शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या दरवाढीमुळे यंत्रमाग उद्योग नुकसानीत

By admin | Updated: July 17, 2016 01:02 IST

वस्त्रोद्योग महासंघाची सोमवारी मुंबईत बैठक : राज्यातील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनीची प्रतीक्षा

इचलकरंजी : कापसाचे कडाडलेले भाव आणि उत्पादित खर्चाप्रमाणे सूत व कापडास बाजारात दर मिळत नसल्याने वस्त्रोद्योगातील सूतगिरण्या व यंत्रमाग कारखानदार दिवसेंदिवस होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण झाले आहेत. अशा अभूतपूर्व मंदीवर शासनाने गांभीर्याने उपाययोजना करावी. ज्यामुळे वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्यावतीने राज्यातील सर्व सूतगिरण्यांच्या संचालकांची बैठक सोमवारी (१८ जुलै) मुंबई येथे आयोजित केली आहे.बैठकीमध्ये कापसाची होत जाणारी प्रचंड भाववाढ, बाजारातील कापसाचा तुटवडा, वाढलेले वीज दर, सुतास मागणी नसणे आणि उत्पादनाप्रमाणे सुतासाठी न मिळणारा दर अशा विषयांवर विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.अशा प्रकारच्या उद्भवलेल्या परिस्थितीबाबत वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबरसुद्धा चर्चा करून शासनाने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी महासंघाचे एक शिष्टमंडळ लवकरच भेटणार आहे, असेही त्यांनी स्पष्टकेले.गेल्या वर्षभरापासून कापडाला मागणी नसल्यामुळे त्या प्रमाणात सुतास सुद्धा भाव मिळत नाही. अशा स्थितीत १ जुलैपासून कापसाची मोठ्या प्रमाणात भाववाढ सुरू झाली आहे. त्यावेळी ३५ हजार रुपये प्रति खंडी मिळणाऱ्या कापसाचा भाव आता ५१ हजार रुपये झाला आहे. याचा परिणाम सुताच्या दरवाढीमध्ये झाला आहे. मात्र, यंत्रमाग कापडालासुद्धा बाजारात मागणी नसल्यामुळे उत्पादित खर्चाएवढा भाव सुतास मिळत नाही.याचा परिणाम म्हणून सहकार क्षेत्रात २५ हजार चात्यांच्या सूतगिरण्यांना दररोज तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. यावर चर्चा करण्यासाठी तासगाव (जि. सांगली) येथे ९ जुलै रोजी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळी पश्चिम महाराष्ट्रातील गिरण्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व सूतगिरण्यांची बैठक महासंघाच्यावतीने मुंबईत बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, गेले महिनाभर स्थानिक सूत बाजारामध्ये सुताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून, फाईन काऊंट या सूत प्रकारासाठी पाच किलोमागे २०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे, तर पीव्ही-पीसी या सुतासाठी प्रति किलो दहा ते पंधरा रुपये वाढ झाली. मात्र, सध्याचे चढ्या भावाचे सूत घेऊन उत्पादित झालेल्या कापडासाठी बाजारात मागणी नाही.वाढलेल्या सूत दराच्या प्रमाणात कापडाला प्रतिमीटर किमान दोन रुपये अधिक भाव मिळाला पाहिजे; पण सध्या फक्त ७५ पैसे इतकाच भाव मिळत आहे. यामुळे कापड उत्पादक यंत्रमागधारक आणि कापड व्यापाऱ्यांनासुद्धा नुकसान सोसावे लागत आहे. यावर लवकरच शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितली. (प्रतिनिधी)राज्य व केंद्राकडून उपाययोजनेची आवश्यकतायंत्रमागावर उत्पादित कापडाला सध्या प्रति पीक प्रतिमीटर तीन ते साडेतीन पैसे इतकी मजुरी पडत आहे. त्याऐवजी साडेसात पैसे मजुरी मिळणे आवश्यक आहे, तरच राज्यातील यंत्रमाग उद्योग जिवंत राहील, असे सांगून यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, यावर राज्य शासन आणि केंद्र सरकार यांनी तोडगा काढून यंत्रमागांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी करण्यासाठी आमचे शिष्टमंडळ आमदार सुरेश हाळवणकर व खासदार राजू शेट्टी यांना भेटले आहे. दोघांनीही याचा सकारात्मक विचार करून यंत्रमागधारकांची बाजू शासन दरबारी मांडण्याची ग्वाही दिली असल्याचे त्यांनी सांगितले.