शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

कंत्राटी कामगार कायद्यात बदल केल्यास रस्त्यावर उतरू : जगताप

By admin | Updated: December 5, 2014 00:46 IST

राज्य सरकारकडून दुजोरा दिला जात आहे

कोल्हापूर : कंत्राटी कामगारांना दहा वर्षांत कायम करावे, अशी कायद्यात तरतूद असताना, या कायद्यामध्येच बदल करण्याचा घाट केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्याला राज्य सरकारकडून दुजोरा दिला जात आहे. या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरणार असून, याच पद्धतीने कष्टकऱ्यांच्या बाबतीत सरकार डोळ्यांवर झापड लावून चालल्यास प्रसंगी हिंसक आंदोलन करू, असा इशारा आज, गुरुवारी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला.जगताप म्हणाले, सध्या कामगार कायदे बदलण्याचा घाट घातला जात आहे. वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची संख्या हासुद्धा एक ज्वलंत विषय झालेला आहे. वाढती महागाई आणि व्यवस्थापनाचे कामगारांना कमीत कमी पगारात राबविण्याचे धोरण त्याचबरोबर कंत्राटीकरण याविरुद्ध आंदोलन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटी कामगार कायम नसल्याने आम्हाला परवडत नाही, या नावाखाली कायद्याने कामगारांसाठी अभिप्रेत असणाऱ्या सुविधा व फायदे कंपन्यांकडून दिले जात नाहीत. राज्यात नव्यानेच सत्तेवर आलेल्या सरकारने कोणती तत्परता दाखविली असेल तर ती म्हणजे केंद्र सरकारने घाट घातलेल्या कंत्राटी कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर कॉँग्रेस सत्तेत असणाऱ्या ५८ वर्षांच्या कार्यकाळात कंपन्या बंद करण्याची परवानगी सरकारने कधीही कंपनीच्या मालकांना दिली नाही परंतु आता कामगार संख्येचे कारण पुढे करत त्या बंद करण्याची परवानगी देण्याचे षङ्यंत्र भाजप सरकारकडून रचले जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यांमध्ये हे धोरण राबविले आहे. महाराष्ट्रात अद्याप हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसली तरी त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्याला कडाडून विरोध केला जाणार आहे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच ंविधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी कॉँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता हा आमचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी आज, गुरुवारी येथे व्यक्त केला. त्याचबरोबर ‘एकांडा शिलेदार’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या ताकदीवर ६३ आमदार निवडून आणून आपले नेतृत्व सिद्ध केले, असेही ते म्हणाले.