शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लमाणवाड्याच्या ‘विकासाची वाट’ झाली खुली !

By admin | Updated: July 29, 2016 23:22 IST

पाठपुराव्याला आले यश : वीज, रस्ता, नळयोजना राबविण्यास वनखात्याचा हिरवा कंदील--लोकमतचा प्रभाव

राम मगदूम--- गडहिंग्लज -स्वातंत्र्याच्या साठीनंतरही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहिलेल्या लमाणवाड्याच्या विकासाची वाट अखेर खुली झाली. याप्रश्नी वेळोवेळी ‘लोकमत’ने उठविलेला आवाज, जनआंदोलने आणि ‘लोकप्रतिनिधीं’च्या पाठपुराव्यास यश आले. या वसाहतीकडे वनक्षेत्रातून जाणारी वीजवाहिनी, नळपाण्याची जलवाहिनी आणि रस्त्याचे काम करण्यास वनखात्याने नुकतीच परवानगी दिली. यामुळे तब्बल ७० वर्षांनंतर लमाणवाड्यात विकासाची पहाट उजाडली आहे. कर्नाटकातील मरणहोळ आणि हडलगेदरम्यान घटप्रभा नदीच्या काठावर नेसरीनजीक हडलगे गावच्या पूर्वेकडील बाजूस हा लमाणवाडा आहे. त्याच्या लगतच असणाऱ्या जंगलामुळेच याठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करण्यात अडथळे येत होते. लमाणवाड्यातील २७ कुटुंबातील मिळून एकूण ८७ इतकी लोकसंख्या आहे. नेसरीकर इनामदारांकडून उपजिविकेसाठी मिळालेली जमीन आणि शेतमजुरीवरच त्यांची गुजराण अवलंबून आहे. नागरी सुविधांअभावी बाहेरच्या जगाशी संपर्कच नसल्यामुळे तेथील काही लोकांना अविवाहित रहावे लागले आहे. युवक काँगे्रस आणि मराठी विज्ञान परिषद यांच्यातर्फे या ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले. मात्र, पिढ्यान्-पिढ्यांच्या अठराविश्वे दारिद्र्यामुळे येथील अडाणी जनता केरोसीन दिव्याच्या उजेडातच आयुष्यातील प्रकाशाची वाट शोधत होती. आजऱ्याचे वनक्षेत्रपाल राजन देसाई यांनी स्थळनिरीक्षण करून वनखात्याकडे केलेली सकारात्मक शिफारस आणि लोकभावना लक्षात घेवून वनखात्याने दया दाखविल्याने त्यांच्या आयुष्यात माणसांचे जगणे येणे शक्य झाले आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी, जिल्हा युवक काँगे्रसचे उपाध्यक्ष विद्याधर गुरबे, हडलगेच्या सरपंच कमल नाईक, उपसरपंच अनिल पाटील, माजी सरपंच विष्णू रामा पाटील, माजी सैनिक दत्तात्रय आंबेकर, लमाणवाड्याच्या प्रमुख रत्नाबाई लमाण आदींनी विशेष प्रयत्न केले.‘लोकमत’ने उठविला होता आवाज!लमाणवाड्यातील नागरी सुविधांसाठी गेल्या दहा वर्षांपासून संघर्ष सुरू होता. ‘लोकमत’ने याप्रश्नी वेळावेळी आवाज उठविला. ‘वनखात्याने रोखली माणुसकीची वाट’ या मथळ्याखालील बातमीद्वारे शासनाचे याकडे लक्ष वेधले. तत्कालीन प्रांताधिकारी विवेक आगवणे यांनी संंबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून या प्रश्नाच्या सोडवणुकीला चालना दिली. ‘लोकमत’ आणि ‘लोकप्रतिनिधीं’च्या प्रयत्नास अखेर यश मिळाले.