शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठरलं बघा... नक्की बघा...! -- मी पाहिलेली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 19:14 IST

मी त्या वेळेला न्यू कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम.मध्ये होतो. मंगळवार पेठेत भाड्याने खोली घेऊन राहत होतो; परंतु आम्ही गावात त्यावेळी शेका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होतो.

ठळक मुद्देया निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय..’ ही कॅचलाईन फेमस केलीसाहेब निवडून आले तर गुलालाने कपडे रंगणार म्हणून आम्ही त्यावेळी जुनी कपडे घालून गेलो होतो

- विश्र्वास पाटीलमी त्या वेळेला न्यू कॉलेजमध्ये एस. वाय. बी. कॉम.मध्ये होतो. मंगळवार पेठेत भाड्याने खोली घेऊन राहत होतो; परंतु आम्ही गावात त्यावेळी शेका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९८९ च्या निवडणुकीत शेका पक्षातर्फे गोविंदराव कलिकते यांनी काँग्रेसचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना कडवे आव्हान दिले होते.

गायकवाड यांच्याबद्दल त्या निवडणुकीत मतदारांत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे पूर्ण मतदारसंघात कलिकते यांची हवा तयार झाली होती. त्यांचे खटारा (गाडी) हे चिन्ह होते. प्लास्टिकची लाल गाडी खिशाला लावून तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर प्रचारात उतरले होते.कलिकते यांची प्रचारात हवा करण्याची हातोटी होती. त्यावेळी आचारसंहितेचा बडगा नव्हता. त्यामुळे खर्चावर बंधन नव्हते. कलिकते १९८५ ला जिल्ह्यातील मातब्बर नेते श्रीपतराव बोंद्रे यांचा पराभव करून सांगरूळ विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले होते. त्यामुळेही त्यांच्या नेतृत्वाबद्दल मतदारसंघात क्रेझ होती. त्यावेळी भोगावती कारखान्याची सत्ताही त्यांच्याकडेच होती.

सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शेका पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी होती. त्या बळावर त्यांनी या मैदानात शड्डू ठोकला होता. बिंदू चौकात एक भला मोठा फलक लावला होता. त्यावर गायकवाड यांचा उल्लेख ‘मौनी बाबा’ असा केला होता. कोल्हापूर शहरातूनच कलिकते यांना जास्त प्रतिसाद होता. कलिकते यांनी काढलेल्या प्रचारफेरीस प्रचंड प्रतिसाद होता. त्या फेरीत ‘गोंधळ’ हा सजीव देखावा होता. त्यातील गोंधळी ‘ठरलं बघा... नक्की बघा...!’ एवढंच म्हणायचा. लोक त्याला हात उंचावून प्रतिसाद द्यायचे. आता या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय..’ ही कॅचलाईन फेमस केली, त्यावेळी ‘ठरलं बघा...’ ही कॅचलाईन लोकांच्या तोंडात होती.

प्रचाराची सांगता करतेवेळी त्यांनी काढलेली मिरवणूक विरोधी उमेदवारास धडकी भरविणारी होती. त्यावेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रचार केला जाई. त्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली एवढी मोठी होती की तिची सुरुवात बिंदू चौकात आणि शेवट पुईखडीला होता. या प्रचारात आलेल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी भोगावती कारखान्याच्या संचालकांच्या घरांतून भाकरी व झुणका दिला जाई. कुरुकलीचे बळी यशवंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असे. वातावरण एकदम चांगले होते. त्यामुळे सीट नक्की बसणार याचा आत्मविश्वास होता. त्यामुळे मी कलिकते यांचा मतमोजणी प्रतिनिधी होतो. साहेब निवडून आले तर गुलालाने कपडे रंगणार म्हणून आम्ही त्यावेळी जुनी कपडे घालून गेलो होतो. वातावरण चांगले होते; परंतु कागलला राजीव गांधी यांची सभा झाली व गडहिंग्लज मतदारसंघात समाजवाद्यांनी कलिकते यांना मदत केली नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी वीस हजारांचे लीड गायकवाड यांना मिळाले व त्याच मतांवर ते विजयी झाले. त्यांनाही आपण निवडून येणार याचा आत्मविश्वास नव्हता. पहाटे चार वाजता गुलाल अंगावर घेऊनच ते मतमोजणी केंद्रात आले. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर