शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बावडा पुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन ...

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन झाले, तेव्हाच या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देणे गरजेचे होते. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीचा मोबदला द्या आणि मगच पुलाचे काम सुरू करा, असा ठेका धरला होता. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक बांधकामने पुलाचे काम हाती घेतले. तब्बल चार वर्षांनंतरही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने बैठक घेऊन भूसंपादनाची रक्कम त्वरित देण्याचे आदेश काढले होते.

सध्या ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांचे जमिनी खरेदीबाबत रजिस्टर ऑफिसला सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांच्यात दस्त करण्यात येऊ लागले आहेत. रजिस्टर ऑफिसला कोरोनामुळे दररोज मर्यादित संख्येने दस्त केले जात असल्याने सर्व शेतकऱ्यांचे दस्त होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना कोरोना लस घेतल्याचा व कोरोनाची टेस्ट केल्याचा पुरावाही द्यावा लागत असल्याने या प्रक्रियेला काहीसा विलंब होत आहे.

चौकट : जमिनी रीतसर ताब्यात द्या

पुलाच्या ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर आपल्या ताब्यात द्याव्यात, मगच आपण दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात करू, अशा मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. ठेकेदाराच्या ताब्यात जमिनी वेळेवर न दिल्यास काम बंद होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची आता शेतकऱ्यांबरोबर दस्त खरेदी करण्यासाठी घाई उडाली आहे.

सध्या या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेच्या आत टाकून पूर्ण करावयाचा आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराची तयारी सुरू आहे. पाचवा स्लॅब पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात होणार आहे.

फोटो ०६ : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराने तयारी सुरू ठेवली आहे.

(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )