शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

चांदी, चंदन, गुटखा, गांजा, जनावरांची तस्करी

By admin | Updated: February 9, 2017 00:13 IST

जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातून जाणारा नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ हा विविध स्वरूपाच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनला आहे.

अतुल आंबी ल्ल इचलकरंजीएस. टी. महामंडळाने ‘प्रवासी वाढवा अभियान’ सुरू केले असले तरी इचलकरंजी बसस्थानकात मात्र वेगळेच अभियान सुरू असल्याचे दिसते. प्रवासी आपणहून गरजेपोटी बसस्थानकावर आले तरी त्यांची गैरसोय झाल्याचे दिसते. परिणामी, प्रवाशांना वडाप व अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे वडाप व बसस्थानकाचे अधिकारी यांच्यात काही लागेबांधे आहेत का? अशी चर्चा प्रवाशांतून होत आहे.इचलकरंजी येथून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक कोलमडले असून, याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. तसेच शाळेच्या वेळेतील बसेसचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी दोन-तीन तास बसस्थानकावरच बसून असतात. कॉलेज, शाळांना सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी दुपारी एक-दोन वाजेपर्यंत उपासमार करीत बसस्थानकावरच घुटमळत असतात. दरम्यानच्या वेळेत विनाकारण टवाळखोरी, कॉमेंटस् याचा सामना विद्यार्थिनींना करावा लागतो, अशा त्रासाला कंटाळून काही विद्यार्थिनी शिक्षण थांबवितात. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज बनली आहे. बसस्थानकातील चौकशी कार्यालयात बस कधी लागणार? अशी विचारणा केली असता आगारातून आली की लावतो, असे उत्तर दिले जाते. प्रवाशांना बस कोठून येते, याबाबत काहीच देणे-घेणे नसते. मात्र, अशा अनपेक्षित उत्तरांमुळे प्रवासी नाइलाजास्तव वडापचा वापर करतात; परंतु विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पास असल्याने त्यांना पर्याय नसतो. त्यामुळे तेथेच बसून राहावे लागते.अनेक एस.टी. बसला नावाच्या पाट्याच लावलेल्या नसतात, तर अनेकवेळा पाटी दुसरी व गाव तिसरेच दिले जाते. त्यामुळे हात दाखवा बस थांबवा, या योजनेला हरताळ फासला जात आहे. बस थांबवून चौकशी केली असता पाटी लावलेल्या गावाला ती बस जात नसल्याचे समजते, तर न पाटी लावलेल्या बसेसमुळेही प्रवासी बुचकळ्यात पडतात. शहरालगत असलेल्या गावांना जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले असून, यामध्ये तत्काळ सुधारणा करावी; अन्यथा ग्रामीण भागातील नागरिक व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)चौकशी केंद्राची उद्धट वर्तणूकचौकशी केंद्रातून प्रवाशांना उद्धट उत्तरे दिली जातात. याबाबत अनेकवेळा तक्रारी होऊनही त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विचारणाऱ्या प्रवाशालाच वयाचे भान न ठेवता उद्धट बोलले जाते. महिलांनाही तशीच वागणूक मिळते. त्यामुळे चौकशी केंद्रात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे, अशी मागणी होत आहे.