शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले

By admin | Updated: June 13, 2017 01:09 IST

केंद्राच्या कर्जमाफीनंतरची स्थिती : ३७ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे पुन्हा थकबाकीदार

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीनंतर दहा वर्षाने राज्याने कर्जमाफी जाहीर केली आहे; पण जिल्हा बँकेशी संलग्न कर्जपुरवठा व थकबाकीदारांची संख्या पाहिली तर गेल्या दहा वर्षांत जवळपास ३७ हजार शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाले असून, त्यांचे २८० कोटींचे कर्ज थकले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने २००८ ला देशातील शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. सततची नापिकी व शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर २००७ अखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा व धाडसी निर्णय घेतला होता. कर्ज थकविणाऱ्यांनाच कर्जमाफी दिल्याने राज्यात कमालीचा असंतोष पसरल्याने राज्य सरकारने प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. जिल्हा बँकेच्या पातळीवर केंद्राच्या कर्जमाफीतून २७४ कोटींची कर्जमाफी झाली. त्यातील ‘नाबार्ड’ने ११२ कोटी अपात्र ठरविले होते. अपात्र रकमेपैकी सुमारे ४७ कोटींची वसुली बँक पातळीवर झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या ३४५ कोटींच्या थकबाकीत अपात्रमधील ६५ कोटी दिसत आहेत. ढोबळमानाने गेल्या दहा वर्षांत ३७ हजार शेतकऱ्यांकडे २८० कोटी थकल्याचे स्पष्ट होते. पाच एकरांवरील३७८४ थकबाकीदारराज्य सरकारने पाच एकराच्या आतील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याने जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण जिल्हा बँकेचे पाच एकरावरील ३ हजार ७८४ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे तब्बल २२ कोटी १० लाखाची थकीत कर्ज आहे. या शेतकऱ्यांच्या वसुलीचा मोठा प्रश्न जिल्हा बँकेसमोर आहे. दृष्टिक्षेपात केंद्राची कर्जमाफीथकबाकी - १ एप्रिल १९९७ ते ३१ डिसेंबर २००७ पर्यंतजिल्हा बँकेने सादर केलेला प्रस्ताव - २ लाख ९ हजार३१९ शेतकरीरक्कम - २९३ कोटी ७८ लाख मंजूर - २७४ कोटी अपात्र- ११२ कोटी (४४ हजार ६५९ खाती)प्रत्यक्षात लाभ- १६१ कोटी ११ लाख जिल्हा बँकेचे कर्ज वाटपपाच एकरांपर्यंतशेतकरी - २ लाख ९ हजार ५११कर्ज- १५१५ कोटीपाच एकरांवरीलशेतकरी-५६ हजार ९२कर्ज-४८४ कोटी