शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

‘केएमटी’चा ११ कोटींचा निधी केंद्राने कापला

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

धोरण बदलले : नव्या २९ बसेस, बस डेपोचे स्वप्न भंगले

कोल्हापूर : राज्यातील तसेच देशातील सत्ता बदलली की, त्याचे परिणाम कोणाला कसे बसतील सांगता येत नाही. दीड वर्षापूर्वी केंद्रातील सरकार बदलले आणि त्याचा फटका के.एम.टी. प्रशासनाला चांगलाच बसला. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेल्या १०४ बसेससाठीच्या निधीपैकी ११ कोटींचा निधी भाजप सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे उर्वरित २९ बसेस आणि अद्ययावत डेपो उभारण्याचे काम के.एम.टी. प्रशासनाला सोडून द्यावे लागले आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस आघाडी सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून १०४ बसेस घेण्यासह शहरात अद्ययावत बस डेपो उभारण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. योजना मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा निधी येण्यास सुरुवात झाली. या योजनेमुळे सातत्याने तोट्यात चाललेल्या व मरगळ आलेल्या केएमटीला नवी नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवीत झाली होती. मात्र, दुर्दैवाने महानगरपालिका परिवहन समिती सभेत नगरसेवकांनी बसेस खरेदी प्रक्रियेवेळी काही आक्षेप नोंदविल्यामुळे खरेदीची वर्कआॅर्डर देण्यास तब्बल सहा महिन्यांचा विलंब झाला. त्याच दरम्यान केंद्रातील सत्ता परिवर्तन होऊन भाजपचे सरकार आले. या सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना बंद केली. देशपातळीवर हा निर्णय झाला. नवीन योजना तयार करताना पूर्वीचे धोरण बदलले गेले. त्याचा फटका के.एम.टी.ला बसला. के.एम.टी.ला १०४ पैकी ७५ बसेस मिळाल्या, पण ११ कोटींचा निधीच मिळणार नसल्याने पुढील २९ बसेस आता मिळणार नाहीत. त्याशिवाय अद्ययावत बस डेपो उभारण्यास निधी मिळणार नाही. वास्तविक एका सरकारने मंजूर केलेला निधी दुसऱ्या सरकारनेही तो उपलब्ध करून द्यावा, असा संकेत आहे; परंतु भाजप सरकारने तो दिलाच नाही. त्यामुळे के.एम.टी.चे नुकसान झाले. त्याला जबाबदार जसे केंद्र सरकार आहे, तसेच तत्कालीन परिवहन समितीही आहे. त्यांनी जर वेळेत निविदा मंजूर केली असती तर कदाचित निधीची अडचण आली नसती. (प्रतिनिधी)