शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चांदी, चंदन, गुटखा, गांजा, जनावरांची तस्करी

By admin | Updated: February 9, 2017 00:13 IST

जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातून जाणारा नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ हा विविध स्वरूपाच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनला आहे.

अतुल आंबी ल्ल इचलकरंजीएस. टी. महामंडळाने ‘प्रवासी वाढवा अभियान’ सुरू केले असले तरी इचलकरंजी बसस्थानकात मात्र वेगळेच अभियान सुरू असल्याचे दिसते. प्रवासी आपणहून गरजेपोटी बसस्थानकावर आले तरी त्यांची गैरसोय झाल्याचे दिसते. परिणामी, प्रवाशांना वडाप व अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे वडाप व बसस्थानकाचे अधिकारी यांच्यात काही लागेबांधे आहेत का? अशी चर्चा प्रवाशांतून होत आहे.इचलकरंजी येथून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक कोलमडले असून, याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. तसेच शाळेच्या वेळेतील बसेसचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी दोन-तीन तास बसस्थानकावरच बसून असतात. कॉलेज, शाळांना सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी दुपारी एक-दोन वाजेपर्यंत उपासमार करीत बसस्थानकावरच घुटमळत असतात. दरम्यानच्या वेळेत विनाकारण टवाळखोरी, कॉमेंटस् याचा सामना विद्यार्थिनींना करावा लागतो, अशा त्रासाला कंटाळून काही विद्यार्थिनी शिक्षण थांबवितात. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज बनली आहे. बसस्थानकातील चौकशी कार्यालयात बस कधी लागणार? अशी विचारणा केली असता आगारातून आली की लावतो, असे उत्तर दिले जाते. प्रवाशांना बस कोठून येते, याबाबत काहीच देणे-घेणे नसते. मात्र, अशा अनपेक्षित उत्तरांमुळे प्रवासी नाइलाजास्तव वडापचा वापर करतात; परंतु विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पास असल्याने त्यांना पर्याय नसतो. त्यामुळे तेथेच बसून राहावे लागते.अनेक एस.टी. बसला नावाच्या पाट्याच लावलेल्या नसतात, तर अनेकवेळा पाटी दुसरी व गाव तिसरेच दिले जाते. त्यामुळे हात दाखवा बस थांबवा, या योजनेला हरताळ फासला जात आहे. बस थांबवून चौकशी केली असता पाटी लावलेल्या गावाला ती बस जात नसल्याचे समजते, तर न पाटी लावलेल्या बसेसमुळेही प्रवासी बुचकळ्यात पडतात. शहरालगत असलेल्या गावांना जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले असून, यामध्ये तत्काळ सुधारणा करावी; अन्यथा ग्रामीण भागातील नागरिक व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)चौकशी केंद्राची उद्धट वर्तणूकचौकशी केंद्रातून प्रवाशांना उद्धट उत्तरे दिली जातात. याबाबत अनेकवेळा तक्रारी होऊनही त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विचारणाऱ्या प्रवाशालाच वयाचे भान न ठेवता उद्धट बोलले जाते. महिलांनाही तशीच वागणूक मिळते. त्यामुळे चौकशी केंद्रात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे, अशी मागणी होत आहे.