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लॉकडाऊनमुळे निराधार मुलांची सुरू आहे उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुल व जिल्ह्यातील अन्य संस्थातून अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेल्या सुमारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुल व जिल्ह्यातील अन्य संस्थातून अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेल्या सुमारे १८० मुलांची उपासमार होत आहे. त्यांना अजून नोकरी नाही. कांहीजण किरकोळ हातावरील कामे करून शिक्षण घेत आहेत परंतु लॉकडाऊनमुळे सगळेच ठप्प झाल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचे वांदे झाले आहे. किमान एक महिन्यांसाठी त्यांना अन्नधान्याचे किट देण्याची गरज आहे. त्यासाठी बालकल्याण संकुलचे विश्वस्त व्ही. बी. पाटील व मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

ही सर्व मुले अनाथ, निराधार, निराश्रित आहेत. जगण्याच्या एका टप्प्यावर ती बालकल्याण संकुलसह विविध संस्थामध्ये आली. तिथे राहून त्यांचे उत्तम संगोपन व शिक्षणही झाले. परंतु राज्य शासनाच्या नियमानुसार ही मुले सज्ञान झाली की त्यांना संस्थेत राहता येत नाही. अशा घरट्यातून बाहेर पडलेल्या मुलांसाठीच आधाराची गरज आहे. ही मुले शिक्षण घेत अर्धवेळ नोकरी करत आहेत. कांहीजण अंगावरील कामे करून उपजीविका करत आहेत. मुली दवाखान्यात आया म्हणून काम करतात. कांहीजणी धुण्याभांड्याची कामे करतात. जळगांवचे दीपस्तंभ फाऊंडेशन, पुण्यातील सनाथ वेल्फअर फाऊंडेशन व ठाणे येथील अविशत ट्रस्ट यांनी आतापर्यंत महिनाभर पुरेल इतकी मदत दिली. परंतु अजूनही एका महिन्याचे अन्नधान्याचे किट देण्याची गरज आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, खाद्यतेल, डाळ, कडधान्ये, साखर, चहापूड, चटणी, कांदे-बटाटे व साबण हे साहित्य असेल. महिलांसाठी सॅनिटेशनचे दोन पॅड दिले जातील. समाजातील ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे, त्यांनी बालकल्याण संकुल (०२३१-२६२५४२९) किंवा पद्मा तिवले (मो-९८२३१९२९६३) यांच्याशी संपर्क साधावा. जमा झालेली मदत प्रत्यक्ष लाभार्थींच्या हातात दिली जाणार आहे.