शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बावडा पुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन ...

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन झाले, तेव्हाच या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देणे गरजेचे होते. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीचा मोबदला द्या आणि मगच पुलाचे काम सुरू करा, असा ठेका धरला होता. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक बांधकामने पुलाचे काम हाती घेतले. तब्बल चार वर्षांनंतरही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने बैठक घेऊन भूसंपादनाची रक्कम त्वरित देण्याचे आदेश काढले होते.

सध्या ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांचे जमिनी खरेदीबाबत रजिस्टर ऑफिसला सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांच्यात दस्त करण्यात येऊ लागले आहेत. रजिस्टर ऑफिसला कोरोनामुळे दररोज मर्यादित संख्येने दस्त केले जात असल्याने सर्व शेतकऱ्यांचे दस्त होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना कोरोना लस घेतल्याचा व कोरोनाची टेस्ट केल्याचा पुरावाही द्यावा लागत असल्याने या प्रक्रियेला काहीसा विलंब होत आहे.

चौकट : जमिनी रीतसर ताब्यात द्या

पुलाच्या ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर आपल्या ताब्यात द्याव्यात, मगच आपण दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात करू, अशा मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. ठेकेदाराच्या ताब्यात जमिनी वेळेवर न दिल्यास काम बंद होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची आता शेतकऱ्यांबरोबर दस्त खरेदी करण्यासाठी घाई उडाली आहे.

सध्या या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेच्या आत टाकून पूर्ण करावयाचा आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराची तयारी सुरू आहे. पाचवा स्लॅब पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात होणार आहे.

फोटो ०६ : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराने तयारी सुरू ठेवली आहे.

(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )