शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘गावची तहान’ मिटविण्यासाठी धडपडतोय ‘प्रकाश’!

By admin | Updated: May 27, 2016 00:09 IST

टंचाईग्रस्त बुगडीकट्टी : स्वखर्चातून केले ओढापात्राचे रुंदीकरण, बांधला मातीचा बंधारा : लोकमत जलमित्र अभियान

राम मगदूम --गडहिंग्लज --तहानलेल्या गावाची, मायभूमीतील बाया-माणसांची आणि गुरा-ढोरांची तहान मिटविण्यासाठी दूरदेशी राहणारा एक सहृदयी माणूस धडपडतो आहे. स्वत:च्या मिळकतीतून त्याने गावच्या ओढ्याच्या पात्राचे रुंदीकरण केले असून, पाणी अडविण्यासाठी ओढ्यात मातीचा बांधदेखील घातला आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना उजेडाचा रस्ता दाखविणाऱ्या या भूमिपुत्राचे नाव आहे प्रकाश रामचंद्र रेडेकर..!बुगडीकट्टी! गडहिंग्लजच्या दुष्काळी पूर्वभागातील अडीच हजार लोकवस्तीचं गावं. गुडलकोप व बुगडीकट्टीच्या डोंगरात वसलेले आणि विकासापासून वंचित गाव. डोंगरातून वाहणारा ओढा हाच एकमेव जलस्रोत. त्यावर दगडी बंधारे घालून सरकारने गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वर्षांपूर्वी बांधलेले ते बंधारेही डागडुजीअभावी निकामी आणि गाळाने भरले आहेत. पात्रात झाडे-झुडपे वाढल्यामुळे आता ‘ओढा’ देखील शोधावा लागतो.गावाला ना नदी, ना तलाव. त्यामुळे ‘तेरणी’च्या तलावावर नळयोजना राबविली. पण, तलावही पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे ही नळ योजनादेखील कुचकामी ठरली आहे. गावातील सार्वजनिक विहीरदेखील आटली असून, केवळ अर्धा इंच पाणी असणाऱ्या एकमेव बोअरचे पाणीदेखील पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून दोनदाच येणाऱ्या नळाच्या पाण्यासाठी लहान-थोरांसह आया-बहिणींची धावाधाव होते. त्यांचे हाल संपावेत म्हणूनच ‘प्रकाश’ने हे काम केले आहे.डोंगर माथ्यावरून येणारे पाणी ओढ्यात अडविण्यासाठी नवीन बंधारे बांधावेत, यासाठी त्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळेच यंदाच्या दुष्काळाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हे काम केले आहे. असे उपक्रम लोकसहभागातून राबवावेत, इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.