शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीजवळ उद्योगांना जमीन

By admin | Updated: February 4, 2016 01:16 IST

सिद्धरामय्यांचे शिक्कामोर्तब : ८०० एकरांत जूनपासून पायाभूत सुविधा उभारणार; महाराष्ट्रातील उद्योजकांशी चर्चा

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना तवंदी घाट परिसरातील जमीन उद्योग विस्तारीकरणासाठी देण्यावर कर्नाटक सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले. या उद्योजकांना एकूण ८०० एकर जमीन देण्याची या सरकारने तयारी दर्शविली आहे. या ठिकाणी १ जूनपासून पायाभूत सुविधांच्या उभारणीस प्रारंभ केला जाणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे, अशी माहिती गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा)चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे यांनी दिली. वाढते वीजदर आणि पायाभूत सुविधांची कमतरता हे चित्र बदलण्याची मागणी राज्य सरकारकडे मोर्चा, निवेदने आणि चर्चा, आदींच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी केली. मात्र, याबाबत सरकारकडून सकारात्मक स्वरूपात काहीच झाले नाही. अखेर कोल्हापूरमधील उद्योजकांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी कर्नाटकामध्ये स्थलांतरण व विस्तारीकरणाचा निर्णय घेतला. त्यांना कर्नाटक सरकारने तवंदी घाट परिसरात जागा देण्याची तयारी दाखवीत सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढील पाऊल टाकण्यासाठी कर्नाटक सरकारने चर्चा करण्यासाठी ‘गोशिमा’ कार्यालयात मंगळवारी (दि. २) दूरध्वनी करून शिष्टमंडळाला पाठवावे असे सांगितले. त्यानुसार ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे, आर. पी. पाटील आणि माजी उपाध्यक्ष संजय उरमनट्टी हे चर्चेसाठी बुधवारी बंगलोरला रवाना झाले. येथील पॅलेस ग्राउंड या ठिकाणी आयोजित ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६’ या उद्योग मेळाव्यांतर्गत दुपारी साडेचार वाजता पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांचे शिष्टमंडळ व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे व प्रधान सचिव रत्नप्रभा यांची चर्चा झाली. यात तवंदी घाटाच्या परिसरातील ८०० एकर जमीन पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना देण्यावर शिक्कामोर्तब केले. उद्योग विस्तारीकरण केल्या जाणाऱ्या संबंधित परिसरात पायाभूत सुविधांची उभारणी १ जूनपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी) स्वस्त वीज, करात सवलत पश्चिम महाराष्ट्रातून उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी कर्नाटकात येणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्रापेक्षा कमी दरात वीज आणि करांमध्ये सवलत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. ‘इन्व्हेस्ट इन कर्नाटक’ या योजनेअंतर्गत कर्नाटक सरकारकडून तवंदी घाट परिसरातील जागा उद्योग क्षेत्र म्हणून विकसित केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून कर्नाटक सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू होता. आम्हा सर्व उद्योजकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे, असे दुधाणे यांनी सांगितले. सोळाशे जणांचे अर्ज जागेसाठी कर्नाटक सरकारने प्रस्ताव मागितल्यानंतर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १६०० जणांनी ‘गोशिमा’कडे अर्ज दाखल केले. यांतील ४०० जणांचे अर्ज ‘गोशिमा’ने कर्नाटक सरकारला पाठविले आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे दुधाणे यांनी सांगितले.