शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:03 IST

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हाध्यक्ष होणे कोणालाही सोपे नाही. प्रकाश आवाडे यांनीही अजून प्रयत्न सोडलेले नाहीत.सतेज पाटील यांनी उघड दंड थोपटले आहेत.पी. एन. पाटील यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या काँग्रेसचा राहुल गांधी कोण, हे नव्या वर्षातच ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील यांनी उघड दंड थोपटले आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही अजून प्रयत्न सोडलेले नाहीत. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध पाहता, त्यांनाही कमी लेखणे चुकीचे ठरेल. सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी जरी प्रयत्न सुरू केले असले तरी जिल्हाध्यक्ष निवडताना माजी आमदार पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या सतरा वर्षांहून अधिक काळ ते जिल्हाध्यक्ष आहेत. कॉँग्रेसच्या फुटीनंतर १९९९ मध्ये त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकदीने मोट बांधून राष्टÑवादी कॉँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना टक्कर दिली. त्यामुळे त्यांना वगळून जिल्हाध्यक्ष होणे कोणालाही सोपे नाही. त्यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत. कॉँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी ४ डिसेंबरला नामनिर्देशन दाखल करायचे आहे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ती औपचारिकता ९ डिसेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत.आवळेंचे नावही पुढे येण्याची शक्यतासतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी ताकद लावली तर पी. एन. पाटील हे जयवंतराव आवळे यांचे नाव पुढे करून दोघांनाही शांत करू शकतात. आवळे यांचे प्रदेश कॉँग्रेसमधील वजन पाहता त्यांना थेट विरोध करणेही अवघड होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.महत्त्वाचे पदआगामी दोन वर्षांत लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चित करताना जिल्हाध्यक्षांचे मत महत्त्वाचे असते. त्यानिमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करता येते. त्यामुळे या पदासाठी मातब्बर फिल्डींग लावू शकतात.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर