शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:56 IST

गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.

ठळक मुद्दे गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक

मच्छिंद्र मगदूम सांगरुळ : गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.

दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक झाली असून त्यांना आता चार-पाच वर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. एक मराठा...लाख मराठा म्हणून एकीची मूठ आवळणाऱ्या मराठा समाजातील असे भाऊबंदकीतील वाद कसे संपवायचे, याचाच विचार होण्याची आता गरज आहे.आरडेवाडी हे सातशे लोकवस्तीचे गाव. हे गाव डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे बागायती क्षेत्र कमी यामुळे बहुतांशी लोक हे शहरातील खासगी कंपनीमध्ये कामाला जातात. गावचे शेतीचे क्षेत्रफळ अल्प असल्याने अल्पभूधारक शेतकरी आहेत. वाकरेकर भावकीची एकूण आठ कुटुंबे. सख्खे चुलतभाऊ असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपूर्वी सहा गुंठे डोंगरातील जमिनीतील गवत कापण्यावरून मारामारी झाली. त्यामध्ये एका २४ वर्षे वयाच्या एकुलत्या तरुणाचा खून झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.या घटनेत गावांतील, पै-पाहुण्यांची किंवा जाणत्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवायला हवा होता; परंतु तसे घडले नाही. भाऊबंदकीचा शाप हा एक समाजाला लागलेला कलंक आहे. दोन्ही कुटुंबांत बरीच वर्षे या जमिनीसाठी वाद चालू होता. एका कुटुंबात वीस तर दुसऱ्या कुटुंबात चौदा सदस्य. ही ताकद समजून दोन्ही कुटुंबे एकमेकांचा द्वेष करू लागली. त्यातून दोन्ही कुटुंबांत टोकाची ईष्या निर्माण झाली.

पाय कुणी मागे घ्यायला तयार नव्हते. शेतीवरून दोन्ही कुटुंबांत अनेक वेळा यापूर्वीही वाद झाले. एकमेकांच्या पिकांची नासधूस करण्यासारखे प्रकार घडले आणि आता शेवटचे टोक गाठले गेले व एक उमलणारे आयुष्य संपले. आता दोन्ही कुटुंबांतील सर्व कर्ती माणसे अटकेत असून घरात फक्त महिला आणि लहान मुलेच आहेत.

त्यामुळे फक्त गवताच्या चार पेंढ्यांसाठी हा वाद करून या दोन कुटुंबांना काय मिळाले याचा विचार करण्याची गरज आहे. या घटनेतून समाजाने बोध घेऊन अशा घटना कशा टाळता येतील हे पाहिले पाहिजे. मराठा समाजापुढील हे महत्त्वाचे आव्हान आहे.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर