कोल्हापूर : गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात कमालीची घट झाली असून, अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्याने पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. या थंडीमुळे नागरिकांच्या दिनचर्येवर परिणाम झाला आहे. सकाळी व रात्रीचे तापमान १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. आठ दिवसाला बदलणाऱ्या हवामानाचा विशेषत: वयोवृद्ध नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आला. त्यानंतर थंडी असे विचित्र हवामानाचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे. गेले दोन दिवस थंड व कोरडे वारे वाहत आहे. या वाऱ्यामुळे वातावरणात दिवसभर कमालीचा गारवा जाणवतो. या थंडीचा परिणाम शाळा, कॉलेजवर झालेला दिसतो. थंडीतून कुडकुडतच मुलांना शाळेत जावे लागत असल्याने उपस्थितीवर परिणाम दिसत आहे. सकाळी लवकर घराबाहेर कामानिमित्त जावे लागणारे स्वेटर, कानटोपी, हातमोजे घालूनच बाहेर पडावे लागते. ग्रामीण भागात सध्या साखर व गुऱ्हाळघरांचा हंगाम सुरू आहे. पहाटे साडेचार-पाच वाजताच ग्रामीण भाग जागा होतो. तेथून पुढे त्यांचा दिनक्रम सुरू होतो. त्यावर थंडीचा परिणाम झाला आहे. रात्रभर कोरडे वारे वाहत असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील होते. सकाळी नऊ वाजले तरी अंग गारठवणारी थंडी असते. ऊन असते, पण अंगातून गारठा जात नाही. सकाळी दहा वाजता दुचाकीवरुन कामावर जातानाही अंग ऊबदार कपड्यांनी झाकूनच बाहेर पडावे लागते. दिवसभर गारठा जाणवतोच, सायंकाळी सहानंतर हळूहळू थंडी जाणवू लागते. रात्री आठनंतर तर ती अधिक त्रासदायक ठरते. (प्रतिनिधी)हवामानात आठवड्याला बदल होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. तापमानाचा पारा घसरल्याने आरोग्याची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. थंडीमुळे सर्दीसह घशाचे विकार उद्भवत असल्याने वयोवृद्ध व लहान मुलांची काळजी घ्यावी. -डॉ. वैशाली कुलकर्णीथंडीचे परिणामसर्दी, घशांचे विकारपन्नास वर्षे पूर्ण झालेल्यांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. थंडीत उघड्यावर झोपलो तर अर्धांगवायू होण्याची शक्यताकाय करावेकोमट पाणी प्यावेगरम ऊबदार कपडे घालावेतथंड पदार्थ खाणे टाळावेततीळ, गूळ असे पदार्थ खावेत
कोल्हापूरकर गारठले
By admin | Updated: December 19, 2014 23:24 IST