शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

के.पी. यांच्यामुळेच ‘बिद्री’ची स्थिती भक्कम

By admin | Updated: September 5, 2016 00:39 IST

हसन मुश्रीफ : मुदाळ येथे मेळावा; आगामी निवडणुकीत त्यांची आघाडी विजयी होईल

सरवडे : बिद्री साखर कारखान्यात माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कारभारामुळेच आजची आर्थिक स्थिती भक्कम आहे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते टीका करत आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुदाळ येथील स्वामी हुतात्मा वारके सूतगिरण येथे मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, ‘बिद्री’ची प्रगती ही दहा वर्षांच्या आर्थिक कारभाराची पुंजी आहे. के. पी. पाटील यांच्या अभ्यासू व कठोर निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. के.पीं.च्या नेतृत्वाखालील आघाडी सभासदांच्या विश्वासामुळे १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल. या विजयात महत्त्वाची भूमिका ही वाढीव होणारे व त्यामध्ये न होणारे सभासदच बजावणार आहेत. वाढीव सभासद अपात्र झाल्यानंतर विरोधक मंडळींनी साखर-पेढे वाटले. मात्र, त्यांची बाजू ऐकून कागदपत्रे तपासण्यास सहकार कलम ११ खाली चौकशी करण्यात आम्ही यशस्वी झालो. तरीही ते आमच्यासारखा निकाल लागला म्हणतात आणि विजयाचा दावा करतात. चांगल्या कारभारावरही टीका करतात. यापूर्वी सहवीज प्रकल्पावरही खोटे आरोप केले. आता सर्वजण म्हणतात, प्रकल्प चांगला आहे. त्यामुळे विरोधकांची डोकी फिरलीत काय हे तपासायला पाहिजे. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम ठेवत सहवीज प्रकल्पही यशस्वीपणे सुरू आहे. सभासदांना न्याय मिळवून देण्यात दिल्लीपर्यंत लढाई केली व यशस्वी झालो. मात्र, विरोधक आपण यशस्वी झाल्याचा डांगोरा पिटत आहेत. यावेळी देवराज बारदेस्कर, भीमराव पोवार, प्रकाश पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सुनीलराज सूर्यवंशी, ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, माजी संचालक फिरोजखान पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, संघाचे अध्यक्ष बाळ देसाई, सुनील कांबळे, जि. प. माजी सदस्य राजेंद्र पाटील, दत्तामामा खराडे, वसंत पाटील, धनाजीराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर) ‘दादा’ बदली करतील बिद्री साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांकडून बँकेच्या बोर्ड मिटिंगमध्ये मिळते. वाढीव ३00 रुपये देण्यात ‘बिद्री’ सक्षम आहे. मात्र, अधिकारी बोलले आणि ते कळाले तर ‘दादा’ त्यांची बदली करतील, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आ. मुश्रीफ यांनी लगावला.