शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अखेरच्या दिवशी किरणे गुडघ्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:58 IST

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्यात अखेरच्या तिसºया दिवशी शुक्रवारी सूर्याची मावळती किरणे ६ वाजून १९ मिनिटांनी देवीच्या गुडघ्यापर्यत पोहोचून लुप्त झाली.अंबाबाई मंदिरात ३१ जानेवारी ते २ फेबु्रवारी (उत्तरायण), तर ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो. शुक्रवारी उत्तरायणातील तिसºया व अखेरच्या दिवशी मावळत्या ...

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्यात अखेरच्या तिसºया दिवशी शुक्रवारी सूर्याची मावळती किरणे ६ वाजून १९ मिनिटांनी देवीच्या गुडघ्यापर्यत पोहोचून लुप्त झाली.अंबाबाई मंदिरात ३१ जानेवारी ते २ फेबु्रवारी (उत्तरायण), तर ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो. शुक्रवारी उत्तरायणातील तिसºया व अखेरच्या दिवशी मावळत्या किरणांनी प्रथम महाद्वारातून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी प्रवेश केला. मिनिटागणिक किरणे पुढे सरकू लागली. यात कासव चौक (मणी मंडप) येथे ती सायंकाळी सहा वाजता पोहोचली; तर पहिली पायरी ६ वाजून ६ मिनिटांनी, तर दुसरी पायरी ६ वाजून ११ मिनिटांनी व तिसरी पायरी ६ वाजून १३ मिनिटांनी आणि ६ वाजून १६ मिनिटांनी चरणस्पर्श, ६ वाजून १९ मिनिटांनी किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचून मूर्तीच्या डाव्या बाजूने लुप्त झाली.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्यात बुधवारी (दि. ३१ जाने.) किरणे पूर्ण पोहोचल्याने ती देवीच्या चेहºयापर्यंत गेली.दुसºया दिवशी किरणांची तीव्रता कमी झाल्याने कमरेपर्यंत, तर तिसºया व अखेरच्या दिवशी देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचून ती लुप्त झाली. यात मानवनिर्मित अडथळेच कारणीभूत असल्याने ते काढून घेतल्यानंतर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव पूर्ण होईल, असे मत जाणकारांनी गेल्या तीन दिवसांतील अभ्यासावरून व्यक्त केले.अखेरच्या दिवशी हा सोहळा पाहण्यासाठी गारेच्या गणपतीसमोरील एलईडी स्क्रीनसमोर हजारो भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अभ्यास समितीचे सदस्य व शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, सदस्या संगीता खाडे, प्रा. मिलिंद कारंजकर, आदी उपस्थित होते.किरणे अशी पोहोचलीमहाद्वार प्रवेशद्वार : ५ वाजून ३० मिनिटेपालखी चौक : ५ वाजून ३६ मिनिटेगणपती मंदिरामागे : ५ वाजून ५४ मिनिटेकासव चौक (मणी मंडप) : ६ वाजतापितळी उंबरठा : ६ वाजून ४ मिनिटेखजिना चौक : ६ वाजून ६ मिनिटेपहिली पायरी : ६ वाजून ९ मिनिटेदुसरी पायरी : ६ वाजून ११ मिनिटेतिसरी पायरी : ६ वाजून १३ मिनिटेचरणस्पर्श : ६ वाजून १६ मिनिटेगुडघ्यापर्यंत : ६ वाजून १९ मिनिटांनी पोहोचून डावीकडे लुप्त