शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
2
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
3
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
4
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
5
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
6
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
7
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
8
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
9
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
10
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
11
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
12
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
13
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
14
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
15
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
16
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
17
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
20
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स

गत हंगामातील ११९ कोटींचे ऊसबिल थकीत

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

कोल्हापूर विभाग : एफआरपीप्रमाणे मिळणारी रक्कम; शासनाची मवाळ भूमिका; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

प्रकाश पाटील -- कोपार्डे---उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे देय असणारी शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर वर्ग करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने केलेला असला तरी त्याची अंमलबजावणी कारखानदारांच्या सोयीनेच केली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. हंगाम २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) साखर कारखान्यांकडे ११९ कोटी १२ लाख रुपये आजही थकीत असल्याची साखर आयुक्तालयातून आकडेवारी उपलब्ध झाली आहे. शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ प्रमाणे कृषिमूल्य आयोगाने जाहीर केलेले उचित व लाभकारी मूल्य देणे (एफआरपी) बंधनकारक आहे. शेतातील ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी लागते. हंगाम २०१४-१५ साठी पहिल्या ९.५ टक्के उताऱ्यासाठी २२०० रुपये व पुढील प्रत्येकी एक टक्क्यावर २२२ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागाचा उतारा पाहता २३०० ते २६५० सरासरी एफआरपी बसत होती. सर्वसाधारण कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर देण्यास प्राधान्य दिले, मात्र सांगली जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिला हप्ता एफआरपीप्रमाणे न देता १८०० ते २००० रुपये प्रतिटन दिला.मात्र, एफआरपीप्रमाणे उर्वरित रक्कम देणे सर्वच कारखान्यांना साखरेचे दर घसरल्याने कठीण झाले. याबाबत केंद्र शासनाने महाराष्ट्राला एक हजार ९५० कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. राज्य शासनाने या कर्जाच्या व्याजाचा भार आपल्यावर घेतला. एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठीच हे कर्ज होते. प्रथम ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होते; पण काही तांत्रिक त्रुटी राहू नयेत म्हणून पुन्हा ते कारखानदारांकडे वर्ग करण्यात आले. याचा फायदा कारखानदारांना झाला. आजही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे हंगाम २०१४-१५ च्या हंगामातील एक हजार १६ कोटी रुपये एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांची थकबाकी आहे. यात पुणे विभागात सर्वांत जास्त ५९२ कोटी ५ लाख, तर कोल्हापूर विभागात ११९ कोटी १२ लाख रुपये थकबाकी आहे.यावर्षीचा (हंगाम २०१५-१६) गाळप परवाना देताना शासनानेही एफआरपीच्या कायद्यात मवाळ भूमिका घेतली आहे. १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना दुसरा हंगाम सुरू व्हायची वेळ आली असतानाही ती न देणाऱ्या कारखानदारांवर कायद्याने कारवाई करण्याऐवजी आणखी एक महिन्याची मुदत देऊन कारखानदारांच्या सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.