शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

राज्यात कोल्हापूरची अव्वल कामगिरी; पोस्टामार्फत आठ हजार ग्राहकांना रक्कम वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 11:53 IST

सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देयासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या लाभार्थ्यांना ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमनच्या माध्यमातून बुधवारअखेर ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम’ (एईपीएस)द्वारे ७९१९ ग्राहकांना एक कोटी ४७ लाखांचे विनामूल्य घरपोच वितरण करण्यात आले आहे. कोल्हापूर डाक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल असल्याची माहिती डाकघर प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.

१०० कोटींपेक्षा जास्त रक्कम पोस्ट आॅफिसमध्ये जमा केली आहे व पोस्ट आॅफिसमार्फत २२ कोटींपेक्षा जास्त रक्कम खातेदारांना अदा केली आहे. लॉकडाऊन असताना इतर बँकांच्या लाभार्थ्यांबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या २९२४ ग्राहकांना ५४ लाख ५१ हजार रुपयांचे वितरण आणि ४५६७ ग्राहकांकडून ९१ लाख १६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. फंड ट्रान्स्फर, बिल पेमेंट, आदी सेवाही पुरविण्यात आल्याचे ईश्वर पाटील यांनी सांगितले.आधार लिंक नसल्याने अडचणआतापर्यंत बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, आदी बँकांनी सुमारे तीन लाख लाभार्थ्यांची माहिती पोस्टाकडे दिली आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम घरपोच पोहोचविण्याचे काम पोस्टाकडून सुरू आहे. त्यात बँक खात्याला आधार लिंक नसणे ही एक अडचण ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात आजअखेर पोस्ट आॅफिस ३६२४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले. मात्र, त्यांपैकी २२,८२२ लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याने त्यांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. तरीदेखील सर्व ग्रामीण डाक सेवक अथवा पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचून हा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईश्वर पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPost Officeपोस्ट ऑफिस