शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कोल्हापूरकरांच्या प्रेम, विश्वासामुळेच झाले चांगले काम: अविनाश सुभेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:04 IST

कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.

ठळक मुद्दे कोल्हापूरकरांच्या प्रेम,विश्वासामुळेच झाले चांगले काम: अविनाश सुभेदारअनेक प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान

कोल्हापूर : कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक दौलत देसाई यांची शुक्रवारी(दि.८) यांची बदली झाली. परंतु अद्याप जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बदलीची पदस्थापना मिळालेली नाही. चार दिवसात ती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधताना कोल्हापूरातील कारकिर्दीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, कोल्हापूरकरांनी आपल्यावर खूप प्रेम केले. त्यांच्या पाठबळामुळे व शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावू शकलो. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी, तहसिलदार कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य देऊन विश्वास दाखविला. त्यामुळे त्यांच्याकडून उत्साहाने व चांगले काम झाले. त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले. कुटूंबप्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावर भर देऊन गेल्या दोन वर्षात काम केले. लोकांना आठवणीत राहील अशीच कामाची पध्दत राहीली.ते पुढे म्हणाले, येथील कारकिर्दीत कोल्हापूरकरांच्या प्रेम आणि विश्वासामुळे अनेक प्रश्न मार्गी लावता आले. या कालावधित कोणताही प्रश्न चिघळू न देता संवादाने तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पुजारी, झिरो पेंडंसी, आॅनलाईन सातबाराचे काम, रेशन डिजिटलायझेशनमध्ये राज्यात अव्वलस्थान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी बाधित होणाऱ्या लोकांच्या शंकांचे निरसन करून योग्य मोबदल्यात त्यांना भूसंपादनासाठी तयार करण्याचे काम, माजी सैनिकांच्या विधवांना जमिनीचे वाटप, आणिबाणीतील सत्याग्रहींना पेन्शन मंजूर, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला. 

 मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी जमिनी दिल्या असे विविध प्रश्न मार्गी लावल्याचे मनस्वी समाधान आहे. जिल्हा नियोजन समितीमधील निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांवर शंभर टक्के खर्च होईल या दृष्टीनेही प्रयत्न राहीला. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर