शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले

By admin | Updated: June 13, 2017 01:09 IST

केंद्राच्या कर्जमाफीनंतरची स्थिती : ३७ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे पुन्हा थकबाकीदार

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीनंतर दहा वर्षाने राज्याने कर्जमाफी जाहीर केली आहे; पण जिल्हा बँकेशी संलग्न कर्जपुरवठा व थकबाकीदारांची संख्या पाहिली तर गेल्या दहा वर्षांत जवळपास ३७ हजार शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाले असून, त्यांचे २८० कोटींचे कर्ज थकले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने २००८ ला देशातील शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. सततची नापिकी व शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर २००७ अखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा व धाडसी निर्णय घेतला होता. कर्ज थकविणाऱ्यांनाच कर्जमाफी दिल्याने राज्यात कमालीचा असंतोष पसरल्याने राज्य सरकारने प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. जिल्हा बँकेच्या पातळीवर केंद्राच्या कर्जमाफीतून २७४ कोटींची कर्जमाफी झाली. त्यातील ‘नाबार्ड’ने ११२ कोटी अपात्र ठरविले होते. अपात्र रकमेपैकी सुमारे ४७ कोटींची वसुली बँक पातळीवर झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या ३४५ कोटींच्या थकबाकीत अपात्रमधील ६५ कोटी दिसत आहेत. ढोबळमानाने गेल्या दहा वर्षांत ३७ हजार शेतकऱ्यांकडे २८० कोटी थकल्याचे स्पष्ट होते. पाच एकरांवरील३७८४ थकबाकीदारराज्य सरकारने पाच एकराच्या आतील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याने जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण जिल्हा बँकेचे पाच एकरावरील ३ हजार ७८४ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे तब्बल २२ कोटी १० लाखाची थकीत कर्ज आहे. या शेतकऱ्यांच्या वसुलीचा मोठा प्रश्न जिल्हा बँकेसमोर आहे. दृष्टिक्षेपात केंद्राची कर्जमाफीथकबाकी - १ एप्रिल १९९७ ते ३१ डिसेंबर २००७ पर्यंतजिल्हा बँकेने सादर केलेला प्रस्ताव - २ लाख ९ हजार३१९ शेतकरीरक्कम - २९३ कोटी ७८ लाख मंजूर - २७४ कोटी अपात्र- ११२ कोटी (४४ हजार ६५९ खाती)प्रत्यक्षात लाभ- १६१ कोटी ११ लाख जिल्हा बँकेचे कर्ज वाटपपाच एकरांपर्यंतशेतकरी - २ लाख ९ हजार ५११कर्ज- १५१५ कोटीपाच एकरांवरीलशेतकरी-५६ हजार ९२कर्ज-४८४ कोटी