शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

आंबेओहोळमध्ये पाणी साठले पुनर्वसनासाठी सकारात्मक राहू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले यांची खंतही वाटते. यासाठी सकारात्मक राहून प्रश्न सोडवू या, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

समरजित घाटगे म्हणाले, प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने उत्तूर, गडहिंग्लज परिसर सुजलाम्-सुफलाम् होणार आहे. कै. बाबासाहेब कुपेकर यांनी हे धरण उभारण्याचे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. त्यांच्या पश्चात पूर्ण होऊन या धरणात पाणीसाठा होत आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे.

युती शासनाच्या काळात या प्रकल्पास मंजुरी मिळाली. सव्वा टीएमसी पाणी क्षमतेचे या प्रकल्पास ३० कोटी रुपये निधीची तरतूद केली होती. मात्र, या मंजुरीनंतर सत्तांतर होऊन आघाडीचे सरकार सत्तेत आले. आघाडी सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीअभावी या प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले. परिणामी प्रकल्पाची किंमत वाढत गेली. २०१८ मध्ये ती २३० कोटीपर्यंत गेली. निधीअभावी पुन्हा काम थांबले. निधीअभावी थांबलेले काम पूर्ण होण्यासाठी २०१८ मध्ये मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून २२७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली. १८ वर्षांत धरणाचे २५ टक्के काम झाले होते आणि २२७ कोटींचे पॅकेज दिल्यानंतर दीड वर्षात उर्वरित काम झाले. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. धरणाच्या कामासह पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध असतानाही त्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये अस्वस्थता पसरून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जर धरण पूर्ण झाले तर आपले पुनर्वसन होणार नाही. त्यामुळे त्यांनी आधी पुनर्वसन मगच धरण अशा पद्धतीची भूमिका घेतली. यावर मी स्वत: धरणस्थळी जाऊन विस्थापित शेतक-यांबरोबर चर्चा केली होती. प्रकल्पाच्या कामास चालना मिळाली.