शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘केएसबीपी’ यापुढे शहरात काम करणार नाही : सुजय पित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे

ठळक मुद्दे राजकारणाने शाश्वत विकासाला अडथळाकाँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासाला हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे हे कोल्हापूरच्या विकासात अडथळा बनेल. शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय रूप दिले व गटातटांच्या राजकारणामध्ये नेहमीप्रमाणे होणाºया विकासात अडथळा निर्माण करण्याची चुरस निर्माण झाली आहे, अशा शब्दांत ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी महानगरपालिकेतील काँग्रेस पदाधिकाºयांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.शहरातील चौक, रस्ते सुशोभित करण्याकरीता ‘केएसबीपी’या संस्थेने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावातील करार करण्याचे अधिकार मागितले असल्याने त्यास महानगरपालिकेतील काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तसेच नगरसेवकांनी हरकत घेतली आहे. पालिकेच्या नावावर कोणी पैसे मिळविणार असेल तर आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख यांनी घेतली आहे. त्यास अनुसरून पित्रे यांनी मंगळवारी खुलासा केला आहे.पित्रे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शहरात महापालिकेचे ५० हून अधिक उद्याने व बगीचे असून त्याची कोणतीही निगा राखली जात नाही तसेच रंकाळा तलावाची तसेच तेथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. अशावेळी शहर सौंदर्यीकरणासाठी व पर्यटन विकासासाठी एखादी संस्था पुढे येऊन लोकसहभागातून शाश्वत विकासास हातभार लावत असेल तर त्याला विरोध करणे व स्वत:ही धोरणात्मक निर्णय न घेणे हा खºया अर्थाने विकासामधील एक प्रमुख अडथळा ठरणार आहे. त्यामुळे येथून पुढचे सर्व प्रस्ताव लालफितीत गुंडाळून एका कपाटात धूळ खात पडतील; पण त्यापूर्वीच आम्ही जाहीर करत आहोत की आम्हाला महानगरपालिकेकडून कोणतेही अधिकार नको आहेत. आम्हाला कोणताही करार करण्यास स्वारस्य नाही. पूर्वीप्रमाणेच केएसबीपी जे प्रयत्नपूर्वक प्रकल्प उभारले आहेत, जी झाडे लावली आहेत त्यांचे संगोपन करण्यात येईल.महानगरपालिकेला रामराम‘केएसबीपी’द्वारे शासकीय संस्थांचे पाठबळ, उद्योग जगताची मदत यातून शहराचे रूप कसे पालटू शकते, हे आम्हाला सिद्ध करायचे होते. त्यासाठी आम्ही ना पक्ष पाहिला, ना प्रभाग पाहिला. या सर्व प्रक्रियेत यापुढे कोल्हापूर महानगरपालिकेचा समावेश राहणार नसून, जिल्ह्यातील इतर शासकीय तसेच अशासकीय संस्था यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे, असे सुजय पित्रे यांनी म्हटले आहे.