शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

पीक विमा उतरा, भरपाई मिळवा

By admin | Updated: January 5, 2015 00:43 IST

शासन उचलणार वाटा : हवामान बदलामुळे नुकसान झाल्यास दिलासा; कृषी खात्याशी संपर्काचे आवाहन

भीमगोंडा पाटील -कोल्हापूर -शासनाच्या कृषी विभागाने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू केली आहे. काजू, आंबा, केळी, द्राक्ष उत्पादकांना या विम्याचा फायदा होणार आहे. शासनाने विमा हप्त्याचा मोठा वाटा उचलला आहे. नुकसान भरपाई खासगी कंपन्या देणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊन १५ जानेवारीपर्यंत विमा उतरविणे आवश्यक आहे.सन २०१३ वर्षापासून ही योजना राबविली जात आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने नवीन आदेश काढून गारपिटीने यंदा नुकसान होणाऱ्या पीक नुकसानीलाही भरपाई द्यावी, अशी सूचना दिली आहे. यामुळे आता हवामान बदलाने व गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए. आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. काजू, द्राक्ष, केळी, आंबा आदी फळझाडांचा विम्यासाठी समावेश आहे. एक हेक्टर आंबा, केळीसाठी ११ हजार रुपयांचा विमा हप्ता आहे. यांपैकी दोन हजार रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे. या बदल्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीस ३३ हजार ३३३ रुपये मिळणार आहे. काजूसाठी ८ हजार २५० रुपयांचा विमा हप्ता आहे. यातील १५०० रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहेत. भरपाई २५ हजार मिळणार आहे. द्राक्षांसाठी १६ हजार ५०० रुपयांचा विमा हप्ता आहे. शेतकऱ्यास तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत. भरपाईपोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत.अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीस विमा हप्ता वरीलप्रमाणेच आहे. मात्र, भरपाई रक्कम विविध टप्प्यांत वेगवेगळी आहे. १६ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरअखेरसाठी भरपाई हेक्टरी २ ते २० हजारापर्यंत मिळणार आहे. ८ ते ३० नोव्हेंबरअखेर झालेल्या नुकसान भरपाईपोटी ५ ते ९० हजार, तर १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ अखेर ५ ते ४० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. सर्व टप्प्यांची अधिकाधिक दीड लाख रुपये भरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे.वाहन विमा कंपन्या पिकांसाठीही... वाहन अपघातानंतर नुकसानभरपाई देणाऱ्या टाटा ए.आय., जी. इन्शुरन्स कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, एच.डी.एफ.सी. अ‍ॅर्गो, रिलायन्स इन्शुरन्स, आदी कंपन्यांवर आता पीक नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सोपविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए.आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. हवामान आधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी. कृषी विभागातर्फेही जागृती केली जात आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक