शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शरद पवार यांच्याकडून नाराजीला उशीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला, आता तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला, आता तर राज्याचे आर्थिक आणि वैद्यकीय वाटोळे झाले आहे, खूप नुकसानही होऊन गेले आहे. आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी खूप मोठी भूमिका बजावायला हवी होती, त्यांचा अंकुश असायला हवा होता, पण सत्तास्थापन होऊन दीड वर्ष झाले तरी त्यांनी केले नाही, आता २८ नोव्हेंबरला दोन वर्षे होतील, पण तोपर्यंत सरकार टिकले तर अशी खोचक टिप्पणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.

आमदार पाटील म्हणाले, रोज एवढ्या बैठका होत आहेत, संजय राऊत इकडून तिकडे धावत आहेत, बैठका घ्यायच्याच असतील तर एकत्र घ्या, त्या राऊतांना एवढे धावायला कशाला लावता.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फसवणूक होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी १९९४ व २०१४ चा अपवाद वगळता केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता होती, इतकी वर्षे सत्ता असतानाही आरक्षण देऊ शकला नाही, याउलट फडणवीस यांनी ते दिले, न्यायालयात ते टिकवून दाखवले. उलट दोन्ही कॉंग्रेसनेच जनतेला फसवले.

चौकट

एवढ्या संस्था कशा?

केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर अनेक नेत्यांनी आपले आणि समाजाचे कल्याण केले, पण मराठा समाजातील नेत्यांनी ते केले नाही, इतरांपेक्षा स्वत:चे कल्याण जास्त बघितले. नाही तर बंद पडणाऱ्या स्कूटरवरून फिरणाऱ्यांकडे एवढ्या संस्थाचा पसारा कुठून आला असता, अशी टीका आमदार पाटील यांनी केली.

चाैकट

मुश्रीफ यांचे कौतुक

मी काहीही बोललो तरी मुश्रीफ त्याला प्रत्युत्तर देतात हे बघून ते मला महत्त्व देतात याचे कौतुक वाटते, असा पलटवार आमदार पाटील यांनी केला.