शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शिवार संवाद यात्रेदरम्यान मंत्र्यांशी शाब्दिक वाद

By admin | Updated: May 26, 2017 18:51 IST

विचारलेल्या प्रश्नांना पालकमंत्री तथा महसूलमंत्री समाधानकारक उत्तर न देता बगल देत असल्याच्या समजातून स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमातून बाहेर

 मलकापूर : शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचे दिलेले आश्वासन सरकारकडून कधी पूर्ण होणार आहे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलते करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी साळशी (ता. शाहूवाडी) येथील शिवार संवाद यात्रा कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांतदादांचा थोडावेळ शाब्दिक वाद रंगला. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना पालकमंत्री तथा महसूलमंत्री समाधानकारक उत्तर न देता बगल देत असल्याच्या समजातून स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवार संवाद यात्रेनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे शाहूवाडीतील काही गावांच्या भेटीवर असताना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साळशी गावातील कार्यक्रमात हा प्रकार घडला. दरम्यान साळशी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मंत्री चंद्रकांतदादा पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना कार्यक्रम स्थळाबाहेर थांबलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कृषीपंपाला चोवीस तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, घोटाळेबाज साखर कारखानदारांची पाठराखण थांबवून दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांची तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी करा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शाहूवाडीचे पो. नि. अनिल गाडे यांनी सुरेश म्हाऊटकर (बांबवडे) व अमरसिंह पाटील (साळशी) या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, शिवाजी पाटील, तुकाराम खुटाळे, अजित पाटील, अवधूत जानकर, अनिल पाटील या शिवार संवाद यात्रेवेळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सनदशीर मागार्ने उकल होईल म्हणून आम्ही उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना पालकमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना आमचा आवाज दाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबाब नोंदवून घेतल्यानंतर सोडून दिले.