शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शहरातील मद्य व्यापाऱ्यांना एलबीटी

By admin | Updated: August 9, 2016 00:03 IST

राज्य शासनाचा निर्णय : १४ आॅगस्टपर्यंत हरकती; मनपा उत्पन्नात आठ कोटींची भर

कोल्हापूर : महापालिकेची विस्कटत निघालेली आर्थिक घडी सावरण्यासाठी आता मद्यावरील कराचा आधार घ्यावा लागणार आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वप्रकारच्या मद्यावर एलबीटी आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत वर्षाला सुमारे सात ते आठ कोटी रुपयांची भर पडणार आहे. वार्षिक ५० कोटी रुपयांच्या आत उलाढाल असणाऱ्या कोल्हापूर शहरातील सुमारे ३०० मद्य व्यापारी या कक्षेत येत असून, त्यांना येत्या १६ आॅगस्टपासून हा स्थानिक कर लागू करण्यात येणार आहे. अशा संस्थांना नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.काँग्रेस सरकारने सन २०११ मध्ये व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील जकात रद्द करून स्थानिक संस्था कर (एलबीटी) सुरू केला; परंतु एलबीटीलासुद्धा व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप-शिवसेनेने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ता आल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांची व्यावसायिक उलाढाल ५० कोटींच्या आत आहे त्यांना ‘एलबीटी’मधून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयामुळे बहुतांशी व्यापाऱ्यांची कराच्या ओझ्यातून सुटका झाली पण महानगरपालिकांच्या उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झाली होती; पण शासनाने महानगरपालिकेना तुटपुंजे अनुदान रूपाने देऊन तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात अपेक्षित भर पडली नाही. सत्तेतील भाजप-शिवसेना सरकारने महापालिका क्षेत्रात ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या मद्य व्यापाऱ्यांवरही एलबीटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच कोल्हापूर महानगरपालिकेला मिळाले आहे. त्यानुसार संपूर्ण कोल्हापूर शहरात वॉईन्स शॉपी, बिअर शॉपी, बिअर बार असे सुमारे ३०० मद्य व्यापारी असून त्यांच्यावर एलबीटी आकारण्यात येणार आहे. त्यांच्याकडून महानगरपालिकेस सुमारे सात-आठ कोटी रुपये वार्षिक जादा उत्पन्न मिळणार आहे. यापूर्वी ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या फक्त १६ व्यापाऱ्यांकडून वार्षिक किमान १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते; पण आता मद्य व्यापाऱ्यांना लावलेल्या एलबीटीमुळे या उत्पन्नात भर पडणार आहे. राज्य शासनाच्यावतीने याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेला हरकती व सूचना असतील तर दि. १४ आॅगस्टपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर १६ आॅगस्टनंतर अशा ५० कोटींपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याही मद्य व्यापाऱ्यांना स्थनिक संस्था कर नियमाखाली नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचा विरोधमद्यावरील एलबीटीची पुन:श्च आकारणी करणे अयोग्य असून या निर्णयाचा पुनर्विचार करून नव्याने मद्य व मद्यार्कापासून बनविलेल्या वस्तूंवर लावण्यात आलेला एलबीटी रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी पाठविले होते; पण त्याचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर चेंबरचा हा विरोध कायम राहणार आहे. आता जीएसटी सुरू होणार असल्याने व त्याची संकल्पना ही समान व्यापार संधीच्या आधारावर अवलंबून असल्याने पुन:श्च एलबीटी करप्रणाली सुरू करणे चुकीचे असल्याची मत चेंबरच्यावतीने केले आहे.