शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

‘केएमटी’चा ११ कोटींचा निधी केंद्राने कापला

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

धोरण बदलले : नव्या २९ बसेस, बस डेपोचे स्वप्न भंगले

कोल्हापूर : राज्यातील तसेच देशातील सत्ता बदलली की, त्याचे परिणाम कोणाला कसे बसतील सांगता येत नाही. दीड वर्षापूर्वी केंद्रातील सरकार बदलले आणि त्याचा फटका के.एम.टी. प्रशासनाला चांगलाच बसला. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेल्या १०४ बसेससाठीच्या निधीपैकी ११ कोटींचा निधी भाजप सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे उर्वरित २९ बसेस आणि अद्ययावत डेपो उभारण्याचे काम के.एम.टी. प्रशासनाला सोडून द्यावे लागले आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याआधी केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस आघाडी सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून १०४ बसेस घेण्यासह शहरात अद्ययावत बस डेपो उभारण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. योजना मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा निधी येण्यास सुरुवात झाली. या योजनेमुळे सातत्याने तोट्यात चाललेल्या व मरगळ आलेल्या केएमटीला नवी नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवीत झाली होती. मात्र, दुर्दैवाने महानगरपालिका परिवहन समिती सभेत नगरसेवकांनी बसेस खरेदी प्रक्रियेवेळी काही आक्षेप नोंदविल्यामुळे खरेदीची वर्कआॅर्डर देण्यास तब्बल सहा महिन्यांचा विलंब झाला. त्याच दरम्यान केंद्रातील सत्ता परिवर्तन होऊन भाजपचे सरकार आले. या सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना बंद केली. देशपातळीवर हा निर्णय झाला. नवीन योजना तयार करताना पूर्वीचे धोरण बदलले गेले. त्याचा फटका के.एम.टी.ला बसला. के.एम.टी.ला १०४ पैकी ७५ बसेस मिळाल्या, पण ११ कोटींचा निधीच मिळणार नसल्याने पुढील २९ बसेस आता मिळणार नाहीत. त्याशिवाय अद्ययावत बस डेपो उभारण्यास निधी मिळणार नाही. वास्तविक एका सरकारने मंजूर केलेला निधी दुसऱ्या सरकारनेही तो उपलब्ध करून द्यावा, असा संकेत आहे; परंतु भाजप सरकारने तो दिलाच नाही. त्यामुळे के.एम.टी.चे नुकसान झाले. त्याला जबाबदार जसे केंद्र सरकार आहे, तसेच तत्कालीन परिवहन समितीही आहे. त्यांनी जर वेळेत निविदा मंजूर केली असती तर कदाचित निधीची अडचण आली नसती. (प्रतिनिधी)