शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

क्रांती दिन विशेष: शरीरात सुया टोचल्या, जीभ हासडली पण तोंड नाही उघडले, कोल्हापुरातील निवृत्ती आडूरकरांनी देशासाठी रक्त सांडले

By संदीप आडनाईक | Updated: August 9, 2023 12:58 IST

कोल्हापूरकरांनी चौकाला, रस्त्यालाही दिले नाव

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यात पुढाकार घेणाऱ्या शहरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती आडूरकर (सुतार) हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झाले. अमानुष अत्याचारात जिवाचे मोल देऊन सहकाऱ्यांचे नाव इंग्रजांना न सांगणाऱ्या आडूरकर यांचे समर्पण मोठे आहे. त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पेठेतील चौकाला तसेच त्यांचे घर असलेल्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आज क्रांतिदिनी आणि स्वातंत्र्यदिनी या हुतात्म्याला आदरांजली वाहिली जाते.ब्रिटिश सैनिकांच्या पन्हाळा येथील छावणीवर एप्रिल १९३७ मध्ये बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न काही क्रांतिकारकांनी केला. त्यावेळी पेठेत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या निवृत्ती आडूरकर यांनी स्फोट घडविण्याची जबाबदारी पूर्णत्वास नेली. प्रजा परिषदेचे नेते भाई माधवराव बागल यांची शिवाजी पेठेतील सभा उधळून लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आडूरकरांनी हाणून पाडला.१० ऑक्टोबर १९४२ मध्ये फेरीस मार्केटसमोरील गव्हर्नर सर वेलस्ली विल्सनचा पुतळा विद्रूप करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी १६ महिन्यांचा तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. मात्र, पन्हाळा बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचा सुगावा जेव्हा पोलिसांना लागला तेव्हा त्यांचा तुरुंगात अमानुष छळ करण्यात आला.

हातपाय पकडून फरशीवर आपटलेशरीरात सुया, दाभणे टोचून शरीर काळेनिळे केले. हातपाय पकडून चार पोलिसांनी त्यांना फरशीवर आपटले होते. माहिती मिळवण्यासाठी सांडशीने त्यांची जीभ हासडली होती; पण त्यांनी एका शब्दाने कोणाचेही नाव घेतले नाही. अतिरक्तस्रावाने प्रकृती गंभीर बनली होती. तुरुंगातच मृत्यू झाल्यास उद्रेक होईल, म्हणून इंग्रजांनी ७ जुलै १९४३ या दिवशी सरकारी रुग्णालयात दाखल केले.

९ ऑगस्टलाच मृत्यूदरवर्षी ९ ऑगस्टला मोठा मोर्चा काढण्याचा त्यांचा आग्रह असायचा; परंतु इंग्रजांनी १४४ कलम लागू करून जमावबंदी करून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. ३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि ९ ऑगस्ट १९४३ या दिवशीच पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेलाही जमावबंदी लागू केली होती; पण ती झुगारून शिवाजी पेठेतून भव्य अंत्ययात्रा निघाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर