शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

भूसंपादनावरून भाजपमध्येच मतांतरेपालकमंत्र्यांच्या भूसंपादनाच्या सूचनांना फासला हरताळ

By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST

अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत बैठक पूर्वपरवानगीशिवाय एक इंचही जागा घेणार नाही

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढून येथील पर्यटनवृद्धी करायची असेल तर भूसंपादनाला पर्याय नाही. त्यामुळे भूूसंपादनाची तयारी सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, मंगळवारी परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या परवानगीशिवाय एक इंचही भूसंपादन होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे; त्यामुळे एकाच विषयावर भाजपमध्येच दोन मतप्रवाह असल्याचा अनुभव या बैठकीत आला. चार दिवसांपूर्वी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मंदिराचा २५० कोटींचा विकास आराखडा सादर केला. त्यावर पालकमंत्र्यांनी चार दिवसांत या आराखड्याचे तीन टप्पे करा. पहिल्या टप्प्यात फक्त मंदिराच्या परिसराचा विकास भूसंपादन आणि पुनर्वसनाचा समावेश असावा. तो आराखडा अर्थसंकल्पात मंजूर केला जाईल, असे सांगितले होते. या प्रकल्पाबद्दल नागरिकांत गैरसमज निर्माण होत असल्याने मंगळवारी भाजपच्यावतीने परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी नागरिकांना ‘तुमची परवानगी घेतल्याशिवाय एक इंचही जमीन ताब्यात घेणार नाही,’ असे सांगितले. यावेळी महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी, अजित ठाणेकर, रामभाऊ चव्हाण, अशोक देसाई उपस्थित होते. एकीकडे पालकमंत्री पाटील हे आयुक्त पी. शिवशंकर यांना ‘भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू करा, हे करताना नागरिकांचा विरोध होईल, आंदोलन-कोर्टकचेऱ्या होतील; पण मंदिराचा विकास करायचा असेल तर हे करावे लागेल; त्यामुळे नागरिकांना विश्वासात घ्या,’ असे सांगतात, तर दुसरे पदाधिकारी नागरिकांना आम्ही तातडीने भूसंपादन करणार नाही असे म्हणतात, हा मोठा विरोधाभास आहे.ज्या अंबाबाईमुळे कोल्हापुरात भाविकांचा ओढा वाढला, तिच्या मंदिराचा आणि पर्यायाने कोल्हापूरचा पर्यटनदृष्ट्या विकास करायचा असेल तर मंदिराबाहेरील काही मीटरपर्यंतच्या जमिनीचे संपादन करणे क्रमप्राप्त आहे. नागरिकांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले पाहिजे, ही त्यात महत्त्वाची अट आहे. या बैठकीत जाधव यांनी पालकमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करूनच मी हे विधान करीत असल्याचे स्पष्ट केले असले तरी एकाच पक्षाच्या नेत्यांची दोन वेगवेगळी विधाने नागरिकांचा विश्वास संपादन करतील की नाही माहीत नाही; पण त्यांचा गोंधळ उडविणार हे मात्र नक्की. आंदोलने नकोेत... सहकार्य हवेसर्किट हाऊसला झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय शासन विकास निधी देणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे भूसंपादनाशिवाय निधी मिळणार नाही, असे होऊ नये यासाठी नागरिकांनी विरोधाचा पवित्रा न घेता या विकास प्रकल्पाला सहकार्य करणे गरजेचे आहे. नाही तर ‘विकासविरोधी कोल्हापूर’ असा या शहरावर शिक्का बसेल, त्याचे फार दूरगामी परिणाम या शहरावर होतील, असे सांगितले होते. आराखडा जाहीर करणार आजच्या बैठकीत जाधव यांनी पहिल्या टप्प्यासाठी बनविलेला आराखडा येत्या दोन-तीन दिवसांत महापालिकेत जाहीर करू, असे सांगितले. या प्रकल्पाचे राजकारण करून काही लोक अडथळा निर्माण करीत आहेत, त्याला बळी पडून विरोध करू नका. नागरिकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. तसे होणार नसेल तर तुमच्या पाठीशी राहू, असे आश्वासन दिले.