शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गत हंगामातील ११९ कोटींचे ऊसबिल थकीत

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

कोल्हापूर विभाग : एफआरपीप्रमाणे मिळणारी रक्कम; शासनाची मवाळ भूमिका; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

प्रकाश पाटील -- कोपार्डे---उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे देय असणारी शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर वर्ग करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने केलेला असला तरी त्याची अंमलबजावणी कारखानदारांच्या सोयीनेच केली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. हंगाम २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) साखर कारखान्यांकडे ११९ कोटी १२ लाख रुपये आजही थकीत असल्याची साखर आयुक्तालयातून आकडेवारी उपलब्ध झाली आहे. शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ प्रमाणे कृषिमूल्य आयोगाने जाहीर केलेले उचित व लाभकारी मूल्य देणे (एफआरपी) बंधनकारक आहे. शेतातील ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी लागते. हंगाम २०१४-१५ साठी पहिल्या ९.५ टक्के उताऱ्यासाठी २२०० रुपये व पुढील प्रत्येकी एक टक्क्यावर २२२ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागाचा उतारा पाहता २३०० ते २६५० सरासरी एफआरपी बसत होती. सर्वसाधारण कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर देण्यास प्राधान्य दिले, मात्र सांगली जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिला हप्ता एफआरपीप्रमाणे न देता १८०० ते २००० रुपये प्रतिटन दिला.मात्र, एफआरपीप्रमाणे उर्वरित रक्कम देणे सर्वच कारखान्यांना साखरेचे दर घसरल्याने कठीण झाले. याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्राला एक हजार ९५० कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. राज्य शासनाने या कर्जाच्या व्याजाचा भार आपल्यावर घेतला. एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठीच हे कर्ज होते. प्रथम ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते; पण काही तांत्रिक त्रुटी राहू नयेत म्हणून पुन्हा ते कारखानदारांकडे वर्ग करण्यात आले. याचा फायदा कारखानदारांना झाला. आजही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे हंगाम २०१४-१५ च्या हंगामातील एक हजार १६ कोटी रुपये एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. यात पुणे विभागात सर्वांत जास्त ५९२ कोटी ५ लाख, तर कोल्हापूर विभागात ११९ कोटी १२ लाख रुपये थकबाकी आहे.यावर्षीचा (हंगाम २०१५-१६) गाळप परवाना देताना शासनानेही एफआरपीच्या कायद्यात मवाळ भूमिका घेतली आहे. १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना दुसरा हंगाम सुरू व्हायची वेळ आली असतानाही ती न देणाऱ्या कारखानदारांवर कायद्याने कारवाई करण्याऐवजी आणखी एक महिन्याची मुदत देऊन कारखानदारांच्या सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.