शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कोल्हापूरकरांच्या प्रेम, विश्वासामुळेच झाले चांगले काम: अविनाश सुभेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:04 IST

कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.

ठळक मुद्दे कोल्हापूरकरांच्या प्रेम,विश्वासामुळेच झाले चांगले काम: अविनाश सुभेदारअनेक प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान

कोल्हापूर : कोल्हापूरकर जनतेचे प्रेम आणि विश्वासासह महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पगारी पुजारी, झिरो पेंडंसी, रेशन डिजिटलायझेशन, रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना मनमोकळे केले.कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक दौलत देसाई यांची शुक्रवारी(दि.८) यांची बदली झाली. परंतु अद्याप जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बदलीची पदस्थापना मिळालेली नाही. चार दिवसात ती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधताना कोल्हापूरातील कारकिर्दीचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, कोल्हापूरकरांनी आपल्यावर खूप प्रेम केले. त्यांच्या पाठबळामुळे व शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावू शकलो. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी, तहसिलदार कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य देऊन विश्वास दाखविला. त्यामुळे त्यांच्याकडून उत्साहाने व चांगले काम झाले. त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले. कुटूंबप्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावर भर देऊन गेल्या दोन वर्षात काम केले. लोकांना आठवणीत राहील अशीच कामाची पध्दत राहीली.ते पुढे म्हणाले, येथील कारकिर्दीत कोल्हापूरकरांच्या प्रेम आणि विश्वासामुळे अनेक प्रश्न मार्गी लावता आले. या कालावधित कोणताही प्रश्न चिघळू न देता संवादाने तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पर्यायी शिवाजी पूल, अंबाबाई मंदीर पुजारी, झिरो पेंडंसी, आॅनलाईन सातबाराचे काम, रेशन डिजिटलायझेशनमध्ये राज्यात अव्वलस्थान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी बाधित होणाऱ्या लोकांच्या शंकांचे निरसन करून योग्य मोबदल्यात त्यांना भूसंपादनासाठी तयार करण्याचे काम, माजी सैनिकांच्या विधवांना जमिनीचे वाटप, आणिबाणीतील सत्याग्रहींना पेन्शन मंजूर, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला. 

 मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी जमिनी दिल्या असे विविध प्रश्न मार्गी लावल्याचे मनस्वी समाधान आहे. जिल्हा नियोजन समितीमधील निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांवर शंभर टक्के खर्च होईल या दृष्टीनेही प्रयत्न राहीला. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर