शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेतील आर्यांसाठीच कायद्यात बदल : दत्ता देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:50 IST

उत्तरेतील आर्यांसाठीच कायद्यात बदल केला जात आहे. यामुळेच दक्षिणमधील देशांचा यामध्ये समावेश केला नाही. यावरून त्यांचा डाव स्पष्ट होत असल्याचा आरोप पुणे येथील ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दत्ता देसाई यांनी केला.

ठळक मुद्देउत्तरेतील आर्यांसाठीच कायद्यात बदल : दत्ता देसाईनागरिकत्व दुरुस्ती कायद्यामधून छुपा अजेंडा

कोल्हापूर : भारतातील नागरिकांची नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सीएए) हे सरकारचा छुपा अजेंडा आहे. उत्तरेतील आर्यांसाठीच कायद्यात बदल केला जात आहे. यामुळेच दक्षिणमधील देशांचा यामध्ये समावेश केला नाही. यावरून त्यांचा डाव स्पष्ट होत असल्याचा आरोप पुणे येथील ‘भाकप’चे ज्येष्ठ नेते दत्ता देसाई यांनी केला. टाऊन हॉल उद्यानामध्ये रविवारी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’च्या वतीने ‘संविधान बचाव अभियानां’तर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.देसाई म्हणाले, आसाममध्ये १५ लाख हिंदू बाहेरून आलेले आहेत. त्यांना भारतीय करण्यासाठी हे कायदे आणले जात आहेत. यामध्ये मुस्लिमांना वगळल्यामुळेच जनआंदोलन सुरू झाले आहे. १९५५ मध्ये केलेल्या कायद्यामध्ये धार्मिक असा उल्लेख केलेला नव्हता.

गेल्या तीन वर्षांत अफगानिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान येथून केवळ ४५00 आश्रयासाठी आले आहेत. या लोकांसाठी सर्व देशाला वेठीस धरण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. देशामध्ये सध्या रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड अशी अनेक सरकारी दस्तऐवज आहेत. डिजीटल युग असल्याचे म्हटले जाते. ९५ टक्के लोकांकडे अशा प्रकारची कार्ड आहेत. मग नव्याने कागदपत्र देण्यासाठी सरकार नागरिकांना त्रास का देत आहे.तिन्ही कायद्यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे समर्थन करण्याचा दावा भंपक आहे. २00३ पासून याचे नियोजन सुरू आहे. मागच्या दाराने एका विशिष्ट धर्मातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधान हे सर्वोच्च आहे. धर्मनिरपेक्ष भारताच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

यामुळे युवापिढी रस्त्यावर आली आहे. यामध्ये सर्व स्थरांतील लोक आहेत. नवा भारत तयार होत आहे. हे विशेष आहे. सरकारमधील नेत्यांचा हिरो हिटलर जरी असला, तरी येथील लोकशाही जागृत आहे; त्यामुळे गॅस चेंबरचे कृत्य त्यांना येथे करता येणार नाही, असे देसाई यांनी ठणकावून सांगितले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. मेघा पानसरे, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, संभाजी जगदाळे, तनूजा शिपूरकर, आदी उपस्थित होते.सरकार टिकविण्यासाठी विभागणीची खेळीनवीन कायद्याच्या माध्यमात सरकारचा छुपा अजेंडा आहे. ‘एनपीआर’मधून धार्मिक ओळख निर्माण करणे, कोणत्या समाजाचे नागरिक आहे, हे पाहण्यात येणार आहे. याचा वापर वोट बँकेसाठी करण्यात येणार आहे. कागदपत्रासांठी नागरिकांना पळापळी करायला लावून देशात असुरक्षित वातावरण निर्माण केले जात आहे. पुढील निवडणुकीत याचा फायदा घेण्याबरोबरच सरकार टिकविण्यासाठीची ही खेळी असल्याचा आरोपही देसाई यांनी सांगितले.देसाई म्हणाले

  •  बांगलादेशसोबत भारताचा प्रत्यारोपनाचा करारच नाही. येथील लोकांना तिकडे पाठविणे अशक्य
  •  नवीन कायद्याला जुमानणार नाही, असा देशातील सर्व राज्यांनी ठराव करावा.
  •  कायद्याला विरोध करणाऱ्या राज्याला कलम ३६५ वापरून बरखास्त करण्याचा धोका. राज्य, केंद्र यांच्यात संघर्ष अटळ.

नागरिकांची नोंदणी नको, बेरोजगाराची नोंद करा, निराधार महिला, शेतकरी, असंघटित कामगार, शिक्षणापासून वंचित असणारे यांची नोंद करा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर