शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

कळंबीमधील कोळी बांधवांची पुन्हा झाली ताटातूट

By admin | Updated: August 1, 2014 23:28 IST

नियतीचा अन्याय : बारा वर्षांनंतर एकत्र; पंधरा दिवसांपूर्वी भीमराव झाला बेपत्ता

मिरज : लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विखुरलेल्या कळंबी येथील कोळी कुटुंबातील नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही मुले सुमारे बारा वर्षांपूर्वी एकत्र आली. कष्टातून जीवन उभारत असताना आता नियतीने पुन्हा त्यांची ताटातूट केली आहे. भीमराव हा गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला आहे. कोळी बंधंूवरील या आघाताने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. लहानपणी आईचा मृत्यू झाल्याने व वडील बेपत्ता झाल्याने नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही तीन बालके अनाथ झाली. कालांतराने नरसाप्पा व भीमराव यांच्यापासून त्यांची लहान बहिण जयश्रीची ताटातूट झाली. बहिणीच्या शोधात पुणे व मिरज येथे फिरत असताना कळंबी येथील विलासमती कलगोंडा पाटील यांनी नरसाप्पा व भीमराव यांना घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ‘लोकमत’ने सुमारे बारा वर्षांपूर्वी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे नरसाप्पा व भीमराव यांची त्यांच्या बहिणीशी भेट झाली. याबाबतचे वृत्तही ‘लोकमत’च्या तत्कालीन अंकात प्रसिध्द झाले होते. बारा वर्षांपूर्वी एकत्र आलेली भावंडे एकमेकांच्या संपर्कात होती. तिघा भावंडांचा सांभाळ करणाऱ्या विलासमती पाटील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आई-वडिलांविना लहानपण गेलेली ही भावंडे आता मोठी झाली आहेत. नरसाप्पा हे सध्या कळंकी येथे सायकल व गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम करतात. तर छोटा भाऊ भीमराव हा नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यांची बहीण जयश्री ही पुणे येथे नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करुन एका रुग्णालयात नोकरीस असल्याचे नरसाप्पा यांनी सांगिले. नरसाप्पा यांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले आहे. शासनाकडून मिळालेला निधी व कष्टातून जमविलेल्या पैशातून ते कळंबी येथे घराची उभारणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. कोळी बंधूंच्या जीवनात आता सुखाचे दिवस येत असतानाच नियतीने पुन्हा एकदा या कुटुंबावर अन्याय केला आहे. तिघा भावंडांपैकी भीमराव हा १४ जुलैच्या रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला आहे. चार दिवस शोधाशोध करून व वाट पाहून नरसाप्पा यांनी भीमराव बेपत्ता झाल्याची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे. कळंबीतील सामाजिक कार्यकर्ते कबीर मुजावर यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून याबाबत हकीकत सांगितली. कोळी बंधूवर झालेल्या या आघातामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)