शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

डाव्यांचा आज मुंबईत महामोर्चा

By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST

पानसरे हत्या प्रकरण : मारेकऱ्यांच्या अटकेसाठी राज्यातील ६० हजार कार्यकर्ते रवाना

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यासाठी सर्व डाव्या पक्षांतर्फे आज, बुधवारी मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आणि पुरोगामी चळवळीतील सुमारे पाच हजार कार्यकर्ते मंगळवारी मुंबईला रवाना झाले आहेत. या मोर्चात महाराष्ट्रातील सुमारे साठ हजार कार्यकर्ते सहभाग घेणार आहेत. भायखळा येथील राणीच्या बागेपासून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी दीड वाजता हा मोर्चा सीएसटी परिसरातील आझाद मैदान येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, माकपचे सचिव अशोक ढवळे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, प्रताप होगाडे यांच्यासह डाव्या आणि पुरोगामी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पानसरेंच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीचे निवेदन देण्यात येईल. या मोर्चात महाराष्ट्रभरातील सर्व डाव्या व पुरोगामी पक्षांचे सुमारे साठ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी आझाद मैदान येथे दोन हजार चौरस फूट आवारात मंडप तयार केला आहे. इथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत पानसरेंच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा, नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरातून पाच हजार कार्यकर्ते रवाना कोल्हापूर शहरातून या मोर्चासाठी पाच हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी कोयना एक्स्प्रेसने सुमारे १३०० कार्यकर्ते रवाना झाले. सायंकाळी महालक्ष्मी रेल्वेने दीड हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेसचे जनरल डबे मंगळवारी फुल्ल झाले. कार्यकर्त्यांसाठी कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेतर्फे वीस ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली होती.