शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

कुंभी, भोगावती काठावर उसाच्या फडावर मातीचा थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

दुसऱ्या पुराने पुन्हा उरलेलेल्या कांड्याही कुजणार. पाने कुरतडणाऱ्या अळीचा हल्ला प्रकाश पाटील कोपार्डे : चार नद्यांचा सुपीक भागात ...

दुसऱ्या पुराने पुन्हा उरलेलेल्या कांड्याही कुजणार.

पाने कुरतडणाऱ्या अळीचा हल्ला

प्रकाश पाटील

कोपार्डे : चार नद्यांचा सुपीक भागात वसलेल्या करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून महापुराने रडकुंडीस आणले आहे. पुराचे पाणी ऊस शेतीत गेल्यामुळे उसाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करवीर तालुक्यातील कुंभी, भोगावती, पंचगंगा व तुळशी नदी काठावर असलेली ऊसशेती ढगफुटीसदृश पावसाने पाण्याखाली गेली. यावर्षी पाण्याच्या पातळीने आजपर्यंतच्या महापुराची उच्चांकी आकडेवारी गाठली आहे. पण मुसळधार पावसामुळे भूस्खलनसदृश परिणाम झाल्याने प्रवाही पाण्याबरोबर मातीही वाहून आल्याने जुन झालेल्या आडसाली उसाचे शेंडे कुजले. याचा परिणाम उसाच्या कांड्यांवर झाला असून, त्याही कुजल्या आहेत.

चौकट : हारवळ व ओढ्याकाठच्या पिकांचेही नुकसान

महापुराने उच्चांकी पाणी पातळी गाठल्याने नद्यांना मिळणारे मोठ्या हारवळ, ओढे, नाले यांचे पाणी आजूबाजूच्या शेतात स्थिरावले. यामुळे हारवळ ओढ्यांच्या काठावर असलेल्या भात, भुईमूग व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. आडसाली लागवडीच्या हंगामात मुसळधार पाऊस झाल्याने आडसाली उसाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, करवीर तालुक्यात सध्या ४५० च्या वर गुऱ्हाळघरे आहेत. पण, नदीकडेचा ऊस मातीने माखल्याने गुऱ्हाळघरांना ऊस टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

कोट : नदीबूड क्षेत्रातील उसाचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करताना अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. परिस्थितीजन्य नुकसानीचे पंचनामे करून किमान आर्थिक मदत मिळावी.

पंडित केरबा पाटील, शेतकरी, खाटांगळे

नुकसानीचा लेखाजोखा

नुकसानग्रस्त शेतकरी - ३९ हजार २३४

१० हजार २२८ हेक्टरवरील ऊस व भात पिकांचे नुकसान.

१३ कोटी ७२ लाख रुपयांचे शेतीचे नुकसान

200921\20210919_170340.heic

करवीर तालुक्यातील उसाच्या शेती ची माती दाल्याचे चित्र