शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसाठी फेरजुळणी करूया : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा बँक कशा पद्धतीने चालविली आहे, याचे साक्षीदार आमदार पी. एन. पाटील आहेत. राजकारणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा बँक कशा पद्धतीने चालविली आहे, याचे साक्षीदार आमदार पी. एन. पाटील आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेकांना मदत केल्याने बँकेने ८ हजार कोटी ठेवींचा, तर १५० कोटी नफ्याचा टप्पा पार केला. निवडणूक लढविण्यास कोणाला विरोध नाही. सतेज पाटील, पी. एन. पाटील व आघाडीचे नेते आपण सगळे एकत्र येऊन बँकेसाठी फेरजुळणी करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राजीव गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी शाहू बोर्डिंगमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकाऱ्यांमुळे राहुल पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्याचे सांगत आमदार पी. एन. पाटील म्हणाले, गेल्या ३५ वर्षांत काँग्रेस सोडून मी काही केले नाही. सर्वच निवडणुकीत पक्ष आदेश देईल त्यांच्यासोबत राहिलो. राहुल पाटील अध्यक्ष व्हावेत, असे सामान्य माणसाला वाटत होते. त्यानुसार मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांना भेटलो.

मंत्री सतेज पाटील म्हणाले, अध्यक्ष निवडीच्या अगोदर बेळगावमध्ये मंत्री मुश्रीफ व आपली भेट झाली, त्यावेळी तुम्ही व पी. एन. पाटील एकत्र बसून तिढा सोडवा, असे सांगितले होते. सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना अध्यक्ष, उपाध्यक्षासह सभापती निवडी होईपर्यंत कोल्हापूर सोडले नाही. राहुल पाटील हे तरुण व अभ्यासू आहेत, आपण पालकमंत्री व हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असल्याने निधीची काळजी करू नका. राहुल यांनी संधीचे सोने करत कर्तृत्व सिद्ध करावे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘पी. एन.’ हे आपल्यापेक्षा सहा महिन्याने मोठे असले तरी दोघांचा राजकीय प्रवास सारखाच आहे. कधीही दुजाभाव केला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पी. एन. पाटील इतरांसाेबत जाणार असल्याच्या वावड्या उठत आहेत.

बंटी, वरना खेल खत्म...

विधानसभेच्या अगोदर , ‘बंटी , खेल खत्म करो, वरना अपना खेल खत्म होगा’ असा सल्ला सतेज पाटील यांनी दिला होता. एकसंधपणे लढल्यानेच जिल्ह्यात भाजप ‘झिरो’ राहिला. आगामी काळात भाजपला रोखायचे असेल तर आपण एकत्र राहिले पाहिजे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

शेट्टींनी थोडे थांबावे

महापुराची मदत देणार आहे. राजू शेट्टींनी थोडे थांबावे. मोर्चे, आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे. मदत मिळाली नाहीतर जरुर मोर्चे काढा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

पुढची विधानसभा लढविणार

पी. एन. पाटील यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. ते किती वेळा निवडणुका लढविणार हे माहिती नाही. मात्र, आपण आणखी एक लढविणार आहे. राहुल यांचे भवितव्य चांगले आहे. कारण त्यांचा स्वभाव तडजोडीचा आहे, असे सांगत ‘करवीर’ मधून राहुल यांना पुढे करावे, असा अप्रत्यक्ष सल्ला मुश्रीफ यांनी दिला.

बिनविरोधसाठी माझा स्वार्थ

पहिल्या अडीच वर्षांतच राहुल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले असते, त्यांचे नाव मीच घेतले. यासाठी पी. एन. पाटील यांच्या घरी गेलो होतो. मला वाटले महादेवराव महाडिक काय करणार नाही, ते पाटील यांना हो म्हणतील. मात्र, जिल्ह्यातील काही शक्ती राहुल यांना होऊ द्यायच्या नाहीत यासाठी प्रयत्नशील होत्या. यामुळे त्यांना यातना झाल्या. आता राहुल भेटल्यानंतरच अध्यक्ष करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.