शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मंडळाने रचला इतिहास!

By admin | Updated: April 1, 2016 01:41 IST

नवा आदर्श : दहावी, बारावी परीक्षा गैरमार्गविरहीत

सागर पाटील --टेंभ्ये --महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कोकण मंडळाने नवा इतिहास रचला आहे. कोकण मंडळाच्या स्थापनेनंतर यावर्षीच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये एकही गैरप्रकार आढळलेला नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून १६ भरारी पथकांनी तपासणी केली. विभागातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळला नाही.कोकण मंडळाने राज्यात सर्वाधिक निकालाच्या विक्रमाबरोबरच यावर्षी गैरमार्गविरहीत परीक्षा घेऊन राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्तेबरोबरच काटेकोरपणे परीक्षा घेण्यात कोकण अव्वल असल्याचे यातून समोर आले आहे.परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी ७ भरारी पथके व विभागस्तरावरून २ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती. या पथकांच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात मिळून ३८३ भेटी देण्यात आल्या. या भेटी दरम्यान विभागातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आलेला नाही.कोकण मंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच हा अशक्यप्राय टप्पा मंडळाने गाठला आहे. गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यात राज्यात अव्वल ठरण्याचा बहुमान कोकण मंडळाला मिळाला आहे. कोकण मंडळाच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोकण विभागातून मार्च २०१२मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ६ गैरप्रकार आढळले होते. आॅक्टोबर २०१२मध्ये १ गैरप्रकार, मार्च २०१३मध्ये ३२ गैरप्रकार, आॅक्टोबर २०१३मध्ये ९ गैरप्रकार, मार्च २०१४मध्ये २५ गैरप्रकार, आॅक्टोबर २०१४मध्ये १९, तर मार्च २०१५मध्ये १९ व आॅगस्ट व आॅक्टोबर २०१५मध्ये १८ गैरप्रकार नोंदवण्यात आले आहेत. फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये यावर्षी प्रथमच गैरमार्गांचा अहवाल निरंक आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र भेटी देऊन व कडक तपासणी केल्यानंतरदेखील एकही गैरप्रकार न आढळणे, ही बाब कोकण मंडळाच्या दृष्टीने भूषणावह आहे.या महत्वपूर्ण यशाबद्दल मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, सचिव आर. बी. गिरी, सहसचिव किरण लोहार, सहाय्यक सचिव सी. एस. गावडे यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.आवाहन : मेळावे अन् विविध स्पर्धा...गैरमार्गमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. अध्यक्ष, सचिव यांच्या आकाशवाणीवरून विशेष मुलाखतींसह शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजित करण्यात आले, कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती, मुख्याध्यापक व केंद्र संचालक यांची विशेष सभा घेऊन गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. पालकांशी संवाद साधून गैरप्रकाराचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.