शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

लोकहिताचा वसा आणि वारसा जपणारे बावनकशी नेतृत्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

मुरगुडसारख्या ग्रामीण भागात १९६४ मध्ये जन्म झालेल्या प्रा. संजय मंडलिक यांना जन्मापासूनच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले. १९८६ मध्ये ...

मुरगुडसारख्या ग्रामीण भागात १९६४ मध्ये जन्म झालेल्या प्रा. संजय मंडलिक यांना जन्मापासूनच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले. १९८६ मध्ये ते शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून त्यांची राजकारणाला सुरुवात झाली. महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.मध्ये काम सुरू केले. त्यामुळे विविध नेत्यांशी संपर्क होत गेला. १९९७ मध्ये ते गोकुळ दूध संघाचे संचालक झाले तर याचवर्षी बोरवडे जि. प. मतदारसंघातून निवडून आले तसेच २०१४ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. या दोन वर्षांच्या काळात त्यांनी जि.प.चे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी ‘पावनखिंड’हे मासिकही सुरू केले.

सर्व पक्षांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी वाखणण्याजाेगी आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात या स्वभावाचे प्रत्यंतर आले होते त्याचेच प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले. सर्वांशी सलोखा राखत त्यांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळविले. गेल्या १६ वर्षांपासून ते सहकार बोर्डाचे ही अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक तसेच शिवराज शिक्षण संस्थेचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत त्यांचे शिक्षण आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान आहे. चांगल्या संबंधामुळे ते लोकसभेवर उच्चांकी मताधिक्कयाने निवडून आले.

दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून मंडलिक गटाचे नेतृत्व खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी सक्षमपणे सांभाळले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मंडलिक नावाचा दबदबा गेल्या पाच पन्नास वर्षांपासून कायम आहे.अशा बावन्नकशी नेतृत्वाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा...!

............

उठावदार कामगिरी....

कोट्यवधींचा निधी खेचून आणत जिल्ह्यातील वाडयावस्त्या,धनगरवाडे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.

गडहिंग्लज, राधानगरीतील विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधीला मंजुरी.

राधानगरी धरणाच्या सुशोभीकरणासाठीही निधी.

कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याच्या मागणीला पाठबळ.

ईएसआयसी हाॅस्पिटलसाठी निधी.

कागल-सातारा महामार्ग सहापदरीकरण,

इएसआयसी हाॅस्पिटल सुरू होण्यासाठी पाठपुरावा. मतदारसंघातील रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी निधी.

........

संयम व धीरोधात्त अंगभूत गुण ...

राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर नेत्याला कार्यकर्त्यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण असते त्यामुळे दिवंगत मंडलिकांनी कोणताही राजकीय निर्णय घेताना त्यांच्याशी बोलूनच निर्णय घेतला. त्याच धर्तीवर प्रा मंडलिक यांनी राजकीय रणनीती अवलंबली आहे. वरवर जहाल व्यक्तिमत्त्व वाटत असले तरी प्रा. मंडलिक हे अत्यंत संवेदनशील आणि संयमानेच वाटचाल करताना दिसतात. किंबहुना याचा प्रत्ययच या लोकसभा निवडणुकीत आला.

शब्दांकन : दत्तात्रय पाटील (म्हाकवे)