शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा ‘राहुल’ नवीन वर्षातच ठरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षपद : सतेज पाटील आग्रही; पी. एन. सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:03 IST

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हाध्यक्ष होणे कोणालाही सोपे नाही. प्रकाश आवाडे यांनीही अजून प्रयत्न सोडलेले नाहीत.सतेज पाटील यांनी उघड दंड थोपटले आहेत.पी. एन. पाटील यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत.

कोल्हापूर : कॉँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या काँग्रेसचा राहुल गांधी कोण, हे नव्या वर्षातच ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील यांनी उघड दंड थोपटले आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही अजून प्रयत्न सोडलेले नाहीत. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध पाहता, त्यांनाही कमी लेखणे चुकीचे ठरेल. सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी जरी प्रयत्न सुरू केले असले तरी जिल्हाध्यक्ष निवडताना माजी आमदार पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या सतरा वर्षांहून अधिक काळ ते जिल्हाध्यक्ष आहेत. कॉँग्रेसच्या फुटीनंतर १९९९ मध्ये त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकदीने मोट बांधून राष्टÑवादी कॉँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना टक्कर दिली. त्यामुळे त्यांना वगळून जिल्हाध्यक्ष होणे कोणालाही सोपे नाही. त्यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत. कॉँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी ४ डिसेंबरला नामनिर्देशन दाखल करायचे आहे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, ती औपचारिकता ९ डिसेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत.आवळेंचे नावही पुढे येण्याची शक्यतासतेज पाटील व प्रकाश आवाडे यांनी ताकद लावली तर पी. एन. पाटील हे जयवंतराव आवळे यांचे नाव पुढे करून दोघांनाही शांत करू शकतात. आवळे यांचे प्रदेश कॉँग्रेसमधील वजन पाहता त्यांना थेट विरोध करणेही अवघड होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.महत्त्वाचे पदआगामी दोन वर्षांत लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चित करताना जिल्हाध्यक्षांचे मत महत्त्वाचे असते. त्यानिमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करता येते. त्यामुळे या पदासाठी मातब्बर फिल्डींग लावू शकतात.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर