शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:56 IST

गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.

ठळक मुद्दे गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक

मच्छिंद्र मगदूम सांगरुळ : गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.

दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक झाली असून त्यांना आता चार-पाच वर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. एक मराठा...लाख मराठा म्हणून एकीची मूठ आवळणाऱ्या मराठा समाजातील असे भाऊबंदकीतील वाद कसे संपवायचे, याचाच विचार होण्याची आता गरज आहे.आरडेवाडी हे सातशे लोकवस्तीचे गाव. हे गाव डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे बागायती क्षेत्र कमी यामुळे बहुतांशी लोक हे शहरातील खासगी कंपनीमध्ये कामाला जातात. गावचे शेतीचे क्षेत्रफळ अल्प असल्याने अल्पभूधारक शेतकरी आहेत. वाकरेकर भावकीची एकूण आठ कुटुंबे. सख्खे चुलतभाऊ असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपूर्वी सहा गुंठे डोंगरातील जमिनीतील गवत कापण्यावरून मारामारी झाली. त्यामध्ये एका २४ वर्षे वयाच्या एकुलत्या तरुणाचा खून झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.या घटनेत गावांतील, पै-पाहुण्यांची किंवा जाणत्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवायला हवा होता; परंतु तसे घडले नाही. भाऊबंदकीचा शाप हा एक समाजाला लागलेला कलंक आहे. दोन्ही कुटुंबांत बरीच वर्षे या जमिनीसाठी वाद चालू होता. एका कुटुंबात वीस तर दुसऱ्या कुटुंबात चौदा सदस्य. ही ताकद समजून दोन्ही कुटुंबे एकमेकांचा द्वेष करू लागली. त्यातून दोन्ही कुटुंबांत टोकाची ईष्या निर्माण झाली.

पाय कुणी मागे घ्यायला तयार नव्हते. शेतीवरून दोन्ही कुटुंबांत अनेक वेळा यापूर्वीही वाद झाले. एकमेकांच्या पिकांची नासधूस करण्यासारखे प्रकार घडले आणि आता शेवटचे टोक गाठले गेले व एक उमलणारे आयुष्य संपले. आता दोन्ही कुटुंबांतील सर्व कर्ती माणसे अटकेत असून घरात फक्त महिला आणि लहान मुलेच आहेत.

त्यामुळे फक्त गवताच्या चार पेंढ्यांसाठी हा वाद करून या दोन कुटुंबांना काय मिळाले याचा विचार करण्याची गरज आहे. या घटनेतून समाजाने बोध घेऊन अशा घटना कशा टाळता येतील हे पाहिले पाहिजे. मराठा समाजापुढील हे महत्त्वाचे आव्हान आहे.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर