शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शेतकऱ्यांना नागविणाऱ्या सरकारला नमवू

By admin | Updated: June 6, 2017 00:55 IST

संपतराव पवार : तहसील कार्यालयासमोर केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आतापर्यंतच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, त्यामुळे कर्जमाफी देऊन कोण उपकार करत नाही. शेतकऱ्यांना नागविणाऱ्या सरकारला नमविल्याशिवाय आता थांबायचे नाही, असा इशारा माजी आमदार संपतराव पवार यांनी दिला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतून दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढून करवीर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना संपतराव पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. सरकार गेंड्याच्या कातडीचे असून त्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नसल्याचे सांगत पवार म्हणाले, अल्प भूधारकांना कर्जमाफी देण्याचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वच राज्यकर्त्यांनी फसवले आहे, आता हे चालणार नसून आमची धूळफेक करणाऱ्यांना उधळून लावल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. गेली पाच दिवस शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, पण सरकार असंवेदनशील असल्याने त्यांच्यावर काहीच फरक पडलेला नाही. येत्या चार दिवसांत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल. जमिनीत कसे पेरायचे आणि त्याची काढणी कशी करायची, याचे ज्ञान शेतकऱ्यांना चांगले आहे, त्यामुळे कोणी शेतकऱ्यांना भीती घालू नये; पण एक लक्षात ठेवा शेतकऱ्यांना नागवणाऱ्या सरकारला नमविल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा संपतराव पवार यांनी दिला. यावेळी मागणीचे निवेदन करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘भोगावती’ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे संचालक अमित कांबळे, बाबूराव कदम, पोपट ढवण, सरदार पाटील, डी. पी. कांबळे, तुकाराम खराडे, कुमार जाधव, संग्राम माने, मधुकर हरेल, सुशांत बोरगे, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदार उत्तम दिघे यांना मागण्यांचे निवेदन संपतराव पवार यांनी दिले.