शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास व्हावा

By admin | Updated: April 23, 2015 00:33 IST

व्ही. एम. चव्हाण : शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्रीय ग्रंथांचे प्रकाशन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास व्हावा. शिवाय त्यावर उपाययोजना सुचविल्या जाव्यात. विद्यापीठातील संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांना विशेषत: शेतकऱ्यांना व्हावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांनी मंगळवारी येथे केले. अर्थशास्त्र विभागातर्फे डॉ. हिंदुराव संकपाळ यांच्या ‘हायर एज्युकेशन थ्रू अर्न अ‍ॅन्ड लर्न’, डॉ. विजय पाटील यांच्या ‘इन इकॉनॉमिक असेसमेंट आॅफ जवान वेल्स अंडर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम इन सांगली डिस्ट्रीक्ट’ या ग्रंथांचे प्रकाशन मानव्यशास्त्र सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील प्रमुख उपस्थित होते.डॉ. चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निर्दालन अशा संशोधनपर ग्रंथांमधून निश्चित होणार आहे. प्रकाशित ग्रंथांपैकी एका ग्रंथामध्ये कोरड्या जमिनींचा आणि दुसऱ्या ग्रंथांत कोरड्या घशाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यासाठी प्रयत्न आणखी जोमाने करण्याची गरज आहे. डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, दोन्ही ग्रंथांचे स्वरुप कॅपिटल फॉर्मेशनचे आहे. जगाच्या विकासामधील सगळ्या अनुभवांमध्ये भांडवल हा मूळ गाभा आहे. विहीर हे विकासाचे प्रतीक आहे. भांडवल विकासाचे साधन आहे. गेल्या ५० वर्षांपासून सिंचनाचे प्रमाण १७ ते १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. महाराष्ट्राची ७३ ते ८४ टक्के शेती कोरडवाहू आहे. वाढलेल्या सिंचनाचे श्रेय केवळ शेतकऱ्यांना द्यावे लागेल, सरकारला नाही.ांशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहोचला पाहिजे.डॉ. भोईटे म्हणाले, समाजघटकांच्या सद्य:स्थितीचा विचार करणारे हे दोन ग्रंथ आहेत. ते विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत. यावेळी डॉ. विजय पाटील, हिंदुराव संकपाळ यांची भाषणे झाली. प्रा. विजय ककडे यांनी स्वागत केले. डॉ. एम. बी. देशमुख यांनी आभार मानले.