शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘के.पी.’ मनधरणीसाठी ‘ए. वाय.’ यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:42 IST

सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) ...

सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) येथे घरी भेट घेतली. आता आपण लढतो, पुढच्या वेळेला तुम्हाला संधी देतो, असे ‘के. पी.’ यांनी सांगितले; पण गणेशोत्सव सुरू आहे, चार दिवसाने यावर बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीवरून मेहुण्या-पाहुण्यांमधील संबंध ताणले आहेत. त्यांच्या भेटीने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.‘राधानगरी-भुदरगड’च्या उमेदवारीवरून ‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यात गेली दोन-तीन वर्षे संघर्ष सुरू आहे. गेली २0-२५ वर्षे एकमेकांच्या आधाराने राजकारण करणाऱ्या या मेहुण्या-पाहुण्यांत ‘भोगावती’च्या निवडणुकीनंतर विघ्ने निर्माण झाली. अलीकडे तर उमेदवारीवरून दोघांत शाब्दिक चकमकही उडाली होती. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच असा दोघांनीही निर्धार केल्याने राष्टÑवादीसमोरच पेच निर्माण झाला आहे. राधानगरी-भुदरगडमधील मुंबईतील रहिवाशांच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील हे आपणास मदत करतील, अशी अपेक्षा के. पी. पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या दोघांतील चर्चेसाठी प्रयत्न सुरू झाले.मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता के. पी. पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील हे ए. वाय. पाटील यांच्या घरी पोहोचले. गेल्या २0-२५ वर्षांत दोघांनी ताकदीने सत्तास्थाने उभी केली. आता भांडत बसलो, तर सगळे अस्थिर होईल, झाले गेले विसरून पुन्हा एकदिलाने काम करूया, असे के. पी. पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीचा वाद आहे, तो आपण बसून सोडवूया, आता मी लढतो, पुढच्या वेळेला तुम्ही लढा, अशी आॅफर ‘के. पी.’ यांनी ‘ए. वाय.’ यांना दिली. पण सध्या गणेशोत्सव आहे, यावर चार दिवसांनी बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ नको, अशा शब्दांत भैया माने, युवराज पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला...तर एवढी दुखापत झाली नसती‘आजपर्यंत आपण ‘के. पीं.’चा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांच्यासाठी जिवाचे रान केले. यावेळेला लढतो म्हणालो म्हणजे चूक केली का? दोन वर्षांपूर्वीच त्यांनी बोलावून घेऊन समजावून सांगितले असते, तर त्याचवेळी विषय संपला असता. एवढी दुखापत झालीच नसती. अशी परिस्थिती का निर्माण झाली, हे मलाच कळत नसल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले. यावेळी ‘ए. वाय.’ यांचे बंधू आर. वाय. पाटील हेही उपस्थित होते.हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रयत्न‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यामुळेच आपण जिल्ह्याचा नेता होऊ शकलो, असे जाहीरपणे आमदार हसन मुश्रीफ यांनी कबूल केले होते; त्यामुळे या दोघांतील वाद टोकाला गेला तर त्यातून राष्ट्रवादीचे नुकसान होईल. सध्या या पक्षाला राज्यभर गळती लागली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद मिटवून जिथे पक्षाची ताकद आहे, तिथे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्यानेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.