शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

रक्ताचे नाही, पाण्याचे पाट वाहू द्या; सुळकूड पाणी योजनेवरुन प्रकाश आवाडेंचा मंत्री मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:14 IST

लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे ही दुकानदारी

इचलकरंजी : तुमच्याकडे कोण बघत नाहीत, ते बघावं म्हणून तुम्ही आंदोलन करता. शासनाने योजना मंजूर केली आहे, ती रद्द केली नाही. पाणी देतो म्हणून शासनाने मला विश्वास दिला आहे. मी सुळकूडचे पाणी आणणारच आहे. तरीही मग आंदोलनाची गरज का? मुद्दाम राजकारण सुरू आहे. त्यासाठी घोळका करून काहींनी दुकाने चालू केली आहेत, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी कोणाचेही नाव न घेता केला.येथील घोरपडे नाट्यगृह चौकात ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते.आवाडे म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी विनंती करूया. तुम्ही आंदोलन केले, तर तेही आंदोलन करतील. तुम्ही शिव्या दिल्या, तर तेही देतील. यातून चर्चेनेच मार्ग काढणे योग्य ठरणार आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी कागदपत्रे घेऊन पालकमंत्र्यांकडे समजून सांगण्यासाठी जातो. पाण्यासाठी काहीही करतो आणि हा प्रश्न सोडवतो. मात्र, काही मंडळी घोळका करून कायम विरोधात आहेत. हीच मंडळी कृष्णा योजनेवेळी विरोधात होती. ह्यो उलटी गंगा आणायला चाललायं, असे म्हणत होते. आजही तिच परिस्थिती आहे. आवाडेंच्या विरोधात बोलल्याशिवाय यांना जमत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊया.सुरुवातीला आयजीएम, संजय गांधी निराधार योजना, कोरोना काळात केलेले काम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वस्त्रोद्योगासाठी नक्कीच दिलासादायक काहीतरी करू, असे आश्वासन दिले. प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत व राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले. उर्मिला गायकवाड यांनी आभार मानले.

लोकसभा लढवूताराराणी पक्ष कसा स्थापन झाला आणि त्याची जडणघडण याबाबत सविस्तर माहिती देऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूकही लढवू, अशी तयारी असल्याचे माजी जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी सभेमध्ये सांगितले.बॅलेट मशीन कमी पडेलसध्या गावात घोळका करून काहीजण एकत्र आले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर मी पुढं, काय तू पुढं म्हणून हे सगळे उभारतील. कारण खूपजणांना निवडणूक लढवायची आहे. कदाचित बॅलेट मशीनवर जागा कमी पडेल, असा टोला आवाडेंनी विरोधकांनी लगावला.पालकमंत्री पाण्याचे पाट वाहू द्यासण आहे, जरा सबुरीनं घ्या, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ देतात. मात्र, त्यांच्याकडून रक्ताचे पाट वाहण्याची भाषा येत होती. आमच्याकडून पाण्याचे पाट वाहू द्यात, अशीच भाषा येणार आणि आम्ही सुळकूडमधूनच पाणी आणणार.फायली का अडवतात?गावात पाणीसाठा करण्यासाठी सहा नवीन टाक्या शासनाच्या मागे लागून मंजूर करून आणल्या. त्याच्या फायली काहींनी मुंबईत अडविल्या. त्या फायली का अडवतात, हे आता सर्वांना माहीतच आहे, असे म्हणून टक्केवारीबाबत खोचक टीका केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडेHasan Mushrifहसन मुश्रीफ