शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

corona virus - लक्ष्मीपुरीतील गर्दी हटता हटेना, पोलिसांची डोकेदुखी वाढली : भाजीपाला, धान्य खरेदी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:53 IST

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठीचा प्रसादही दिला.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरीतील गर्दी हटता हटेना, पोलिसांची डोकेदुखी वाढली भाजीपाला, धान्य खरेदी जोरात

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठीचा प्रसादही दिला.

संचारबंदी वाढण्याच्या भीतीने धान्य आणि भाजीपाल्याची अतिरिक्त खरेदी केली जात आहे. जो तो उठतो आणि लक्ष्मीपुरी गाठतो, अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलिसांकडून सातत्याने आवाहन केले जात असतानाही जनता त्यांना अजिबात जुमानताना दिसत नाही.

एकाच ठिकाणी गर्दी करू नका, असे सांगूनही घोळक्याने खरेदी सुरू असल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत नागरिकांना हुसकावण्यास सुरुवात केली. काहीजणांना काठीचे दणकेही दिले. त्यामुळे काहीकाळ पांगापांग झाली; पण परत सगळे रस्त्यांवर आले.

गावबंदी, नाकाबंदी, जिल्हाबंदी झाल्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. धान्याची आवक थांबली असली तरी जीवनावश्यक म्हणून भाजीपाला मात्र बाजारामध्ये येत आहे; पण गिºहाईक नसल्याने बराच भाजीपाला पडून आहे. दरही स्थिरच आहेत. व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने विक्री होत आहे, तर स्वत: विक्री करीत असलेले शेतकरी मात्र पडेल त्या किमतीला विकून लवकर घर गाठणे पसंत करीत आहेत.काकडी ढिगावरपन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले गाव हे काकडीसाठी प्र्रसिद्ध आहे. सध्या गाव बंद आहे; पण काकडी हा नाशवंत माल असल्याने गावातूनच टेम्पो भरून महिला कोल्हापूर शहरात येऊन काकडी विकत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात पोलीस बसू देत नसल्याने मंगळवारी लक्ष्मीपुरीसह आजूबाजूच्या रस्त्याकडेला महिला मोठ्या प्रमाणावर काकडी विक्रीसाठी बसल्या होत्या. ग्राहक नसल्याने किलोऐवजी ढिगावर काकडी विकावी लागत आहे.हमालाची कामे मालकांवरलक्ष्मीपुरी धान्यबाजारात शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील हमाल मोठ्या प्रमाणावर आहेत. वाहतूक व नाकाबंदीमुळे हे हमाल शहरात येऊ शकत नाहीत. त्यामुळे दुकानांच्या मालकांनाच आलेल्या गिºहाइकांना धान्याच्या पिशव्या उचलून द्याव्या लागत आहे.मालाची आवकजावक बंदजीवनावश्यक म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्यांची वाहतूक सुरू राहील असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले असले तरी सध्या नाकाबंदीमुळे शहरात येणाºया व जाणाºया वाहनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी मालाची आवकजावक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम आठ दिवसांनंतर दिसण्यास सुरुवात होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार