शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

ऊस आंदोलनासह विधान परिषदेचे राजकारण तापले

By admin | Updated: December 15, 2015 23:42 IST

स्वाभिमानी आक्रमक : निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर -संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस बिलाबरोबरच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऊसबिलाचा तोडगा निघाला असला तरी ८०/२० फॉर्म्युल्याचा तोडगा अद्याप सुटलेला नाही. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार असल्याने दोन्ही उमेदवारांनी या तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तालुक्यात ऊसदर व विधानपरिषदेचे राजकारण चांगलेच तापले आहे.जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी ५ डिसेंबरचा अल्टिमेटम शासन व कारखानदारांना दिला होता. शासनपातळीवर बैठक होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. ११ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य साखर संघाचे अध्यक्ष व शेतकरी संघटनांचे नेते, साखर कारखान्यांना पतपुरवठा करणाऱ्या बॅँकांचे प्रतिनिधी यांची बैठक होऊन ८०/२० फॉर्म्युल्याने ऊस बिल देण्याचा तोडगा काढण्यात आला. ज्या कारखान्याला जितकी एफआरपी बसेल त्याच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ऊस तोडणी झाल्यानंतर १४ दिवसांत देण्याचा व २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचा निर्णय झाला होता. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हिरवा कंदील दाखवीत १३ डिसेंबरचे चक्का जाम आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप सर्वच कारखानदारांनी याबाबत मौन बाळगले आहे. काही कारखाने १७०० रुपयेप्रमाणे दर देण्याबाबत हालचाली करीत असल्याची कुणकुण लागताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांच्या विभागीय शेती कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन केले. तसेच १६ डिसेंबरपासून ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिला आहे.शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यासाठी नागपूर विधानभवन परिसरात घोषणाबाजी करून निदर्शने केली होती. स्वाभिमानीबरोबर शिवसेनाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार पाटील यांनी दाखवून दिले होते.शेतकरी चिंताग्रस्तजिल्ह्यातील नेते विधानपरिषदेच्या राजकारणात व्यस्त असताना शेतकरी मात्र ऊस बिलाच्या चिंतेने ग्रस्त झाला आहे. स्वाभिमानीने आजपासून पुन्हा ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिल्याने व विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणावरून शिरोळ तालुका चांगलाच तापला आहे.ऊसपट्ट्यात टोकाचा संघर्षऊसपट्ट्यात कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. तालुक्यात ५३ मतदार असून, उमेदवाराच्या विजयात तालुका किंगमेकर ठरणार आहे. जयसिंगपूर पालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २३ व अपक्ष दोन नगरसेवक आहेत, तर कुरुंदवाड पालिकेत १९ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेच्या आठपैकी पाच स्वाभिमानी, दोन कॉँग्रेस व एक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतिपद स्वाभिमानीकडेच आहे. असे एकूण ५३ मतदार असल्याने जिल्ह्यातील नेतेमंडळींचे लक्ष याच तालुक्याकडे लागले आहे. विधानपरिषदेच्या गोळाबेरजेत उमेदवार कितपत यशस्वी होतात, शिवाय आगामी नगरपालिका निवडणुकीतील डावपेच कसे राहतात, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.