शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकशिवाय जगणं- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:00 IST

कुणी काही म्हणा. कितीही सांगा, पण आम्ही प्लास्टिकशिवाय जगायच कसं. असा सवाल दररोजच्या जगण्यात प्लास्टिकशिवाय ज्याचं पानही हलत नाही ते निश्चितपणे विचारतील कारण सकाळी उठल्यानंतर दुधाच्या पिशवीपासून

चंद्रकांत कित्तुरेकुणी काही म्हणा. कितीही सांगा, पण आम्ही प्लास्टिकशिवाय जगायच कसं. असा सवाल दररोजच्या जगण्यात प्लास्टिकशिवाय ज्याचं पानही हलत नाही ते निश्चितपणे विचारतील कारण सकाळी उठल्यानंतर दुधाच्या पिशवीपासून सुरू होणारी प्लास्टिकची गरज दिवसभराच्या दिनक्रमात अनेकवेळा भासते. मात्र, हेच प्लास्टिक मानव जातीच्या मुळावर उठले आहे.

हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. कुणी सांगितले तरी त्याची अमंलबजावणी करायची मानसिकता दिसत नाही. यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी हाच त्यावरचा पर्याय आहे.राज्यात प्लास्टिक बंदी लागू असली तरी आजही काही ठिकाणी प्लास्टिकच्या कॅरीबॅग आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सुरू आहे. प्लास्टिकचा साठा संपविण्यासाठी व्यापाºयांना दिलेली तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत किती काटेकोर राहते, यावर राज्यातून प्लास्टिक हद्दपार होणार की नाही ते ठरेल.

हे सर्व सांगायचे म्हणजे आज जागतिक पर्यावरणदिन सर्वत्र साजरा होत आहे. आजघडीला प्लास्टिक हाच पर्यावरणाला सर्वांत मोठा धोका आहे. उपलब्ध माहितीनुसार जगभरात दर मिनिटाला दहा लाख प्लास्टिकच्या शीतपेयांच्या अथवा पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. वर्षाला एकदाच वापरल्या जाणाºया प्लास्टिकच्या पाच हजार अब्ज पिशव्या वापरल्या जातात. हे प्रमाण प्लास्टिकच्या एकूण उत्पादनाच्या निम्मे आहे. एकदाच वापरल्या जाणाºया या प्लास्टिकच्या वस्तू आपण कुठे टाकतो? एकतर जमिनीत नाहीतर पाण्यात. आज नदी, नाले, ओढे पाहिले असता त्यातील कचºयामध्ये प्लास्टिकच्या वस्तूच जास्त दिसतात. एका अहवालानुसार जगात निर्माण होणाºया प्लास्टिकमधील केवळ नऊ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो. १२ टक्के प्लास्टिक जाळून नष्ट केले जाऊ शकते. उर्वरित ७९ टक्के प्लास्टिकचा कचरा जमिनीवर किंवा अन्यत्र टाकला जातो. तो पूर्णपणे नष्ट होत नाही. या कचºयाचे अवशेष शतकानुशतके राहतात.

अनेक प्लास्टिक वस्तूंचे छोेट्या-छोट्या कणांमध्ये रूपांतर होते. जनावरे आणि मासे यांच्या पोटात हे कण जातात. त्यांच्यामार्फत ते माणसांच्या पोटात जातात आणि आजाराला निमंत्रण देतात. जगातील बहुतांशी जलाशयांमध्ये असे प्लास्टिकचे कण आढळले आहेत. याशिवाय न कुजणारे प्लास्टिक डासांच्या उत्पत्तीलाही कारणीभूत ठरते.प्लास्टिकचे हे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अमेरिका, जपानसह युरोपियन राष्टÑांत प्लास्टिकचा वापर मोठा होत असला तरी हे देश या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यातही आघाडीवर आहेत. जागरुक आहेत. आफ्रिका खंडातील सुमारे २५ देशांनी प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

यातील निम्म्याहून अधिक देशांनी प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय गेल्या चार वर्षांतील आहे. चीन, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या पाच देशांमधून समुद्रात सुमारे ५० टक्के प्लास्टिक कचरा येतो. हे देश वेगाने प्रगती करीत आहेत. तेथील लोकांचे राहणीमान सुधारण्याबरोबरच त्यांच्याकडून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापरही वाढला आहे. यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा या देशांमधून समुद्रात मिसळत आहे. भारतातही प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. याबाबत जनजागृतीचे काम सरकार आणि पर्यावरणवादी संस्थांमार्फत सुरू आहे. त्याला सर्वांनी साथ द्यायला हवी. सिंगापूरमध्ये चॉकलेटचा साधा कागदही रस्त्यावर टाकला जात नाही. कारण तो टाकणाºयाला जबर दंड आकारला जातो. भीतीने का होईना कायदा पाळला जातो. भारतात, महाराष्टÑातही कायद्यांची अशी काटेकोर अंमलबजावणी होईल तेव्हाच आपण प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू शकू.(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.)kollokmatpratisad@gmail.com