शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास व्हावा

By admin | Updated: April 23, 2015 00:33 IST

व्ही. एम. चव्हाण : शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्रीय ग्रंथांचे प्रकाशन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास व्हावा. शिवाय त्यावर उपाययोजना सुचविल्या जाव्यात. विद्यापीठातील संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना विशेषत: शेतकऱ्यांना व्हावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांनी मंगळवारी येथे केले. अर्थशास्त्र विभागातर्फे डॉ. हिंदुराव संकपाळ यांच्या ‘हायर एज्युकेशन थ्रू अर्न अ‍ॅन्ड लर्न’, डॉ. विजय पाटील यांच्या ‘इन इकॉनॉमिक असेसमेंट आॅफ जवान वेल्स अंडर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम इन सांगली डिस्ट्रीक्ट’ या ग्रंथांचे प्रकाशन मानव्यशास्त्र सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील प्रमुख उपस्थित होते.डॉ. चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निर्दालन अशा संशोधनपर ग्रंथांमधून निश्चित होणार आहे. प्रकाशित ग्रंथांपैकी एका ग्रंथामध्ये कोरड्या जमिनींचा आणि दुसऱ्या ग्रंथांत कोरड्या घशाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यासाठी प्रयत्न आणखी जोमाने करण्याची गरज आहे. डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, दोन्ही ग्रंथांचे स्वरुप कॅपिटल फॉर्मेशनचे आहे. जगाच्या विकासामधील सगळ्या अनुभवांमध्ये भांडवल हा मूळ गाभा आहे. विहीर हे विकासाचे प्रतीक आहे. भांडवल विकासाचे साधन आहे. गेल्या ५० वर्षांपासून सिंचनाचे प्रमाण १७ ते १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. महाराष्ट्राची ७३ ते ८४ टक्के शेती कोरडवाहू आहे. वाढलेल्या सिंचनाचे श्रेय केवळ शेतकऱ्यांना द्यावे लागेल, सरकारला नाही.ांशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहोचला पाहिजे.डॉ. भोईटे म्हणाले, समाजघटकांच्या सद्य:स्थितीचा विचार करणारे हे दोन ग्रंथ आहेत. ते विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत. यावेळी डॉ. विजय पाटील, हिंदुराव संकपाळ यांची भाषणे झाली. प्रा. विजय ककडे यांनी स्वागत केले. डॉ. एम. बी. देशमुख यांनी आभार मानले.