शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: March 9, 2017 18:52 IST

गवत कापण्याच्या कारणावरुन वादातून प्रकार

नरगेवाडीतील सख्खा भावाच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षागवत कापण्याच्या कारणावरुन वादातून प्रकारकोल्हापूर : नरगेवाडी (ता. करवीर) येथे गवत कापण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून सख्या भावाचा कुऱ्हाड, खुरप्याने व काठ्याने खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी सुनावली. मधुकर बापू कराळे (वय ४५) असे जन्मठेप झालेल्याचे नांव आहेत.या खटल्याची पार्श्वभूमी अशी , नरगेवाडी येथे दगडू बापू कराळे (वय ६०) व त्यांचा सख्खा भाऊ मधुकर बापू कराळे यांची एकत्र जमीन आहे. या जमिनीत गवताच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होता. दोन डिसेंबर २०१३ ला दगडू कराळे यांना मधुकर कराळे, त्याची पत्नी रंजना, निलेश व त्याचा भाऊ असे चौघांजणांनी गवत कापण्याच्या कारणावरुन रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भांडणे काढली. त्यावेळी रंजनाच्या हातात चटणीच्या पाण्याचे पातेले व खुरपे आणि निलेश व त्याच्या भावाकडे काठ्या होत्या. मधुकरने दगडू कराळे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. पण, त्यांनी तो डाव्या हाताने आडविला. त्यानंतर ही झोंबाझोंबी गावातील मुख्य रस्त्यावर आली. त्याठिकाणी दगडाचा ढिग पडला होता. याचवेळी मधूकरने दगडू कराळे यांच्या छातीवर कुऱ्हाडीने वार केला तर रंजनाने डोक्यावर खुरपे मारले. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेले दगडू कराळे यांची सुभाष व प्रकाश व त्यांची आजी यांना मारहाण केली. या ठिकाणी असलेल्या गणपती सदाशिव सावंत, कृष्णात सावंत, गोविंद सावंत व इतर लोकांनी भांडणे सोडवून जखमी झालेले दगडू कराळे यांना सीपीआरला उपचारासाठी आणले. याठिकाणी दगडू कराळे यांचा मृत्यु झाला.याबाबत दगडू यांचा मुलगा सुभाष कराळे यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानूसार मधुकर कराळे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अवचट यांनी दगडू कराळे यांच्या खून प्रकरणी मधुकर कराळेला जन्मठेपेचे शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर मधुकरची पत्नी रंजनी (वय ३५) व मुलगा निलेश उर्फ सरदार मधुकर कराळे (२७ दोघे राहणार नरगेवाडी) या दोघांना ३२५ कलमाखाली दोषी ठरवून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व अटकेपासून भोगत असलेली कैदीची शिक्षा सुनावली.या खटल्यात १५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्ष घटना पाहणारे सुभाष कराळे यांचा भाऊ प्रकाश, शेजारील कृष्णा सावंत, तपासी अधिकारी संभाजी गायकवाड, गजेंद्र पालवे, अंजुम शेख यांची साक्ष ग्राह्य आणि सरकारी वकील अ‍ॅड. अशोक रणदिवे यांच्या तक्रारी ग्राह्य मानून अवचट यांनी शिक्षा सुनावली.