शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

निपाणीजवळ उद्योगांना जमीन

By admin | Updated: February 4, 2016 01:16 IST

सिद्धरामय्यांचे शिक्कामोर्तब : ८०० एकरांत जूनपासून पायाभूत सुविधा उभारणार; महाराष्ट्रातील उद्योजकांशी चर्चा

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना तवंदी घाट परिसरातील जमीन उद्योग विस्तारीकरणासाठी देण्यावर कर्नाटक सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले. या उद्योजकांना एकूण ८०० एकर जमीन देण्याची या सरकारने तयारी दर्शविली आहे. या ठिकाणी १ जूनपासून पायाभूत सुविधांच्या उभारणीस प्रारंभ केला जाणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे, अशी माहिती गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा)चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे यांनी दिली. वाढते वीजदर आणि पायाभूत सुविधांची कमतरता हे चित्र बदलण्याची मागणी राज्य सरकारकडे मोर्चा, निवेदने आणि चर्चा, आदींच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी केली. मात्र, याबाबत सरकारकडून सकारात्मक स्वरूपात काहीच झाले नाही. अखेर कोल्हापूरमधील उद्योजकांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी कर्नाटकामध्ये स्थलांतरण व विस्तारीकरणाचा निर्णय घेतला. त्यांना कर्नाटक सरकारने तवंदी घाट परिसरात जागा देण्याची तयारी दाखवीत सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढील पाऊल टाकण्यासाठी कर्नाटक सरकारने चर्चा करण्यासाठी ‘गोशिमा’ कार्यालयात मंगळवारी (दि. २) दूरध्वनी करून शिष्टमंडळाला पाठवावे असे सांगितले. त्यानुसार ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे, आर. पी. पाटील आणि माजी उपाध्यक्ष संजय उरमनट्टी हे चर्चेसाठी बुधवारी बंगलोरला रवाना झाले. येथील पॅलेस ग्राउंड या ठिकाणी आयोजित ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६’ या उद्योग मेळाव्यांतर्गत दुपारी साडेचार वाजता पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांचे शिष्टमंडळ व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे व प्रधान सचिव रत्नप्रभा यांची चर्चा झाली. यात तवंदी घाटाच्या परिसरातील ८०० एकर जमीन पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना देण्यावर शिक्कामोर्तब केले. उद्योग विस्तारीकरण केल्या जाणाऱ्या संबंधित परिसरात पायाभूत सुविधांची उभारणी १ जूनपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी) स्वस्त वीज, करात सवलत पश्चिम महाराष्ट्रातून उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी कर्नाटकात येणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्रापेक्षा कमी दरात वीज आणि करांमध्ये सवलत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. ‘इन्व्हेस्ट इन कर्नाटक’ या योजनेअंतर्गत कर्नाटक सरकारकडून तवंदी घाट परिसरातील जागा उद्योग क्षेत्र म्हणून विकसित केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून कर्नाटक सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू होता. आम्हा सर्व उद्योजकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे, असे दुधाणे यांनी सांगितले. सोळाशे जणांचे अर्ज जागेसाठी कर्नाटक सरकारने प्रस्ताव मागितल्यानंतर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १६०० जणांनी ‘गोशिमा’कडे अर्ज दाखल केले. यांतील ४०० जणांचे अर्ज ‘गोशिमा’ने कर्नाटक सरकारला पाठविले आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे दुधाणे यांनी सांगितले.