शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

राजकीय वादातून घटना : आरळे येथील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 10:00 IST

यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला.

ठळक मुद्दे इतर आरोपी झाले निर्दोष

कोल्हापूर : आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असलेले पांडुरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा २१ फेबु्रवारी २००८ रोजी राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाो पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर) यांना दोषी ठरवत गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गावातील सरपंच पदाची निवडणूक २००८ ला बिनविरोध झाली. त्या कारणाने भरत भाऊसाो पाटील व त्यांच्या गटातील कार्यकर्ते नाराज होते; त्यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील व भरत पाटील या दोन राजकीय गटांमध्ये वैमनस्य झाले होते. या घटनेवरून २१ फेबु्रवारी २००८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांच्या गटातील लोक काठ्या, कुºहाडी व तलवार, आदी शस्त्र घेऊन त्यांनी हिंदुराव पाटील गटातील लोक व संस्थेचे उपाध्यक्ष मृत पांडुरंग देसाई यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, सुरेश पाटील यांनी आपल्याकडील बंदुकीने पांडुरंग देसाई यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते मृत झाले. त्यानंतर पोलिसांनी भरत पाटील यांच्यासह पांडुरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारूती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी अन्य चार व वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यासोबतच न्यायवैद्य प्रयोगशाळेचा बॅलेस्टिक अहवाल व सरकारी वकील अ‍ॅड. एन. बी. आयरेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय