शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

वाढत्या विस्तारामुळे सोयी-सुविधांचा अभाव

By admin | Updated: October 1, 2015 00:39 IST

तारदाळमधील अवस्था : सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक

घन:शाम कुंभार -- यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उद्योग वाढीसाठी जागा उपलब्ध असणारे गाव म्हणून तारदाळ गावची ओळख आहे. तारदाळ गावाचा विस्तार उपनगरांच्या विस्तारामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ग्रामपंचायतीस सेवा-सुविधा पुरविणे गैरसोयीचे बनत आहे. त्यातच प्राईड इंडिया या वस्त्रोद्योग संघटित प्रकल्प उभारणीने ग्रामपंचायतीच्या अर्थकारणास बळकटी निर्माण झाली आहे.गावामध्ये सांडपाणी निर्गतीची सोय नसल्याने आरोग्याच्या समस्या, सार्वजनिक शौचालयांअभावी महिलांची कुंचबणा, पथदिव्यांअभावी अंधार, गावांतर्गत रस्त्याची डागडुजी नाही. मळे भागात पाणंद रस्त्यांचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण नाही. यामुळे मळे भागातील ग्रामस्थांसमोर वाहतुकीची समस्या आहे. पाणंद रस्त्यावर असणाऱ्या नाल्यामुळे पावसाळ्यात रहदारी बंद असते. आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नाहीत. समर्थनगर, जी.के.नगर, रामनगर, आझादनगर, श्रीकृष्णनगर, गौरीशंकरनगर या भागात पिण्याचे पाणी, रस्ते व स्वच्छतेचा अभाव आहे.सुमारे सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राईड इंडियासारखे संघटित वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणी झाले आहे. याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध नाही, तर उद्योजकांना कूपनलिका खोदण्यास बंदी आहे. सायझिंगचे सांडपाणी शुद्धिकरणाअभावी उघड्यावर सोडण्यात येते. यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गावातून चौगुले मळा संगमनगरकडून पार्वती वसाहतीकडे जाणारा पाणंद रस्ता कमी अंतराचा आहे. तो खडीकरण व डांबरीकरण व्हावा. भारत निर्माण योजनेवरील चोरीला जाणाऱ्या व्हॉल्व्हच्या संरक्षणासाठी योजना आखावी. वाढीव भागात शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन हवे. पाणंद रस्त्यावर सौरदिवे लावावेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन व्हावे. गावातून हातकणंगलेकडे जाणाऱ्या मार्गावर पॅचवर्क करावे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधावीत व सांडपाणी व्यवस्थापन असावे.प्राईड इंडियामध्ये पाणी आवश्यकतेनुसार उद्योजकांना पुरवठा व्हावा. सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी. जलशुद्धिकरण प्रकल्प उभारावा. उद्योजकांनी एकजूट करून संयुक्तपणे खरेदी-विक्री स्वतंत्रपणे करावी. कामगारांसाठी संयुक्तपणे निवारा सोय व्हावी. प्रकल्पामधील कामगारांना शासकीय सेवा योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. इ.एस.आय. योजना कामगारांना लागू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पाण्याच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पामार्फत कूपनलिका खोदल्यास पाणीप्रश्नाचे निवारण होईल. तारदाळसह प्राईड इंडिया प्रकल्पापर्यंत येणे-जाणेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व्हावे. या मार्गे एसटी बसेसची वाहतूक कशी फायदेशीर ठरेल, याचे नियोजन करून अंमलबजावणी झाल्यास ग्रामस्थांसह परिसरातील कामगार वर्गास कमी दरात प्रवास उपलब्ध होईल.