शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

‘केएसबीपी’ यापुढे शहरात काम करणार नाही : सुजय पित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे

ठळक मुद्दे राजकारणाने शाश्वत विकासाला अडथळाकाँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे हे कोल्हापूरच्या विकासात अडथळा बनेल. शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय रूप दिले व गटातटांच्या राजकारणामध्ये नेहमीप्रमाणे होणाºया विकासात अडथळा निर्माण करण्याची चुरस निर्माण झाली आहे, अशा शब्दांत ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी महानगरपालिकेतील काँग्रेस पदाधिकाºयांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.शहरातील चौक, रस्ते सुशोभित करण्याकरीता ‘केएसबीपी’या संस्थेने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावातील करार करण्याचे अधिकार मागितले असल्याने त्यास महानगरपालिकेतील काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली आहे. पालिकेच्या नावावर कोणी पैसे मिळविणार असेल तर आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख यांनी घेतली आहे. त्यास अनुसरून पित्रे यांनी मंगळवारी खुलासा केला आहे.पित्रे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शहरात महापालिकेचे ५० हून अधिक उद्याने व बगीचे असून त्याची कोणतीही निगा राखली जात नाही तसेच रंकाळा तलावाची तसेच तेथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. अशावेळी शहर सौंदर्यीकरणासाठी व पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासास हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे व स्वत:ही धोरणात्मक निर्णय न घेणे हा खºया अर्थाने विकासामधील एक प्रमुख अडथळा ठरणार आहे. त्यामुळे येथून पुढचे सर्व प्रस्ताव लालफितीत गुंडाळून एका कपाटात धूळ खात पडतील; पण त्यापूर्वीच आम्ही जाहीर करत आहोत की आम्हाला महानगरपालिकेकडून कोणतेही अधिकार नको आहेत. आम्हाला कोणताही करार करण्यास स्वारस्य नाही. पूर्वीप्रमाणेच केएसबीपी जे प्रयत्नपूर्वक प्रकल्प उभारले आहेत, जी झाडे लावली आहेत त्यांचे संगोपन करण्यात येईल.महानगरपालिकेला रामराम‘केएसबीपी’द्वारे शासकीय संस्थांचे पाठबळ, उद्योग जगताची मदत यातून शहराचे रूप कसे पालटू शकते, हे आम्हाला सिद्ध करायचे होते. त्यासाठी आम्ही ना पक्ष पाहिला, ना प्रभाग पाहिला. या सर्व प्रक्रियेत यापुढे कोल्हापूर महानगरपालिकेचा समावेश राहणार नसून, जिल्ह्यातील इतर शासकीय तसेच अशासकीय संस्था यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे सुजय पित्रे यांनी म्हटले आहे.