शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

चांदी, चंदन, गुटखा, गांजा, जनावरांची तस्करी

By admin | Updated: February 9, 2017 00:13 IST

जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातून जाणारा नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ हा विविध स्वरूपाच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनला आहे.

अतुल आंबी ल्ल इचलकरंजीएस. टी. महामंडळाने ‘प्रवासी वाढवा अभियान’ सुरू केले असले तरी इचलकरंजी बसस्थानकात मात्र वेगळेच अभियान सुरू असल्याचे दिसते. प्रवासी आपणहून गरजेपोटी बसस्थानकावर आले तरी त्यांची गैरसोय झाल्याचे दिसते. परिणामी, प्रवाशांना वडाप व अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे वडाप व बसस्थानकाचे अधिकारी यांच्यात काही लागेबांधे आहेत का? अशी चर्चा प्रवाशांतून होत आहे.इचलकरंजी येथून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक कोलमडले असून, याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. तसेच शाळेच्या वेळेतील बसेसचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी दोन-तीन तास बसस्थानकावरच बसून असतात. कॉलेज, शाळांना सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी दुपारी एक-दोन वाजेपर्यंत उपासमार करीत बसस्थानकावरच घुटमळत असतात. दरम्यानच्या वेळेत विनाकारण टवाळखोरी, कॉमेंटस् याचा सामना विद्यार्थिनींना करावा लागतो, अशा त्रासाला कंटाळून काही विद्यार्थिनी शिक्षण थांबवितात. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज बनली आहे. बसस्थानकातील चौकशी कार्यालयात बस कधी लागणार? अशी विचारणा केली असता आगारातून आली की लावतो, असे उत्तर दिले जाते. प्रवाशांना बस कोठून येते, याबाबत काहीच देणे-घेणे नसते. मात्र, अशा अनपेक्षित उत्तरांमुळे प्रवासी नाइलाजास्तव वडापचा वापर करतात; परंतु विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पास असल्याने त्यांना पर्याय नसतो. त्यामुळे तेथेच बसून राहावे लागते.अनेक एस.टी. बसला नावाच्या पाट्याच लावलेल्या नसतात, तर अनेकवेळा पाटी दुसरी व गाव तिसरेच दिले जाते. त्यामुळे हात दाखवा बस थांबवा, या योजनेला हरताळ फासला जात आहे. बस थांबवून चौकशी केली असता पाटी लावलेल्या गावाला ती बस जात नसल्याचे समजते, तर न पाटी लावलेल्या बसेसमुळेही प्रवासी बुचकळ्यात पडतात. शहरालगत असलेल्या गावांना जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले असून, यामध्ये तत्काळ सुधारणा करावी; अन्यथा ग्रामीण भागातील नागरिक व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)चौकशी केंद्राची उद्धट वर्तणूकचौकशी केंद्रातून प्रवाशांना उद्धट उत्तरे दिली जातात. याबाबत अनेकवेळा तक्रारी होऊनही त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विचारणाऱ्या प्रवाशालाच वयाचे भान न ठेवता उद्धट बोलले जाते. महिलांनाही तशीच वागणूक मिळते. त्यामुळे चौकशी केंद्रात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे, अशी मागणी होत आहे.