शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मंडळाने रचला इतिहास!

By admin | Updated: April 1, 2016 01:41 IST

नवा आदर्श : दहावी, बारावी परीक्षा गैरमार्गविरहीत

सागर पाटील --टेंभ्ये --महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कोकण मंडळाने नवा इतिहास रचला आहे. कोकण मंडळाच्या स्थापनेनंतर यावर्षीच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये एकही गैरप्रकार आढळलेला नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून १६ भरारी पथकांनी तपासणी केली. विभागातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळला नाही.कोकण मंडळाने राज्यात सर्वाधिक निकालाच्या विक्रमाबरोबरच यावर्षी गैरमार्गविरहीत परीक्षा घेऊन राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्तेबरोबरच काटेकोरपणे परीक्षा घेण्यात कोकण अव्वल असल्याचे यातून समोर आले आहे.परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी ७ भरारी पथके व विभागस्तरावरून २ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती. या पथकांच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात मिळून ३८३ भेटी देण्यात आल्या. या भेटी दरम्यान विभागातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आलेला नाही.कोकण मंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच हा अशक्यप्राय टप्पा मंडळाने गाठला आहे. गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यात राज्यात अव्वल ठरण्याचा बहुमान कोकण मंडळाला मिळाला आहे. कोकण मंडळाच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोकण विभागातून मार्च २०१२मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ६ गैरप्रकार आढळले होते. आॅक्टोबर २०१२मध्ये १ गैरप्रकार, मार्च २०१३मध्ये ३२ गैरप्रकार, आॅक्टोबर २०१३मध्ये ९ गैरप्रकार, मार्च २०१४मध्ये २५ गैरप्रकार, आॅक्टोबर २०१४मध्ये १९, तर मार्च २०१५मध्ये १९ व आॅगस्ट व आॅक्टोबर २०१५मध्ये १८ गैरप्रकार नोंदवण्यात आले आहेत. फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये यावर्षी प्रथमच गैरमार्गांचा अहवाल निरंक आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र भेटी देऊन व कडक तपासणी केल्यानंतरदेखील एकही गैरप्रकार न आढळणे, ही बाब कोकण मंडळाच्या दृष्टीने भूषणावह आहे.या महत्वपूर्ण यशाबद्दल मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, सचिव आर. बी. गिरी, सहसचिव किरण लोहार, सहाय्यक सचिव सी. एस. गावडे यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.आवाहन : मेळावे अन् विविध स्पर्धा...गैरमार्गमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. अध्यक्ष, सचिव यांच्या आकाशवाणीवरून विशेष मुलाखतींसह शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजित करण्यात आले, कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती, मुख्याध्यापक व केंद्र संचालक यांची विशेष सभा घेऊन गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. पालकांशी संवाद साधून गैरप्रकाराचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.