शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अन्याय झाल्यास दाद मागायची कुणाकडे? नियंत्रणाअभावी फायनान्स कंपन्या मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:22 IST

आम्ही म्हणू तो कायदा आणि व्याजाचा दर’ अशा आविर्भावात या कंपन्यांचे प्रतिनिधी वावरताना दिसत आहेत. कर्जवाटप करताना कमाल मर्यादा ओलांडली तर जातेच; पण वसुलीच्या वेळीदेखील सर्व नियम धाब्यावर बसविले जातात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अथवा सहकार उपनिबंधकांकडे नोंदच नाही

कोल्हापूर : कर्ज कुणाला, किती आणि कसे वितरित करावे याबाबत बँकांना नियम, अटी व शर्ती घालून दिल्या जातात; पण मायक्रो फायनान्स कंपन्या मात्र या नियमापासून कोसो दूर आहेत. मुंबईस्थित कंपन्यांच्या कार्यालयातून नियंत्रण होते, असे म्हटले जाते; पण प्रत्यक्षात पाहिल्यावर या कंपन्या बेफाम सुटल्या आहेत. ग्राहक हितापेक्षा नफेखोरी हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून सध्या काम सुरू आहे. त्यांच्या कारभाराची ना जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंद, ना सहकार विभागाकडे. त्यामुळे अन्याय झाल्यानंतर दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न पडला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या एनबीएफसीअंतर्गत पाच लोक एकत्र येऊन फायनान्स कंपनी स्थापन करू शकतात. संयुक्त जबाबदारीच्या हमीवर रिझर्व्ह बँक कर्ज वितरण व वसुलीची परवानगी देते. हा नियम फक्त कंपनीची स्थापना होईपर्यंतच पाळला जातो. त्यानंतर तो अक्षरश: बासनात गुंडाळला जातो. ‘आम्ही म्हणू तो कायदा आणि व्याजाचा दर’ अशा आविर्भावात या कंपन्यांचे प्रतिनिधी वावरताना दिसत आहेत. कर्जवाटप करताना कमाल मर्यादा ओलांडली तर जातेच; पण वसुलीच्या वेळीदेखील सर्व नियम धाब्यावर बसविले जातात.

हा सर्व प्रकार सुरू असताना, महिलांमध्ये अंसतोष वाढला असतानाही कंपनीची दहशत रोखायची कशी, असा प्रश्न या अडचणीवर आंदोलन करणाऱ्यांनाही पडला आहे. कंपनीच्या नोंदणीचे कोणतेही ऐवज जिल्हास्तरावर सापडत नाहीत. हा विभाग बँकिंग आणि सहकार विभागाशी संबंधित नसल्याने जिल्हा उपनिबंधकही याबाबतीत काहीच करू शकत नाहीत.

 

  • कमिशन एजंटांची गावोगावी साखळी

कर्जदार शोधण्यासाठी आणि वसुलीसाठी कंपन्यांकडून एजंट नेमले आहेत. ते कर्जदारांना लवकर कर्ज मिळवून देतो म्हणून प्रत्येक प्रकरणामागे दीड ते दोन हजार रुपये सहजपणे घेतात. कर्ज मिळते म्हणून महिला कुरकुर न करता ही रक्कम देतातही. त्यामुळे गावोगावी भ्रष्ट कारभाराची साखळीच तयार झाली आहे.

 

  • कर्जाची अचूक माहितीच नाही

किती कंपन्यांनी किती महिलांना एकूण किती कर्ज दिले आहे, याची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीतही ही बाब समोर आल्याने स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीच या कंपन्यांना माहिती देण्याचे आदेश दिले आहेत; तथापि आजअखेर माहिती संकलित झालेली नाही. मुंबईत होणाºया बैठकीतच आकडे उघड केले जाणार आहेत.

 

मुळात कर्जवाटपच चुकीच्या पद्धतीने झाले असून महिलांना कर्जाच्या खाईत जाणीवपूर्वक लोटण्याचे काम या कंपन्यांकडून होत आहे. त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. अन्यथा या महिलांचे आयुष्यच उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.- ए. ए. सनदी, अमान विकास नागरी संस्था, शिरोळ

निदान कर्जवसुली थांबवून कर्जमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा म्हणून कर्जदार महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाºहाणे मांडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा