शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

ज्येष्ठ मल्लांचे मानधन तीन वर्षे थकीत अपुर्‍या निधीचे कारण : उतारवयात मारावे लागत आहेत क्रीडा कार्यालयात हेलपाटे

By admin | Updated: May 10, 2014 00:12 IST

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर गेली तीन वर्षे राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर गेली तीन वर्षे राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऐन तारुण्यात लाल मातीत दबदबा राखणारे व उर्वरित आयुष्यात आखाड्याशी एकनिष्ठ राहिलेल्या या मल्लांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी या मानधनाचाच आधार आहे. मात्र निधीच्या कमतरतेचे कारण सांगून गेली तीन वर्षे मानधन देण्यात टाळाटाळ होत असल्याने या मल्लांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील हिंदकेसरी, डबल महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी, आदी स्पर्धांमध्ये यश मिळवून राज्याचा नावलौकिक वाढविणार्‍या ज्येष्ठ व वयाने साठी ओलांडलेल्या मल्लांना १९९५-९६ मध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या युतीच्या काळात व मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यामुळे दरमहा मानधन देण्याचा निर्णय झाला. १९९६ मध्ये सुरू झालेले मानधन अगदी विनाथकीत मे २०११ पर्यंत मिळत होते. मात्र, यानंतर अचानकपणे राज्य शासनाने हे मानधन देणे बंद केले. तब्बल ३६ महिने झाले हे मानधन अद्यापही दिलेले नाही. आपल्या उतारवयातही क्रीडा कार्यालयात हेलपाटे मारून मंत्र्यांना निवेदन देऊन ही मंडळी आता घाईला आली आहेत. या मानधनावरच आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याने उसनवारीही करावी लागत आहे. त्यांनी गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यांनी मी त्वरीत मानधन सुरू करतो असे अश्वासन दिले होते. तत्काळ मी सर्व मल्लांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गाठ घालून देतो असे सांगीतले होते मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे. अगदी परवापर्यंत जिल्'ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या ज्येष्ठ मल्लांच्या थकीत मानधनाविषयी क्रीडा खात्याकडे पाठपुरावा करून तातडीने मानधन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं असा सवाल या मल्लांकडून विचारला जात आहे. आयुष्यभर कष्ट आणि उतारवयात आजारपण आयुष्यभर कुस्ती आणि कुस्तीच याचा विचार करून काही मल्लांनी आपले घरदार सोडून तालीम हीच आपली आई व घर म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले होते. तारुण्यात अनेक मैदाने या मल्लांनी गाजविली. मात्र, उतारवयात उदरनिर्वाह चालण्यासाठी शासनाने दिलेल्या या मानधनावर काही ज्येष्ठ मल्ल उदारनिर्वाह करत आहेत. मात्र मानधनच न मिळाल्याने हे मल्ल हवालदिल झाले आहेत. मानधनाचे बजेटच अपुरे राज्य शासनाने क्रीडा खात्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या मल्लांना अपुरा निधी मंजूर केला होता. त्यामुळे गेले तीन वर्षे हे मानधन रखडले होते. याचबरोबर ज्येष्ठ खेळाडूंची संख्या वाढत आहे येणारा निधी अपुरा आहे. त्यामुळ े हे मानधन या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र, येत्या आठ दिवसांत हे मानधन थेट या खेळाडूंच्या नावावर बँकेत जमा करण्यात येणार असून या प्रस्तावावर नुकतीच राज्याचे क्रीडा संचालकांनी सही केली आहे -नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी