शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

शिवार संवाद यात्रेदरम्यान मंत्र्यांशी शाब्दिक वाद

By admin | Updated: May 26, 2017 18:51 IST

विचारलेल्या प्रश्नांना पालकमंत्री तथा महसूलमंत्री समाधानकारक उत्तर न देता बगल देत असल्याच्या समजातून स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमातून बाहेर

 मलकापूर : शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचे दिलेले आश्वासन सरकारकडून कधी पूर्ण होणार आहे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलते करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी साळशी (ता. शाहूवाडी) येथील शिवार संवाद यात्रा कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांतदादांचा थोडावेळ शाब्दिक वाद रंगला. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना पालकमंत्री तथा महसूलमंत्री समाधानकारक उत्तर न देता बगल देत असल्याच्या समजातून स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवार संवाद यात्रेनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे शाहूवाडीतील काही गावांच्या भेटीवर असताना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साळशी गावातील कार्यक्रमात हा प्रकार घडला. दरम्यान साळशी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मंत्री चंद्रकांतदादा पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना कार्यक्रम स्थळाबाहेर थांबलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कृषीपंपाला चोवीस तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, घोटाळेबाज साखर कारखानदारांची पाठराखण थांबवून दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांची तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी करा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शाहूवाडीचे पो. नि. अनिल गाडे यांनी सुरेश म्हाऊटकर (बांबवडे) व अमरसिंह पाटील (साळशी) या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, शिवाजी पाटील, तुकाराम खुटाळे, अजित पाटील, अवधूत जानकर, अनिल पाटील या शिवार संवाद यात्रेवेळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सनदशीर मागार्ने उकल होईल म्हणून आम्ही उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना पालकमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना आमचा आवाज दाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबाब नोंदवून घेतल्यानंतर सोडून दिले.