शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

कळंबीमधील कोळी बांधवांची पुन्हा झाली ताटातूट

By admin | Updated: August 1, 2014 23:28 IST

नियतीचा अन्याय : बारा वर्षांनंतर एकत्र; पंधरा दिवसांपूर्वी भीमराव झाला बेपत्ता

मिरज : लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विखुरलेल्या कळंबी येथील कोळी कुटुंबातील नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही मुले सुमारे बारा वर्षांपूर्वी एकत्र आली. कष्टातून जीवन उभारत असताना आता नियतीने पुन्हा त्यांची ताटातूट केली आहे. भीमराव हा गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला आहे. कोळी बंधंूवरील या आघाताने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. लहानपणी आईचा मृत्यू झाल्याने व वडील बेपत्ता झाल्याने नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही तीन बालके अनाथ झाली. कालांतराने नरसाप्पा व भीमराव यांच्यापासून त्यांची लहान बहिण जयश्रीची ताटातूट झाली. बहिणीच्या शोधात पुणे व मिरज येथे फिरत असताना कळंबी येथील विलासमती कलगोंडा पाटील यांनी नरसाप्पा व भीमराव यांना घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ‘लोकमत’ने सुमारे बारा वर्षांपूर्वी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे नरसाप्पा व भीमराव यांची त्यांच्या बहिणीशी भेट झाली. याबाबतचे वृत्तही ‘लोकमत’च्या तत्कालीन अंकात प्रसिध्द झाले होते. बारा वर्षांपूर्वी एकत्र आलेली भावंडे एकमेकांच्या संपर्कात होती. तिघा भावंडांचा सांभाळ करणाऱ्या विलासमती पाटील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आई-वडिलांविना लहानपण गेलेली ही भावंडे आता मोठी झाली आहेत. नरसाप्पा हे सध्या कळंकी येथे सायकल व गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम करतात. तर छोटा भाऊ भीमराव हा नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यांची बहीण जयश्री ही पुणे येथे नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करुन एका रुग्णालयात नोकरीस असल्याचे नरसाप्पा यांनी सांगिले. नरसाप्पा यांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले आहे. शासनाकडून मिळालेला निधी व कष्टातून जमविलेल्या पैशातून ते कळंबी येथे घराची उभारणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. कोळी बंधूंच्या जीवनात आता सुखाचे दिवस येत असतानाच नियतीने पुन्हा एकदा या कुटुंबावर अन्याय केला आहे. तिघा भावंडांपैकी भीमराव हा १४ जुलैच्या रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला आहे. चार दिवस शोधाशोध करून व वाट पाहून नरसाप्पा यांनी भीमराव बेपत्ता झाल्याची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे. कळंबीतील सामाजिक कार्यकर्ते कबीर मुजावर यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून याबाबत हकीकत सांगितली. कोळी बंधूवर झालेल्या या आघातामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)