शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

वाढदिवशी भुकेल्यांना घास..‘कोल्हापुरी पॅटर्न’च आहे खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 12:24 IST

कोल्हापूरकरांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक बांधिलकीचे नवे पाऊल टाकले आहे. भुकेल्या, गरजूंना अन्नाचा घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ रुजला आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : सण-उत्सव असो की, वाढदिवस उत्साह आणि धडाक्यात साजरा करणे कोल्हापूरकरांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीचा विचार करून कोल्हापूरकरांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक बांधिलकीचे नवे पाऊल टाकले आहे. भुकेल्या, गरजूंना अन्नाचा घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ रुजला आहे. सीपीआर चौकात सुरू असलेल्या कोल्हापूर थाळी उपक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांत १५०० जणांनी वाढदिनी अन्नदान केल्याने अनेकांची भूक भागली आहे. सीपीआर रूग्णालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना एकवेळचे जेवण मिळत नाही. त्यांची जेवणाअभावी अडचण होत असल्याचे उत्तरेश्वरपेठेतील सामाजिक कार्यकर्ते आणि चांदी व्यावसायिक उदय प्रभावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी अशा नागरिकांसाठी सीपीआर चौकात ‘कोल्हापूर थाळी’ या उपक्रमांतर्गत गेल्यावर्षी जूनपासून मोफत जेवण सुरू केले. येथे दुपारी साडेबारा वाजता तीनशे जणांना जेवण दिले जाते. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांच्या नानबान फाउंडेशनची त्यांना मदत होत आहे. अनेकजण त्यांचा आणि कुटुंबातील अन्य सदस्य, मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस, एखाद्याच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘कोल्हापूर थाळी’ला अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत देणगी देत ‘कोल्हापूर थाळी’मध्ये सहभागी होत आहेत. महिन्यागणिक त्यांची संख्या वाढत आहे. भुकेल्यांना घास देऊन वाढदिवस साजरा करण्याचा एखाद्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ अनुकरणीय आहे.

अशी आहे ‘कोल्हापूर थाळी’एक चपाती, एक वाटी भाजी, आमटी, लागेल तितका भात, गोड पदार्थ (बासुंदी, फ्रुटखंड, जिलेबी, शेवयाची खीर यापैकी)उपक्रमाची व्याप्ती वाढविणारगेल्या आठ महिन्यांपासून रोज तीनशे जणांना मोफत जेवण पुरविण्याचा उपक्रम अखंडपणे राबवित आहे. त्यात सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाईकांचे अधिक प्रमाण आहे. रोज जेवण देण्याचा किमान दहा हजार रुपये खर्च येतो. वाढदिवस, पुण्यस्मरणानिमित्त आपल्या परीने काहीजण आर्थिक मदत देतात. त्यातून खर्च भागविला जात आहे. आर्थिक ताकद वाढल्यास ‘कोल्हापुरी थाळी’ उपक्रमाची व्याप्ती वाढविणार आहे.मिरजकर तिकटी, रंकाळा तलाव येथे उपक्रम सुरू करणार असल्याचे उदय प्रभावळे यांनी शुक्रवारी सांगितले. अन्नदान करण्याची इच्छा, तयारी असणाऱ्या नागरिकांनी ‘कोल्हापुरी थाळी’च्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

७३ हजार जणांना अन्नदान

या ‘कोल्हापूर थाळी’ उपक्रमांतर्गत गेल्या आठ महिन्यांमध्ये रोज किमान ३०० याप्रमाणे आतापर्यंत एकूण ७३ हजार ५०० जणांना अन्नदान करून त्यांचे पोट भरण्याचे काम आम्ही केले असल्याचे प्रभावळे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर