शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘गावची तहान’ मिटविण्यासाठी धडपडतोय ‘प्रकाश’!

By admin | Updated: May 27, 2016 00:09 IST

टंचाईग्रस्त बुगडीकट्टी : स्वखर्चातून केले ओढापात्राचे रुंदीकरण, बांधला मातीचा बंधारा : लोकमत जलमित्र अभियान

राम मगदूम --गडहिंग्लज --तहानलेल्या गावाची, मायभूमीतील बाया-माणसांची आणि गुरा-ढोरांची तहान मिटविण्यासाठी दूरदेशी राहणारा एक सहृदयी माणूस धडपडतो आहे. स्वत:च्या मिळकतीतून त्याने गावच्या ओढ्याच्या पात्राचे रुंदीकरण केले असून, पाणी अडविण्यासाठी ओढ्यात मातीचा बांधदेखील घातला आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना उजेडाचा रस्ता दाखविणाऱ्या या भूमिपुत्राचे नाव आहे प्रकाश रामचंद्र रेडेकर..!बुगडीकट्टी! गडहिंग्लजच्या दुष्काळी पूर्वभागातील अडीच हजार लोकवस्तीचं गावं. गुडलकोप व बुगडीकट्टीच्या डोंगरात वसलेले आणि विकासापासून वंचित गाव. डोंगरातून वाहणारा ओढा हाच एकमेव जलस्रोत. त्यावर दगडी बंधारे घालून सरकारने गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वर्षांपूर्वी बांधलेले ते बंधारेही डागडुजीअभावी निकामी आणि गाळाने भरले आहेत. पात्रात झाडे-झुडपे वाढल्यामुळे आता ‘ओढा’ देखील शोधावा लागतो.गावाला ना नदी, ना तलाव. त्यामुळे ‘तेरणी’च्या तलावावर नळयोजना राबविली. पण, तलावही पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे ही नळ योजनादेखील कुचकामी ठरली आहे. गावातील सार्वजनिक विहीरदेखील आटली असून, केवळ अर्धा इंच पाणी असणाऱ्या एकमेव बोअरचे पाणीदेखील पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून दोनदाच येणाऱ्या नळाच्या पाण्यासाठी लहान-थोरांसह आया-बहिणींची धावाधाव होते. त्यांचे हाल संपावेत म्हणूनच ‘प्रकाश’ने हे काम केले आहे.डोंगर माथ्यावरून येणारे पाणी ओढ्यात अडविण्यासाठी नवीन बंधारे बांधावेत, यासाठी त्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळेच यंदाच्या दुष्काळाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हे काम केले आहे. असे उपक्रम लोकसहभागातून राबवावेत, इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.