शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात कोल्हापूरची अव्वल कामगिरी; पोस्टामार्फत आठ हजार ग्राहकांना रक्कम वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 11:53 IST

सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देयासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या लाभार्थ्यांना ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमनच्या माध्यमातून बुधवारअखेर ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम’ (एईपीएस)द्वारे ७९१९ ग्राहकांना एक कोटी ४७ लाखांचे विनामूल्य घरपोच वितरण करण्यात आले आहे. कोल्हापूर डाक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल असल्याची माहिती डाकघर प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण देण्यात आलेले आहे.

१०० कोटींपेक्षा जास्त रक्कम पोस्ट आॅफिसमध्ये जमा केली आहे व पोस्ट आॅफिसमार्फत २२ कोटींपेक्षा जास्त रक्कम खातेदारांना अदा केली आहे. लॉकडाऊन असताना इतर बँकांच्या लाभार्थ्यांबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या २९२४ ग्राहकांना ५४ लाख ५१ हजार रुपयांचे वितरण आणि ४५६७ ग्राहकांकडून ९१ लाख १६ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. फंड ट्रान्स्फर, बिल पेमेंट, आदी सेवाही पुरविण्यात आल्याचे ईश्वर पाटील यांनी सांगितले.आधार लिंक नसल्याने अडचणआतापर्यंत बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, आदी बँकांनी सुमारे तीन लाख लाभार्थ्यांची माहिती पोस्टाकडे दिली आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम घरपोच पोहोचविण्याचे काम पोस्टाकडून सुरू आहे. त्यात बँक खात्याला आधार लिंक नसणे ही एक अडचण ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात आजअखेर पोस्ट आॅफिस ३६२४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले. मात्र, त्यांपैकी २२,८२२ लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याने त्यांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. तरीदेखील सर्व ग्रामीण डाक सेवक अथवा पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचून हा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईश्वर पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPost Officeपोस्ट ऑफिस