शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

ऊस आंदोलनासह विधान परिषदेचे राजकारण तापले

By admin | Updated: December 15, 2015 23:42 IST

स्वाभिमानी आक्रमक : निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर -संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस बिलाबरोबरच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऊसबिलाचा तोडगा निघाला असला तरी ८०/२० फॉर्म्युल्याचा तोडगा अद्याप सुटलेला नाही. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका किंगमेकर ठरणार असल्याने दोन्ही उमेदवारांनी या तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तालुक्यात ऊसदर व विधानपरिषदेचे राजकारण चांगलेच तापले आहे.जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी ५ डिसेंबरचा अल्टिमेटम शासन व कारखानदारांना दिला होता. शासनपातळीवर बैठक होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. ११ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य साखर संघाचे अध्यक्ष व शेतकरी संघटनांचे नेते, साखर कारखान्यांना पतपुरवठा करणाऱ्या बॅँकांचे प्रतिनिधी यांची बैठक होऊन ८०/२० फॉर्म्युल्याने ऊस बिल देण्याचा तोडगा काढण्यात आला. ज्या कारखान्याला जितकी एफआरपी बसेल त्याच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना ऊस तोडणी झाल्यानंतर १४ दिवसांत देण्याचा व २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचा निर्णय झाला होता. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हिरवा कंदील दाखवीत १३ डिसेंबरचे चक्का जाम आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप सर्वच कारखानदारांनी याबाबत मौन बाळगले आहे. काही कारखाने १७०० रुपयेप्रमाणे दर देण्याबाबत हालचाली करीत असल्याची कुणकुण लागताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांच्या विभागीय शेती कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन केले. तसेच १६ डिसेंबरपासून ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिला आहे.शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यासाठी नागपूर विधानभवन परिसरात घोषणाबाजी करून निदर्शने केली होती. स्वाभिमानीबरोबर शिवसेनाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार पाटील यांनी दाखवून दिले होते.शेतकरी चिंताग्रस्तजिल्ह्यातील नेते विधानपरिषदेच्या राजकारणात व्यस्त असताना शेतकरी मात्र ऊस बिलाच्या चिंतेने ग्रस्त झाला आहे. स्वाभिमानीने आजपासून पुन्हा ऊसतोड व वाहतूक बंदचा इशारा दिल्याने व विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणावरून शिरोळ तालुका चांगलाच तापला आहे.ऊसपट्ट्यात टोकाचा संघर्षऊसपट्ट्यात कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक सरळ लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. तालुक्यात ५३ मतदार असून, उमेदवाराच्या विजयात तालुका किंगमेकर ठरणार आहे. जयसिंगपूर पालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २३ व अपक्ष दोन नगरसेवक आहेत, तर कुरुंदवाड पालिकेत १९ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेच्या आठपैकी पाच स्वाभिमानी, दोन कॉँग्रेस व एक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतिपद स्वाभिमानीकडेच आहे. असे एकूण ५३ मतदार असल्याने जिल्ह्यातील नेतेमंडळींचे लक्ष याच तालुक्याकडे लागले आहे. विधानपरिषदेच्या गोळाबेरजेत उमेदवार कितपत यशस्वी होतात, शिवाय आगामी नगरपालिका निवडणुकीतील डावपेच कसे राहतात, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.