शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

वाढत्या विस्तारामुळे सोयी-सुविधांचा अभाव

By admin | Updated: October 1, 2015 00:39 IST

तारदाळमधील अवस्था : सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक

घन:शाम कुंभार -- यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उद्योग वाढीसाठी जागा उपलब्ध असणारे गाव म्हणून तारदाळ गावची ओळख आहे. तारदाळ गावाचा विस्तार उपनगरांच्या विस्तारामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ग्रामपंचायतीस सेवा-सुविधा पुरविणे गैरसोयीचे बनत आहे. त्यातच प्राईड इंडिया या वस्त्रोद्योग संघटित प्रकल्प उभारणीने ग्रामपंचायतीच्या अर्थकारणास बळकटी निर्माण झाली आहे.गावामध्ये सांडपाणी निर्गतीची सोय नसल्याने आरोग्याच्या समस्या, सार्वजनिक शौचालयांअभावी महिलांची कुंचबणा, पथदिव्यांअभावी अंधार, गावांतर्गत रस्त्याची डागडुजी नाही. मळे भागात पाणंद रस्त्यांचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण नाही. यामुळे मळे भागातील ग्रामस्थांसमोर वाहतुकीची समस्या आहे. पाणंद रस्त्यावर असणाऱ्या नाल्यामुळे पावसाळ्यात रहदारी बंद असते. आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नाहीत. समर्थनगर, जी.के.नगर, रामनगर, आझादनगर, श्रीकृष्णनगर, गौरीशंकरनगर या भागात पिण्याचे पाणी, रस्ते व स्वच्छतेचा अभाव आहे.सुमारे सोळा हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राईड इंडियासारखे संघटित वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणी झाले आहे. याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध नाही, तर उद्योजकांना कूपनलिका खोदण्यास बंदी आहे. सायझिंगचे सांडपाणी शुद्धिकरणाअभावी उघड्यावर सोडण्यात येते. यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गावातून चौगुले मळा संगमनगरकडून पार्वती वसाहतीकडे जाणारा पाणंद रस्ता कमी अंतराचा आहे. तो खडीकरण व डांबरीकरण व्हावा. भारत निर्माण योजनेवरील चोरीला जाणाऱ्या व्हॉल्व्हच्या संरक्षणासाठी योजना आखावी. वाढीव भागात शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन हवे. पाणंद रस्त्यावर सौरदिवे लावावेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन व्हावे. गावातून हातकणंगलेकडे जाणाऱ्या मार्गावर पॅचवर्क करावे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधावीत व सांडपाणी व्यवस्थापन असावे.प्राईड इंडियामध्ये पाणी आवश्यकतेनुसार उद्योजकांना पुरवठा व्हावा. सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी. जलशुद्धिकरण प्रकल्प उभारावा. उद्योजकांनी एकजूट करून संयुक्तपणे खरेदी-विक्री स्वतंत्रपणे करावी. कामगारांसाठी संयुक्तपणे निवारा सोय व्हावी. प्रकल्पामधील कामगारांना शासकीय सेवा योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. इ.एस.आय. योजना कामगारांना लागू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पाण्याच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पामार्फत कूपनलिका खोदल्यास पाणीप्रश्नाचे निवारण होईल. तारदाळसह प्राईड इंडिया प्रकल्पापर्यंत येणे-जाणेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व्हावे. या मार्गे एसटी बसेसची वाहतूक कशी फायदेशीर ठरेल, याचे नियोजन करून अंमलबजावणी झाल्यास ग्रामस्थांसह परिसरातील कामगार वर्गास कमी दरात प्रवास उपलब्ध होईल.