शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘के.पी.’ मनधरणीसाठी ‘ए. वाय.’ यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:42 IST

सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) ...

सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) येथे घरी भेट घेतली. आता आपण लढतो, पुढच्या वेळेला तुम्हाला संधी देतो, असे ‘के. पी.’ यांनी सांगितले; पण गणेशोत्सव सुरू आहे, चार दिवसाने यावर बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीवरून मेहुण्या-पाहुण्यांमधील संबंध ताणले आहेत. त्यांच्या भेटीने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.‘राधानगरी-भुदरगड’च्या उमेदवारीवरून ‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यात गेली दोन-तीन वर्षे संघर्ष सुरू आहे. गेली २0-२५ वर्षे एकमेकांच्या आधाराने राजकारण करणाऱ्या या मेहुण्या-पाहुण्यांत ‘भोगावती’च्या निवडणुकीनंतर विघ्ने निर्माण झाली. अलीकडे तर उमेदवारीवरून दोघांत शाब्दिक चकमकही उडाली होती. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच असा दोघांनीही निर्धार केल्याने राष्टÑवादीसमोरच पेच निर्माण झाला आहे. राधानगरी-भुदरगडमधील मुंबईतील रहिवाशांच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील हे आपणास मदत करतील, अशी अपेक्षा के. पी. पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या दोघांतील चर्चेसाठी प्रयत्न सुरू झाले.मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता के. पी. पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील हे ए. वाय. पाटील यांच्या घरी पोहोचले. गेल्या २0-२५ वर्षांत दोघांनी ताकदीने सत्तास्थाने उभी केली. आता भांडत बसलो, तर सगळे अस्थिर होईल, झाले गेले विसरून पुन्हा एकदिलाने काम करूया, असे के. पी. पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीचा वाद आहे, तो आपण बसून सोडवूया, आता मी लढतो, पुढच्या वेळेला तुम्ही लढा, अशी आॅफर ‘के. पी.’ यांनी ‘ए. वाय.’ यांना दिली. पण सध्या गणेशोत्सव आहे, यावर चार दिवसांनी बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ नको, अशा शब्दांत भैया माने, युवराज पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला...तर एवढी दुखापत झाली नसती‘आजपर्यंत आपण ‘के. पीं.’चा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांच्यासाठी जिवाचे रान केले. यावेळेला लढतो म्हणालो म्हणजे चूक केली का? दोन वर्षांपूर्वीच त्यांनी बोलावून घेऊन समजावून सांगितले असते, तर त्याचवेळी विषय संपला असता. एवढी दुखापत झालीच नसती. अशी परिस्थिती का निर्माण झाली, हे मलाच कळत नसल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले. यावेळी ‘ए. वाय.’ यांचे बंधू आर. वाय. पाटील हेही उपस्थित होते.हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रयत्न‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यामुळेच आपण जिल्ह्याचा नेता होऊ शकलो, असे जाहीरपणे आमदार हसन मुश्रीफ यांनी कबूल केले होते; त्यामुळे या दोघांतील वाद टोकाला गेला तर त्यातून राष्ट्रवादीचे नुकसान होईल. सध्या या पक्षाला राज्यभर गळती लागली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद मिटवून जिथे पक्षाची ताकद आहे, तिथे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्यानेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.