शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळमध्ये पाणी साठले पुनर्वसनासाठी सकारात्मक राहू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले यांची खंतही वाटते. यासाठी सकारात्मक राहून प्रश्न सोडवू या, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

समरजित घाटगे म्हणाले, प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने उत्तूर, गडहिंग्लज परिसर सुजलाम्-सुफलाम् होणार आहे. कै. बाबासाहेब कुपेकर यांनी हे धरण उभारण्याचे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. त्यांच्या पश्चात पूर्ण होऊन या धरणात पाणीसाठा होत आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे.

युती शासनाच्या काळात या प्रकल्पास मंजुरी मिळाली. सव्वा टीएमसी पाणी क्षमतेचे या प्रकल्पास ३० कोटी रुपये निधीची तरतूद केली होती. मात्र, या मंजुरीनंतर सत्तांतर होऊन आघाडीचे सरकार सत्तेत आले. आघाडी सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीअभावी या प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले. परिणामी प्रकल्पाची किंमत वाढत गेली. २०१८ मध्ये ती २३० कोटीपर्यंत गेली. निधीअभावी पुन्हा काम थांबले. निधीअभावी थांबलेले काम पूर्ण होण्यासाठी २०१८ मध्ये मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून २२७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली. १८ वर्षांत धरणाचे २५ टक्के काम झाले होते आणि २२७ कोटींचे पॅकेज दिल्यानंतर दीड वर्षात उर्वरित काम झाले. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. धरणाच्या कामासह पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध असतानाही त्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये अस्वस्थता पसरून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जर धरण पूर्ण झाले तर आपले पुनर्वसन होणार नाही. त्यामुळे त्यांनी आधी पुनर्वसन मगच धरण अशा पद्धतीची भूमिका घेतली. यावर मी स्वत: धरणस्थळी जाऊन विस्थापित शेतक-यांबरोबर चर्चा केली होती. प्रकल्पाच्या कामास चालना मिळाली.