शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा क्षेत्राचेही खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव, कृष्णा भोयर यांचा आरोप : वीज बिल भरणार नाही भूमिका चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

कोल्हापूर : केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’च्या माध्यमातून देशातील सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा खटाटोप करत आहे. मात्र, ...

कोल्हापूर : केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’च्या माध्यमातून देशातील सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्राचे

खासगीकरण करण्याचा खटाटोप करत आहे. मात्र, केंद्राचा हा डाव देशपातळीवरील कामगार संघटना कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. प्रसंगी राष्ट्रीय पातळीवरील सात संघटना

एकत्रितपणे कामगारांना सोबत घेऊन बेमुदत संपावर जातील, अशा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

भोयर म्हणाले, ‘सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास सामान्य ग्राहकांची

फरपट होईल. सध्या महावितरण कंपन्यांची वीज बिलाची थकबाकी ७१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. थकबाकी वाढत गेल्यास या कंपन्या तोट्यात दाखवून

खासगीकरण करण्याचा केंद्राचा खटाटोप सुरू आहे. यामुळे वीज बिल भरणार नाही, ही भूमिका अयोग्य आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. खरे तर वीज उद्योग हा जनतेच्या मालकीचा राहिला पाहिजे. सरकारी मालकीच्या वीज कंपन्या या अंबानी, अदानी अशा

भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे. वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास घरगुती, आदिवासी, पॉवर लूम, आर्थिक दुर्बल घटक व शेतकऱ्यांना सध्या मिळणारी सबसिडी बंद

होईल.

यावेळी वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, शकील महात, सागर पाटील, सागर मळगे, सर्जेराव विभुते, आण्णाप्पा कांबळे आदी उपस्थित होते.

सुधारित वीज कायदा राज्यघटनेतील तरतुदींच्या विरुद्ध

भोयर म्हणाले, ‘मुळात सरकारी मालकीच्या महावितरणसह अन्य वीज कंपन्या टिकल्या

पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्ये देशाचे वीज धोरण निश्चित केले. ऊर्जा क्षेत्र हे सरकारच्या मालकीचे असले पाहिजे हे तेव्हा त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सुधारित वीज कायदा २०२० हा राज्यघटनेतील तरतुदींच्या विरुद्ध आहे. ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण झाल्यास वीज दर ठरविण्याचा राज्य सरकार व विद्युत नियामक आयोगाला अधिकार उरणार

नाही. केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’ आणून सगळेच अधिकार स्वत:कडे घेऊ पाहत आहे. ’