शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

ऊस आंदोलनासह विधान परिषदेचे राजकारण तापले

By admin | Updated: December 15, 2015 23:42 IST

स्वाभिमानी आक्रमक : निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर -संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस बिलाबरोबरच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऊसबिलाचा तोडगा निघाला असला तरी ८०/२० फॉर्म्युल्याचा तोडगा अद्याप सुटलेला नाही. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार असल्याने दोन्ही उमेदवारांनी या तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तालुक्यात ऊसदर व विधानपरिषदेचे राजकारण चांगलेच तापले आहे.जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी ५ डिसेंबरचा अल्टिमेटम शासन व कारखानदारांना दिला होता. शासनपातळीवर बैठक होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. ११ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य साखर संघाचे अध्यक्ष व शेतकरी संघटनांचे नेते, साखर कारखान्यांना पतपुरवठा करणाऱ्या बॅँकांचे प्रतिनिधी यांची बैठक होऊन ८०/२० फॉर्म्युल्याने ऊस बिल देण्याचा तोडगा काढण्यात आला. ज्या कारखान्याला जितकी एफआरपी बसेल त्याच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ऊस तोडणी झाल्यानंतर १४ दिवसांत देण्याचा व २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचा निर्णय झाला होता. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हिरवा कंदील दाखवीत १३ डिसेंबरचे चक्का जाम आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप सर्वच कारखानदारांनी याबाबत मौन बाळगले आहे. काही कारखाने १७०० रुपयेप्रमाणे दर देण्याबाबत हालचाली करीत असल्याची कुणकुण लागताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांच्या विभागीय शेती कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन केले. तसेच १६ डिसेंबरपासून ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिला आहे.शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यासाठी नागपूर विधानभवन परिसरात घोषणाबाजी करून निदर्शने केली होती. स्वाभिमानीबरोबर शिवसेनाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार पाटील यांनी दाखवून दिले होते.शेतकरी चिंताग्रस्तजिल्ह्यातील नेते विधानपरिषदेच्या राजकारणात व्यस्त असताना शेतकरी मात्र ऊस बिलाच्या चिंतेने ग्रस्त झाला आहे. स्वाभिमानीने आजपासून पुन्हा ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिल्याने व विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणावरून शिरोळ तालुका चांगलाच तापला आहे.ऊसपट्ट्यात टोकाचा संघर्षऊसपट्ट्यात कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. तालुक्यात ५३ मतदार असून, उमेदवाराच्या विजयात तालुका किंगमेकर ठरणार आहे. जयसिंगपूर पालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २३ व अपक्ष दोन नगरसेवक आहेत, तर कुरुंदवाड पालिकेत १९ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेच्या आठपैकी पाच स्वाभिमानी, दोन कॉँग्रेस व एक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतिपद स्वाभिमानीकडेच आहे. असे एकूण ५३ मतदार असल्याने जिल्ह्यातील नेतेमंडळींचे लक्ष याच तालुक्याकडे लागले आहे. विधानपरिषदेच्या गोळाबेरजेत उमेदवार कितपत यशस्वी होतात, शिवाय आगामी नगरपालिका निवडणुकीतील डावपेच कसे राहतात, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.