शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

गत हंगामातील ११९ कोटींचे ऊसबिल थकीत

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

कोल्हापूर विभाग : एफआरपीप्रमाणे मिळणारी रक्कम; शासनाची मवाळ भूमिका; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

प्रकाश पाटील -- कोपार्डे---उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे देय असणारी शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर वर्ग करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने केलेला असला तरी त्याची अंमलबजावणी कारखानदारांच्या सोयीनेच केली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. हंगाम २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) साखर कारखान्यांकडे ११९ कोटी १२ लाख रुपये आजही थकीत असल्याची साखर आयुक्तालयातून आकडेवारी उपलब्ध झाली आहे. शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ प्रमाणे कृषिमूल्य आयोगाने जाहीर केलेले उचित व लाभकारी मूल्य देणे (एफआरपी) बंधनकारक आहे. शेतातील ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी लागते. हंगाम २०१४-१५ साठी पहिल्या ९.५ टक्के उताऱ्यासाठी २२०० रुपये व पुढील प्रत्येकी एक टक्क्यावर २२२ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागाचा उतारा पाहता २३०० ते २६५० सरासरी एफआरपी बसत होती. सर्वसाधारण कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर देण्यास प्राधान्य दिले, मात्र सांगली जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिला हप्ता एफआरपीप्रमाणे न देता १८०० ते २००० रुपये प्रतिटन दिला.मात्र, एफआरपीप्रमाणे उर्वरित रक्कम देणे सर्वच कारखान्यांना साखरेचे दर घसरल्याने कठीण झाले. याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्राला एक हजार ९५० कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. राज्य शासनाने या कर्जाच्या व्याजाचा भार आपल्यावर घेतला. एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठीच हे कर्ज होते. प्रथम ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते; पण काही तांत्रिक त्रुटी राहू नयेत म्हणून पुन्हा ते कारखानदारांकडे वर्ग करण्यात आले. याचा फायदा कारखानदारांना झाला. आजही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे हंगाम २०१४-१५ च्या हंगामातील एक हजार १६ कोटी रुपये एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. यात पुणे विभागात सर्वांत जास्त ५९२ कोटी ५ लाख, तर कोल्हापूर विभागात ११९ कोटी १२ लाख रुपये थकबाकी आहे.यावर्षीचा (हंगाम २०१५-१६) गाळप परवाना देताना शासनानेही एफआरपीच्या कायद्यात मवाळ भूमिका घेतली आहे. १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना दुसरा हंगाम सुरू व्हायची वेळ आली असतानाही ती न देणाऱ्या कारखानदारांवर कायद्याने कारवाई करण्याऐवजी आणखी एक महिन्याची मुदत देऊन कारखानदारांच्या सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.