शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बावडा पुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन ...

नवीन पुलासाठी कसबा बावडा आणि वडणगेकडील बाजूच्या गट नंबर १३ मधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. जेव्हा जमिनीचे भूसंपादन झाले, तेव्हाच या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देणे गरजेचे होते. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीचा मोबदला द्या आणि मगच पुलाचे काम सुरू करा, असा ठेका धरला होता. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक बांधकामने पुलाचे काम हाती घेतले. तब्बल चार वर्षांनंतरही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने बैठक घेऊन भूसंपादनाची रक्कम त्वरित देण्याचे आदेश काढले होते.

सध्या ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांचे जमिनी खरेदीबाबत रजिस्टर ऑफिसला सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांच्यात दस्त करण्यात येऊ लागले आहेत. रजिस्टर ऑफिसला कोरोनामुळे दररोज मर्यादित संख्येने दस्त केले जात असल्याने सर्व शेतकऱ्यांचे दस्त होण्यास दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना कोरोना लस घेतल्याचा व कोरोनाची टेस्ट केल्याचा पुरावाही द्यावा लागत असल्याने या प्रक्रियेला काहीसा विलंब होत आहे.

चौकट : जमिनी रीतसर ताब्यात द्या

पुलाच्या ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर आपल्या ताब्यात द्याव्यात, मगच आपण दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात करू, अशा मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. ठेकेदाराच्या ताब्यात जमिनी वेळेवर न दिल्यास काम बंद होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची आता शेतकऱ्यांबरोबर दस्त खरेदी करण्यासाठी घाई उडाली आहे.

सध्या या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेच्या आत टाकून पूर्ण करावयाचा आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराची तयारी सुरू आहे. पाचवा स्लॅब पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूकडील कामास सुरुवात होणार आहे.

फोटो ०६ : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पाचवा स्लॅब येत्या १५ मेपर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ठेकेदाराने तयारी सुरू ठेवली आहे.

(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )