शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

ऊर्जा क्षेत्राचेही खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव, कृष्णा भोयर यांचा आरोप : वीज बिल भरणार नाही भूमिका चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

कोल्हापूर : केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’च्या माध्यमातून देशातील सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा खटाटोप करत आहे. मात्र, ...

कोल्हापूर : केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’च्या माध्यमातून देशातील सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्राचे

खासगीकरण करण्याचा खटाटोप करत आहे. मात्र, केंद्राचा हा डाव देशपातळीवरील कामगार संघटना कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. प्रसंगी राष्ट्रीय पातळीवरील सात संघटना

एकत्रितपणे कामगारांना सोबत घेऊन बेमुदत संपावर जातील, अशा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

भोयर म्हणाले, ‘सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास सामान्य ग्राहकांची

फरपट होईल. सध्या महावितरण कंपन्यांची वीज बिलाची थकबाकी ७१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. थकबाकी वाढत गेल्यास या कंपन्या तोट्यात दाखवून

खासगीकरण करण्याचा केंद्राचा खटाटोप सुरू आहे. यामुळे वीज बिल भरणार नाही, ही भूमिका अयोग्य आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. खरे तर वीज उद्योग हा जनतेच्या मालकीचा राहिला पाहिजे. सरकारी मालकीच्या वीज कंपन्या या अंबानी, अदानी अशा

भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे. वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास घरगुती, आदिवासी, पॉवर लूम, आर्थिक दुर्बल घटक व शेतकऱ्यांना सध्या मिळणारी सबसिडी बंद

होईल.

यावेळी वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, शकील महात, सागर पाटील, सागर मळगे, सर्जेराव विभुते, आण्णाप्पा कांबळे आदी उपस्थित होते.

सुधारित वीज कायदा राज्यघटनेतील तरतुदींच्या विरुद्ध

भोयर म्हणाले, ‘मुळात सरकारी मालकीच्या महावितरणसह अन्य वीज कंपन्या टिकल्या

पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्ये देशाचे वीज धोरण निश्चित केले. ऊर्जा क्षेत्र हे सरकारच्या मालकीचे असले पाहिजे हे तेव्हा त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सुधारित वीज कायदा २०२० हा राज्यघटनेतील तरतुदींच्या विरुद्ध आहे. ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण झाल्यास वीज दर ठरविण्याचा राज्य सरकार व विद्युत नियामक आयोगाला अधिकार उरणार

नाही. केंद्र सरकार ‘विद्युत कायदा २०२०’ आणून सगळेच अधिकार स्वत:कडे घेऊ पाहत आहे. ’