शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा उतरा, भरपाई मिळवा

By admin | Updated: January 5, 2015 00:43 IST

शासन उचलणार वाटा : हवामान बदलामुळे नुकसान झाल्यास दिलासा; कृषी खात्याशी संपर्काचे आवाहन

भीमगोंडा पाटील -कोल्हापूर -शासनाच्या कृषी विभागाने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू केली आहे. काजू, आंबा, केळी, द्राक्ष उत्पादकांना या विम्याचा फायदा होणार आहे. शासनाने विमा हप्त्याचा मोठा वाटा उचलला आहे. नुकसान भरपाई खासगी कंपन्या देणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊन १५ जानेवारीपर्यंत विमा उतरविणे आवश्यक आहे.सन २०१३ वर्षापासून ही योजना राबविली जात आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने नवीन आदेश काढून गारपिटीने यंदा नुकसान होणाऱ्या पीक नुकसानीलाही भरपाई द्यावी, अशी सूचना दिली आहे. यामुळे आता हवामान बदलाने व गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए. आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. काजू, द्राक्ष, केळी, आंबा आदी फळझाडांचा विम्यासाठी समावेश आहे. एक हेक्टर आंबा, केळीसाठी ११ हजार रुपयांचा विमा हप्ता आहे. यांपैकी दोन हजार रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे. या बदल्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीस ३३ हजार ३३३ रुपये मिळणार आहे. काजूसाठी ८ हजार २५० रुपयांचा विमा हप्ता आहे. यातील १५०० रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहेत. भरपाई २५ हजार मिळणार आहे. द्राक्षांसाठी १६ हजार ५०० रुपयांचा विमा हप्ता आहे. शेतकऱ्यास तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत. भरपाईपोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत.अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीस विमा हप्ता वरीलप्रमाणेच आहे. मात्र, भरपाई रक्कम विविध टप्प्यांत वेगवेगळी आहे. १६ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरअखेरसाठी भरपाई हेक्टरी २ ते २० हजारापर्यंत मिळणार आहे. ८ ते ३० नोव्हेंबरअखेर झालेल्या नुकसान भरपाईपोटी ५ ते ९० हजार, तर १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ अखेर ५ ते ४० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. सर्व टप्प्यांची अधिकाधिक दीड लाख रुपये भरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे.वाहन विमा कंपन्या पिकांसाठीही... वाहन अपघातानंतर नुकसानभरपाई देणाऱ्या टाटा ए.आय., जी. इन्शुरन्स कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, एच.डी.एफ.सी. अ‍ॅर्गो, रिलायन्स इन्शुरन्स, आदी कंपन्यांवर आता पीक नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सोपविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए.आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. हवामान आधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी. कृषी विभागातर्फेही जागृती केली जात आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक