शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पीक विमा उतरा, भरपाई मिळवा

By admin | Updated: January 5, 2015 00:43 IST

शासन उचलणार वाटा : हवामान बदलामुळे नुकसान झाल्यास दिलासा; कृषी खात्याशी संपर्काचे आवाहन

भीमगोंडा पाटील -कोल्हापूर -शासनाच्या कृषी विभागाने हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू केली आहे. काजू, आंबा, केळी, द्राक्ष उत्पादकांना या विम्याचा फायदा होणार आहे. शासनाने विमा हप्त्याचा मोठा वाटा उचलला आहे. नुकसान भरपाई खासगी कंपन्या देणार आहेत. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊन १५ जानेवारीपर्यंत विमा उतरविणे आवश्यक आहे.सन २०१३ वर्षापासून ही योजना राबविली जात आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने नवीन आदेश काढून गारपिटीने यंदा नुकसान होणाऱ्या पीक नुकसानीलाही भरपाई द्यावी, अशी सूचना दिली आहे. यामुळे आता हवामान बदलाने व गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए. आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. काजू, द्राक्ष, केळी, आंबा आदी फळझाडांचा विम्यासाठी समावेश आहे. एक हेक्टर आंबा, केळीसाठी ११ हजार रुपयांचा विमा हप्ता आहे. यांपैकी दोन हजार रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे. या बदल्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीस ३३ हजार ३३३ रुपये मिळणार आहे. काजूसाठी ८ हजार २५० रुपयांचा विमा हप्ता आहे. यातील १५०० रुपये शेतकऱ्यास भरावे लागणार आहेत. भरपाई २५ हजार मिळणार आहे. द्राक्षांसाठी १६ हजार ५०० रुपयांचा विमा हप्ता आहे. शेतकऱ्यास तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत. भरपाईपोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत.अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीस विमा हप्ता वरीलप्रमाणेच आहे. मात्र, भरपाई रक्कम विविध टप्प्यांत वेगवेगळी आहे. १६ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरअखेरसाठी भरपाई हेक्टरी २ ते २० हजारापर्यंत मिळणार आहे. ८ ते ३० नोव्हेंबरअखेर झालेल्या नुकसान भरपाईपोटी ५ ते ९० हजार, तर १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ अखेर ५ ते ४० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. सर्व टप्प्यांची अधिकाधिक दीड लाख रुपये भरपाई विमा कंपनीकडून मिळणार आहे.वाहन विमा कंपन्या पिकांसाठीही... वाहन अपघातानंतर नुकसानभरपाई देणाऱ्या टाटा ए.आय., जी. इन्शुरन्स कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, एच.डी.एफ.सी. अ‍ॅर्गो, रिलायन्स इन्शुरन्स, आदी कंपन्यांवर आता पीक नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सोपविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टाटा ए.आय.जी. इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे. हवामान आधारित पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी. कृषी विभागातर्फेही जागृती केली जात आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक