शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

लस वाया न घालविण्याचे कोल्हापूरचे प्रयत्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असताना, काही जिल्ह्यांमध्ये लस वाया जात असल्याचे शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असताना, काही जिल्ह्यांमध्ये लस वाया जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. तयानंतर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत कोल्हापूर जिल्ह्याने लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे.

एक महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील लस वाया जाण्याचे प्रमाण हे २ टक्के होते. याचवेळी अन्य जिल्ह्यांचे प्रमाणही खूपच होते. याची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दखल घेतली होती व हे प्रमाण तातडीने कमी करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांचे पालन करत पंधरा दिवसांपूर्वी हेच प्रमाण १.२ टक्क्यांवर आणण्यात आले. यामध्ये पुन्हा सुधारणा करत आता हे प्रमाण ०.१ टक्का इतके खाली आणण्यामध्ये कोल्हापूरच्या आरोग्य विभागांना यश आले होते. त्याहीपुढे जात गुरुवारी हेच प्रमाण वजा २ इतके घटले आहे.

राज्यातील २७ एप्रिलचा आढावा घेता, भंडारा, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे. रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांनी कोल्हापूरपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. राज्याचे सरासरी लस वाया जाण्याचे प्रमाण ०.६ टक्के आहे. कोल्हापूरचे २७ एप्रिलचे हेच प्रमाण ०.१ इतके आहे.

चौकट

लसीचा तुटवडा असताना अशा पध्दतीने लस वाया जाणे हे चुकीचे आहे, याची जाणीवजागृती करण्यात आली. परिचारिकांनीही याला साथ दिली. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. लस देण्यासाठी एडी इंजेक्शनचा वापर सुरू करण्यात आला. त्यामुळे आवश्यक तेवढीच लस भरली जाते. त्यामध्ये हवेचे बुडबुडे तयार होत नाहीत. या सगळ्यामुळे कोल्हापूर जिल्हा २ टक्के लस वाया जाण्यावरून १.२ टक्क्यावर आला. नंतर यामध्ये पुन्हा काटेकोरपणा आणल्याने आज ०.१ टक्का, आता ताज्या अहवालानुसार वजा २ इतकीच लस वाया जाते, असे लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. फारूक देसाई यांनी सांगितले.