शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादातून घटना : आरळे येथील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 10:00 IST

यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला.

ठळक मुद्दे इतर आरोपी झाले निर्दोष

कोल्हापूर : आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असलेले पांडुरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा २१ फेबु्रवारी २००८ रोजी राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाो पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर) यांना दोषी ठरवत गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गावातील सरपंच पदाची निवडणूक २००८ ला बिनविरोध झाली. त्या कारणाने भरत भाऊसाो पाटील व त्यांच्या गटातील कार्यकर्ते नाराज होते; त्यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील व भरत पाटील या दोन राजकीय गटांमध्ये वैमनस्य झाले होते. या घटनेवरून २१ फेबु्रवारी २००८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांच्या गटातील लोक काठ्या, कुºहाडी व तलवार, आदी शस्त्र घेऊन त्यांनी हिंदुराव पाटील गटातील लोक व संस्थेचे उपाध्यक्ष मृत पांडुरंग देसाई यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, सुरेश पाटील यांनी आपल्याकडील बंदुकीने पांडुरंग देसाई यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते मृत झाले. त्यानंतर पोलिसांनी भरत पाटील यांच्यासह पांडुरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारूती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी अन्य चार व वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यासोबतच न्यायवैद्य प्रयोगशाळेचा बॅलेस्टिक अहवाल व सरकारी वकील अ‍ॅड. एन. बी. आयरेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय