शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

‘केएसबीपी’ यापुढे शहरात काम करणार नाही : सुजय पित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे

ठळक मुद्दे राजकारणाने शाश्वत विकासाला अडथळाकाँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे हे कोल्हापूरच्या विकासात अडथळा बनेल. शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय रूप दिले व गटातटांच्या राजकारणामध्ये नेहमीप्रमाणे होणाºया विकासात अडथळा निर्माण करण्याची चुरस निर्माण झाली आहे, अशा शब्दांत ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी महानगरपालिकेतील काँग्रेस पदाधिकाºयांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.शहरातील चौक, रस्ते सुशोभित करण्याकरीता ‘केएसबीपी’या संस्थेने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावातील करार करण्याचे अधिकार मागितले असल्याने त्यास महानगरपालिकेतील काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली आहे. पालिकेच्या नावावर कोणी पैसे मिळविणार असेल तर आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख यांनी घेतली आहे. त्यास अनुसरून पित्रे यांनी मंगळवारी खुलासा केला आहे.पित्रे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शहरात महापालिकेचे ५० हून अधिक उद्याने व बगीचे असून त्याची कोणतीही निगा राखली जात नाही तसेच रंकाळा तलावाची तसेच तेथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. अशावेळी शहर सौंदर्यीकरणासाठी व पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासास हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे व स्वत:ही धोरणात्मक निर्णय न घेणे हा खºया अर्थाने विकासामधील एक प्रमुख अडथळा ठरणार आहे. त्यामुळे येथून पुढचे सर्व प्रस्ताव लालफितीत गुंडाळून एका कपाटात धूळ खात पडतील; पण त्यापूर्वीच आम्ही जाहीर करत आहोत की आम्हाला महानगरपालिकेकडून कोणतेही अधिकार नको आहेत. आम्हाला कोणताही करार करण्यास स्वारस्य नाही. पूर्वीप्रमाणेच केएसबीपी जे प्रयत्नपूर्वक प्रकल्प उभारले आहेत, जी झाडे लावली आहेत त्यांचे संगोपन करण्यात येईल.महानगरपालिकेला रामराम‘केएसबीपी’द्वारे शासकीय संस्थांचे पाठबळ, उद्योग जगताची मदत यातून शहराचे रूप कसे पालटू शकते, हे आम्हाला सिद्ध करायचे होते. त्यासाठी आम्ही ना पक्ष पाहिला, ना प्रभाग पाहिला. या सर्व प्रक्रियेत यापुढे कोल्हापूर महानगरपालिकेचा समावेश राहणार नसून, जिल्ह्यातील इतर शासकीय तसेच अशासकीय संस्था यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे सुजय पित्रे यांनी म्हटले आहे.