शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले

By admin | Updated: June 13, 2017 01:09 IST

केंद्राच्या कर्जमाफीनंतरची स्थिती : ३७ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे पुन्हा थकबाकीदार

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीनंतर दहा वर्षाने राज्याने कर्जमाफी जाहीर केली आहे; पण जिल्हा बँकेशी संलग्न कर्जपुरवठा व थकबाकीदारांची संख्या पाहिली तर गेल्या दहा वर्षांत जवळपास ३७ हजार शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाले असून, त्यांचे २८० कोटींचे कर्ज थकले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने २००८ ला देशातील शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. सततची नापिकी व शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर २००७ अखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा व धाडसी निर्णय घेतला होता. कर्ज थकविणाऱ्यांनाच कर्जमाफी दिल्याने राज्यात कमालीचा असंतोष पसरल्याने राज्य सरकारने प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. जिल्हा बँकेच्या पातळीवर केंद्राच्या कर्जमाफीतून २७४ कोटींची कर्जमाफी झाली. त्यातील ‘नाबार्ड’ने ११२ कोटी अपात्र ठरविले होते. अपात्र रकमेपैकी सुमारे ४७ कोटींची वसुली बँक पातळीवर झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या ३४५ कोटींच्या थकबाकीत अपात्रमधील ६५ कोटी दिसत आहेत. ढोबळमानाने गेल्या दहा वर्षांत ३७ हजार शेतकऱ्यांकडे २८० कोटी थकल्याचे स्पष्ट होते. पाच एकरांवरील३७८४ थकबाकीदारराज्य सरकारने पाच एकराच्या आतील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याने जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण जिल्हा बँकेचे पाच एकरावरील ३ हजार ७८४ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे तब्बल २२ कोटी १० लाखाची थकीत कर्ज आहे. या शेतकऱ्यांच्या वसुलीचा मोठा प्रश्न जिल्हा बँकेसमोर आहे. दृष्टिक्षेपात केंद्राची कर्जमाफीथकबाकी - १ एप्रिल १९९७ ते ३१ डिसेंबर २००७ पर्यंतजिल्हा बँकेने सादर केलेला प्रस्ताव - २ लाख ९ हजार३१९ शेतकरीरक्कम - २९३ कोटी ७८ लाख मंजूर - २७४ कोटी अपात्र- ११२ कोटी (४४ हजार ६५९ खाती)प्रत्यक्षात लाभ- १६१ कोटी ११ लाख जिल्हा बँकेचे कर्ज वाटपपाच एकरांपर्यंतशेतकरी - २ लाख ९ हजार ५११कर्ज- १५१५ कोटीपाच एकरांवरीलशेतकरी-५६ हजार ९२कर्ज-४८४ कोटी